शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

बोटीवर दोन खलाशी नवीन आल्याने झाला गोंधळ

By धीरज परब | Updated: April 3, 2023 16:21 IST

मासेमारी न करताच माघारी फिरावे लागल्याने नाखवाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - भाईंदरच्या उत्तन येथील जलराणी बोटीवर दोन खलाशी नव्याने आले होते. त्यामुळे मासेमारी साठी जाताना सोबत त्यांच्या आधारकार्डच्या छायांकित प्रति नसल्याने गोंधळ उडाला असल्याचे समोर आले आहे. पण यात मासेमारी न करताच माघारी फिरावे लागल्याने नाखवाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मासेमारी साठी जाताना बोटीच्या परवान्यासह नाखवा, खलाशी यांचे ओळखपत्र म्हणून आधारकार्ड च्या छायांकित प्रति मच्छीमार सोबत नेत असतात. मात्र उत्तनची जलराणी बोट मासेमारी साठी समुद्रात गेली असता नाखवा बेन्हार जॉनी बुटी व त्यांचा मुलगा सोनीसोन  तसेच अन्य १३ खलाशी मिळून १५ जण बोटीवर होते.  त्यातील दोन खलाशी आयत्यावेळी बदली वर आल्याने त्यांची आधारकार्ड ची प्रत सोबत नेण्यास नाखवा विसरले. 

समुद्रातील तेल विहरीच्या जवळ शनिवारी सकाळी मासेमारी जाळी  टाकून ते थांबले असता ८.३० च्या सुमारास नौदलाच्या बोटीने त्यांना हटकले. दोन खलाशीची ओळखपत्रे नसल्याने बोट थांबवण्यास सांगितले. नंतर तटरक्षक दलाची बोट आली असता त्यांनी तपासणी सुरू केली. जेव्हा उत्तन सागरी पोलिसां मार्फत त्या दोन खलाशिंची ओळख पटल्यावर सायंकाळी ४ वाजता बोट सोडण्यात आल्याची माहिती सोनीसोन यांनी दिली. 

त्यातच बोटीवर पाकिस्तानी नागरिक असल्याची अफवा पसरून तणाव व गोंधळ निर्माण झाला. शनिवारी रात्री बोट किनारी आल्यावर पोलिसांनी चौकशी करून जबजबाब नोंदवले.

या घटने मुळे मानसिक त्रास तर झालाच पण मासेमारी न करताच परतावे लागल्याने आर्थिक नुकसान सुद्धा झाले आहे. खलाशी यांचा पगार द्यावा लागलाच शिवाय डिझेल, बर्फ, किराणा आदी वाया गेल्याने सुमारे २ लाखांचे नुकसान झाल्याचे सोनीसोन म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक