शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

आंध्र प्रदेशातील गांजाची ठाण्यात तस्करी,  दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 8:20 PM

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या जंगलातून ठाण्यात आणलेल्या गांजाची तस्करी करणा-या शाहरूख बिर्ला आणि किरण घुडे या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. दोघांचीही ठाणे न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

ठाणे : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या जंगलातून ठाण्यात आणलेल्या गांजाची तस्करी करणाºया शाहरूख बिर्ला आणि किरण घुडे या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. दोघांचीही ठाणे न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.बिर्ला याला बुधवारी (२९ नोव्हेंबर रोजी) रात्री १० वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे, उपनिरीक्षक मनोहर घाडगे यांच्या पथकाने भिवंडी बायपासजवळील रांजनोलीनाका येथे अटक केली. त्यापूर्वी २४ नोव्हेंबर रोजी आंबिवली रेल्वे स्थानकाजवळील परिसरातून किरणला घाडगे यांच्या पथकाने अटक केली होती. त्याच्याकडून एका कारसह सहा लाख ४१ हजार २०० रुपयांचा २२ किलो गांजा हस्तगत केला. त्याने दिलेल्या माहितीवरूनच शाहरूखला या पथकाने अटक केली. हे दोघेही आंध्र प्रदेशातील गणेशन याच्याकडून हा गांजा ठाण्यात तस्करीसाठी आणत होते. पुण्याचा विशाल मोहिते आणि गणेशन हे दोघे मिळून या गांजाची तस्करी करत होते, अशीही माहिती तपासात उघड झाली. घुडे आणि शाहरूख हे गणेशन याच्याकडून साडेसात हजार रुपये किलोने गांजाची खरेदी करत होते. पुढे ते मुंबई, ठाण्यात १५ हजार रुपये किलोने त्याची विक्री करत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.आंध्र प्रदेशात पथक रवानाठाण्यात गांजाची तस्करी करणाºया गणेशन तसेच त्याच्या साथीदारांना अटक करण्यासाठी ठाण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार उत्तम भोसले, दिलीप सोनवणे आणि तुळशीराम टोपले यांचे पथक आता गुरुवारी आंध्र प्रदेशात रवाना झाले आहे. तस्करी करणा-यांच्या अटकेनंतर या प्रकरणात सामील असलेल्या आणखी मोठ्या रॅकेटचाही भंडाफोड होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :ArrestअटकCrimeगुन्हाthaneठाणे