शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
3
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
5
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
6
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
7
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
8
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
9
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
10
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
11
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
12
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
13
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
14
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
15
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
16
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
17
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
19
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
20
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार

बोटीवर दोन खलाशी नवीन आल्याने झाला गोंधळ

By धीरज परब | Updated: April 3, 2023 16:21 IST

मासेमारी न करताच माघारी फिरावे लागल्याने नाखवाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - भाईंदरच्या उत्तन येथील जलराणी बोटीवर दोन खलाशी नव्याने आले होते. त्यामुळे मासेमारी साठी जाताना सोबत त्यांच्या आधारकार्डच्या छायांकित प्रति नसल्याने गोंधळ उडाला असल्याचे समोर आले आहे. पण यात मासेमारी न करताच माघारी फिरावे लागल्याने नाखवाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मासेमारी साठी जाताना बोटीच्या परवान्यासह नाखवा, खलाशी यांचे ओळखपत्र म्हणून आधारकार्ड च्या छायांकित प्रति मच्छीमार सोबत नेत असतात. मात्र उत्तनची जलराणी बोट मासेमारी साठी समुद्रात गेली असता नाखवा बेन्हार जॉनी बुटी व त्यांचा मुलगा सोनीसोन  तसेच अन्य १३ खलाशी मिळून १५ जण बोटीवर होते.  त्यातील दोन खलाशी आयत्यावेळी बदली वर आल्याने त्यांची आधारकार्ड ची प्रत सोबत नेण्यास नाखवा विसरले. 

समुद्रातील तेल विहरीच्या जवळ शनिवारी सकाळी मासेमारी जाळी  टाकून ते थांबले असता ८.३० च्या सुमारास नौदलाच्या बोटीने त्यांना हटकले. दोन खलाशीची ओळखपत्रे नसल्याने बोट थांबवण्यास सांगितले. नंतर तटरक्षक दलाची बोट आली असता त्यांनी तपासणी सुरू केली. जेव्हा उत्तन सागरी पोलिसां मार्फत त्या दोन खलाशिंची ओळख पटल्यावर सायंकाळी ४ वाजता बोट सोडण्यात आल्याची माहिती सोनीसोन यांनी दिली. 

त्यातच बोटीवर पाकिस्तानी नागरिक असल्याची अफवा पसरून तणाव व गोंधळ निर्माण झाला. शनिवारी रात्री बोट किनारी आल्यावर पोलिसांनी चौकशी करून जबजबाब नोंदवले.

या घटने मुळे मानसिक त्रास तर झालाच पण मासेमारी न करताच परतावे लागल्याने आर्थिक नुकसान सुद्धा झाले आहे. खलाशी यांचा पगार द्यावा लागलाच शिवाय डिझेल, बर्फ, किराणा आदी वाया गेल्याने सुमारे २ लाखांचे नुकसान झाल्याचे सोनीसोन म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक