शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
2
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
4
सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
5
Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर
6
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
7
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
8
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
9
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
10
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
11
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
12
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
13
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
14
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
15
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
16
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
17
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
18
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
19
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
20
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
Daily Top 2Weekly Top 5

येऊरच्या जंगलात भरकटलेली तीन मुले आठ तासांच्या प्रदीर्घ शोध मोहिमेनंतर सुखरुप मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 23:46 IST

गिर्यारोहणासाठी गेल्यानंतर ठाण्याच्या येऊरच्या जंगलात भरकटलेल्या कुणाल संजय जाधव (२१), शार्दूल लिंगायत (२१) आणि अनिकेत गुप्ता (२१) या तिघांचा शोध घेण्यात चितळसर पोलीस आणि वनविभागाला मंगळवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास यश आले. तब्बल आठ तास पाच पथकांनी ही शोध मोहीम राबविली.

ठळक मुद्दे पोलीस आणि वनविभागाने घेतला शोधपाच पथकांनी घेतले परिश्रम

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: येऊरच्या जंगलामध्ये गिर्यारोहणासाठी गेल्यानंतर भरकटलेल्या कुणाल संजय जाधव (२१, रा. वसंत विहार, ठाणे), शार्दूल लिंगायत (२१, रा. वसंतविहार, ठाणे) आणि अनिकेत गुप्ता (२१, वसंतविहार, ठाणे) या तिघांचा शोध घेण्यात चितळसर पोलीस आणि वनविभागाला मंगळवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास यश आले. रात्रीच्या काळोखात तब्बल आठ ते नऊ तास ही शोध मोहीम संयुक्तपणे राबविण्यात आली.अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे संजय, शार्दूल आणि अनिकेत हे तिघेही मित्र ठाण्यातील वसंत विहार या एकाच परिसरात वास्तव्याला आहेत. ते २८ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास येऊरच्या जंगलात फिरण्यासाठी आणि गिर्यारोहणासाठी गेले होते. ते दुपारी घरी येणार होते. परंतू, जंगलात आत शिरल्यानंतर परतीचा मार्ग न मिळाल्याने ते आत चार ते पाच किलोमीटरच्या परिसरात भरकटले. येऊरच्या धबधब्यापासून जवळच रस्ता चुकल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्यापैकी शार्दूल याने त्यांच्या कुटूंबियांना सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास आम्ही जंगलात रस्ता चुकलो, असल्याचा मेसेज केला. त्याच आधारे या तिघांच्या पालकांनी चितळसर पोलीस आणि येऊर वनविभागाला ही माहिती दिली. सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शशिकांत रोकडे, पोलीस हवालदार रंगराव पाटील, पोलीस नाईक सतिश सुर्वे आणि सचिन भंडगर तसेच येऊर परिमंडळ वनअधिकारी विकास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली येऊर क्षेत्र वनअधिकारी राजन खरात, वनरक्षक केशव बनसोडे तसेच काही वनमजूर आणि येऊर गावातील किशोर म्हात्रे यांच्यासह ३० जणांचा गट अशा पाच वेगवेगळया पथकांनी पाच दिशांना या तरुणांचा शोध घेतला. सुरुवातीला शार्दूल याने पाठविलेल्या मेसेजचे लोकेशन वसई मिळाले. त्यामुळे तिकडेही एका पथकाने शोध घेतला. सुरुवातीला सायंकाळी ६.३० ते २९ सप्टेंबर रोजी पहाटे १.३० अशी सलग सात तासांची शोध मोहीम घेऊनही ते मिळाले नाही. एक तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा येऊरच्या दबदब्याच्या दिशेने त्यांचा शोध घेतला त्यावेळी हे तिघेही दबदब्यापासून जवळच पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास सुखरुप मिळाले. या तिघांनाही पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केल्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोकडे यांनी सांगितले. मुळात, येऊर हे राखीव वनक्षेत्र असल्यामुळे या तिघांनीही वन विभागाची नजर चुकवून बेकायदेशीरपणे आत प्रवेश केला. त्यातच ते भरकटल्यामुळे हा प्रकार घडला. परंतू, ते सुखरुप मिळाल्याने त्यांच्या पालकांनी पोलीस, वनविभागाग आणि येऊरच्या ग्रामस्थांचे आभार मानले आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेforestजंगलMissingबेपत्ता होणं