शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

येऊरच्या जंगलात भरकटलेली तीन मुले आठ तासांच्या प्रदीर्घ शोध मोहिमेनंतर सुखरुप मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 23:46 IST

गिर्यारोहणासाठी गेल्यानंतर ठाण्याच्या येऊरच्या जंगलात भरकटलेल्या कुणाल संजय जाधव (२१), शार्दूल लिंगायत (२१) आणि अनिकेत गुप्ता (२१) या तिघांचा शोध घेण्यात चितळसर पोलीस आणि वनविभागाला मंगळवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास यश आले. तब्बल आठ तास पाच पथकांनी ही शोध मोहीम राबविली.

ठळक मुद्दे पोलीस आणि वनविभागाने घेतला शोधपाच पथकांनी घेतले परिश्रम

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: येऊरच्या जंगलामध्ये गिर्यारोहणासाठी गेल्यानंतर भरकटलेल्या कुणाल संजय जाधव (२१, रा. वसंत विहार, ठाणे), शार्दूल लिंगायत (२१, रा. वसंतविहार, ठाणे) आणि अनिकेत गुप्ता (२१, वसंतविहार, ठाणे) या तिघांचा शोध घेण्यात चितळसर पोलीस आणि वनविभागाला मंगळवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास यश आले. रात्रीच्या काळोखात तब्बल आठ ते नऊ तास ही शोध मोहीम संयुक्तपणे राबविण्यात आली.अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे संजय, शार्दूल आणि अनिकेत हे तिघेही मित्र ठाण्यातील वसंत विहार या एकाच परिसरात वास्तव्याला आहेत. ते २८ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास येऊरच्या जंगलात फिरण्यासाठी आणि गिर्यारोहणासाठी गेले होते. ते दुपारी घरी येणार होते. परंतू, जंगलात आत शिरल्यानंतर परतीचा मार्ग न मिळाल्याने ते आत चार ते पाच किलोमीटरच्या परिसरात भरकटले. येऊरच्या धबधब्यापासून जवळच रस्ता चुकल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्यापैकी शार्दूल याने त्यांच्या कुटूंबियांना सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास आम्ही जंगलात रस्ता चुकलो, असल्याचा मेसेज केला. त्याच आधारे या तिघांच्या पालकांनी चितळसर पोलीस आणि येऊर वनविभागाला ही माहिती दिली. सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शशिकांत रोकडे, पोलीस हवालदार रंगराव पाटील, पोलीस नाईक सतिश सुर्वे आणि सचिन भंडगर तसेच येऊर परिमंडळ वनअधिकारी विकास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली येऊर क्षेत्र वनअधिकारी राजन खरात, वनरक्षक केशव बनसोडे तसेच काही वनमजूर आणि येऊर गावातील किशोर म्हात्रे यांच्यासह ३० जणांचा गट अशा पाच वेगवेगळया पथकांनी पाच दिशांना या तरुणांचा शोध घेतला. सुरुवातीला शार्दूल याने पाठविलेल्या मेसेजचे लोकेशन वसई मिळाले. त्यामुळे तिकडेही एका पथकाने शोध घेतला. सुरुवातीला सायंकाळी ६.३० ते २९ सप्टेंबर रोजी पहाटे १.३० अशी सलग सात तासांची शोध मोहीम घेऊनही ते मिळाले नाही. एक तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा येऊरच्या दबदब्याच्या दिशेने त्यांचा शोध घेतला त्यावेळी हे तिघेही दबदब्यापासून जवळच पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास सुखरुप मिळाले. या तिघांनाही पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केल्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोकडे यांनी सांगितले. मुळात, येऊर हे राखीव वनक्षेत्र असल्यामुळे या तिघांनीही वन विभागाची नजर चुकवून बेकायदेशीरपणे आत प्रवेश केला. त्यातच ते भरकटल्यामुळे हा प्रकार घडला. परंतू, ते सुखरुप मिळाल्याने त्यांच्या पालकांनी पोलीस, वनविभागाग आणि येऊरच्या ग्रामस्थांचे आभार मानले आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेforestजंगलMissingबेपत्ता होणं