शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

येऊरच्या जंगलात भरकटलेली तीन मुले आठ तासांच्या प्रदीर्घ शोध मोहिमेनंतर सुखरुप मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 23:46 IST

गिर्यारोहणासाठी गेल्यानंतर ठाण्याच्या येऊरच्या जंगलात भरकटलेल्या कुणाल संजय जाधव (२१), शार्दूल लिंगायत (२१) आणि अनिकेत गुप्ता (२१) या तिघांचा शोध घेण्यात चितळसर पोलीस आणि वनविभागाला मंगळवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास यश आले. तब्बल आठ तास पाच पथकांनी ही शोध मोहीम राबविली.

ठळक मुद्दे पोलीस आणि वनविभागाने घेतला शोधपाच पथकांनी घेतले परिश्रम

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: येऊरच्या जंगलामध्ये गिर्यारोहणासाठी गेल्यानंतर भरकटलेल्या कुणाल संजय जाधव (२१, रा. वसंत विहार, ठाणे), शार्दूल लिंगायत (२१, रा. वसंतविहार, ठाणे) आणि अनिकेत गुप्ता (२१, वसंतविहार, ठाणे) या तिघांचा शोध घेण्यात चितळसर पोलीस आणि वनविभागाला मंगळवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास यश आले. रात्रीच्या काळोखात तब्बल आठ ते नऊ तास ही शोध मोहीम संयुक्तपणे राबविण्यात आली.अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे संजय, शार्दूल आणि अनिकेत हे तिघेही मित्र ठाण्यातील वसंत विहार या एकाच परिसरात वास्तव्याला आहेत. ते २८ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास येऊरच्या जंगलात फिरण्यासाठी आणि गिर्यारोहणासाठी गेले होते. ते दुपारी घरी येणार होते. परंतू, जंगलात आत शिरल्यानंतर परतीचा मार्ग न मिळाल्याने ते आत चार ते पाच किलोमीटरच्या परिसरात भरकटले. येऊरच्या धबधब्यापासून जवळच रस्ता चुकल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्यापैकी शार्दूल याने त्यांच्या कुटूंबियांना सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास आम्ही जंगलात रस्ता चुकलो, असल्याचा मेसेज केला. त्याच आधारे या तिघांच्या पालकांनी चितळसर पोलीस आणि येऊर वनविभागाला ही माहिती दिली. सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शशिकांत रोकडे, पोलीस हवालदार रंगराव पाटील, पोलीस नाईक सतिश सुर्वे आणि सचिन भंडगर तसेच येऊर परिमंडळ वनअधिकारी विकास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली येऊर क्षेत्र वनअधिकारी राजन खरात, वनरक्षक केशव बनसोडे तसेच काही वनमजूर आणि येऊर गावातील किशोर म्हात्रे यांच्यासह ३० जणांचा गट अशा पाच वेगवेगळया पथकांनी पाच दिशांना या तरुणांचा शोध घेतला. सुरुवातीला शार्दूल याने पाठविलेल्या मेसेजचे लोकेशन वसई मिळाले. त्यामुळे तिकडेही एका पथकाने शोध घेतला. सुरुवातीला सायंकाळी ६.३० ते २९ सप्टेंबर रोजी पहाटे १.३० अशी सलग सात तासांची शोध मोहीम घेऊनही ते मिळाले नाही. एक तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा येऊरच्या दबदब्याच्या दिशेने त्यांचा शोध घेतला त्यावेळी हे तिघेही दबदब्यापासून जवळच पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास सुखरुप मिळाले. या तिघांनाही पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केल्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोकडे यांनी सांगितले. मुळात, येऊर हे राखीव वनक्षेत्र असल्यामुळे या तिघांनीही वन विभागाची नजर चुकवून बेकायदेशीरपणे आत प्रवेश केला. त्यातच ते भरकटल्यामुळे हा प्रकार घडला. परंतू, ते सुखरुप मिळाल्याने त्यांच्या पालकांनी पोलीस, वनविभागाग आणि येऊरच्या ग्रामस्थांचे आभार मानले आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेforestजंगलMissingबेपत्ता होणं