शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
3
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
4
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
5
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
6
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
7
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
8
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
9
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
10
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
11
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
12
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
13
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
14
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
15
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
16
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
17
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
18
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
19
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

आणखी दोन महिने पाणीबाणी, पाणी कपातीचे प्रमाण आहे तेवढेच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 1:35 AM

आॅक्टोबरपासून पाणी कपात सक्तीने लागू केल्यामुळे धरण साठ्यात अपेक्षेपेक्षा जास्त पाणी साठा आहे. त्यामुळे कपात कमी करण्याचे धोरण अवलंबण्याची शक्यता होती; मात्र यंदाच्या पावसाला विलंब होण्याची दाट शक्यता आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : आॅक्टोबरपासून पाणी कपात सक्तीने लागू केल्यामुळे धरण साठ्यात अपेक्षेपेक्षा जास्त पाणी साठा आहे. त्यामुळे कपात कमी करण्याचे धोरण अवलंबण्याची शक्यता होती; मात्र यंदाच्या पावसाला विलंब होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पाणी कपातीचे प्रमाण न वाढवता आहे तेवढेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र पाणी कपात वाढणार नसली, तरी ती लवकर बंदही होणार नाही. सुरळीत पाणी पुरवठा साधारणत: १५ जुलैपर्यंत केला जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.सध्या जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि एमआयडीसी परिसरात आठवड्यातून तीस तास पाणी कपात लागू आहे. या पाणी कपातीचे धोरण सक्तीने राबवले जात आहे. या २२ टक्के पाणी कपातीमुळे बारवी व आंध्र धरणातील पाणी उपसा कमी झाला आहे. त्यामुळे धरणांमध्ये बऱ्यापैकी पाणी साठा शिल्लक आहे. त्याचा सुयोग्य वापर करण्यासाठी पाणी कपात कमी करण्याचे नियोजन होणार होते; मात्र निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत लागू केलेली पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेणे शक्य झाले नाही. याशिवाय आताचा हवामानाचा अंदाज घेता यंदाचा पाऊस लांबणीवर पडण्याची दाट शक्यता वर्तविली आहे. त्यावर मात करण्यासाठी आहे तीच कपात पुढेही सुरू ठेवण्याचे धोरण आवलंबण्यात येत असल्याचे पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट केले जात आहे.बारवी धरण व आंध्र धरणातील पाणी उल्हास नदीत सोडून त्यावर जिल्ह्यातील बहुतांश महापालिकांची तहान भागवली जात आहे. एमआयडीसी, स्टेम प्राधिकरण आणि महाराष्टÑ जीवन प्राधिकरण यांच्याव्दारे या पाण्याचा पुरवठा ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी आणि मीरा भार्इंदर महानगरपालिकांसह अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकांना होत आहे. या महापालिका व नगरपालिकांना त्यांच्या मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी पुरवठा केल्यामुळे बारवी धरणाच्या साठ्यात २२ टक्के पाण्याची तूट आॅक्टोबरमध्ये उघड झाली. त्यामुळे ३० तासाची पाणी कपात सक्तीने लागू केली आणि ती पूर्ण करण्यासाठी ठिकठिकाणच्या नागरिकांना वेगवेगळ्या दिवशी कपातीला तोंड द्यावे लागत आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात या कपातीत वाढ होण्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. पण तसे न होता आहे तीच कपात ठेवण्याचे धोरण स्विकारले जाणार आहे.सक्तीमुळे झाला मुबलक साठा, चोरी थांबलीसक्तीच्या पाणी कपातीसह पाणी चोरी बंद करण्यासाठी सक्तीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या. त्यामुळे मंजूर पाणी कोट्यातून आठवडाभर सुमारे २६२.२४ एमएलडी पाण्याची बचत करणे शक्य झाले. एवढेच नव्हे, तर रोज होणारी ३०० एमएलडीपेक्षा जास्त पाण्याची चोरीदेखील थांबवणे शक्य झाले.एमआयडीसीने ५८३ एमएलडी या मंजूर पाणी पुरवठ्यापेक्षा ७५० ते ८०० एमएलडी, तर केडीएमसीने २३४ मंजूर कोट्यापेक्षा सुमारे ३०० एमएलडी जास्त पाणी उचलल्याची नोंद आहे. या खालोखाल एमजेपीने ९०एमएलडीपेक्षा जास्त व टेमघरने २८५ या मंजूर कोट्यापेक्षा जादा पाणी उचलल्यामुळे यंदा पावसाळा संपताच पाणी कपातीला तोंड द्यावे लागले.या सक्तीच्या उपाययोजनेमुळे मंजूर पाणी कोट्यापेक्षा एमआयडीसीच्या सुमारे २०० एमएलडी व कल्याण डोेंबिवली महापालिका (केडीएमसी) सुमारे ६६ एमएलडी जादा पाणी उचलण्यास काही अंशी आळा घालणे शक्य झाली आहे.

बारवीची पातळी ५७.७० मीटरबारवी धरणाच्या ६८.६० मीटर पातळीपैकी आज रोजी या धरणाची पातळी ५७.७० मीटर एवढी आहे. सध्या ३२.२४ टक्के पाणी साठा आहे.गेल्या वर्षी याच दिवशी तो ४३.५२ टक्के होता. त्यानुसार धरणातील मुबलक पाणी साठा लक्षात घेऊन पाणी कपात कमी करण्याचे नियोजन होते.परंतु पावसाळा लांबण्याचा अंदाज लक्षात घेऊन पाणी कपात आहे तशीच ठेवण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांनी नियमानुसार सुमारे एक हजार १९२ दश लक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलणे अपेक्षित होते.प्रत्यक्षात एक हजार ५२१ एमएलडी पाणी उचलण्यात आले. सुमारे ३२९ एमएलडी जादा पाण्याची चोरी रोज करण्यात आली होती. यामुळे बारवी धरणाच्या पाणी साठ्यात २२ टक्के तूट उघड झाली. ती भरून काढण्यासाठी आॅक्टोबरपासून ही कपात लागू झाली होती.

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे