शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

...तर पालिकेसमोर गाळ टाकू, विक्रांत चव्हाण यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:21 AM

काँग्रेस-राष्टÑवादीचा इशारा : विक्रांत चव्हाण यांचे उपोषण

ठाणे : पहिल्याच पावसात ठाणे महापालिकेच्या नालेसफाईच्या कामांची पोलखोल झाली असून त्याचा नाहक त्रास ठाणेकरांना सहन करावा लागला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी बुधवारी ठाणे शहर काँग्रेसने वर्तकनगर प्रभाग समिती समोर एक दिवसाचे उपोषण केले. त्याला राष्ट्रवादीने सुद्धा पाठिंबा दिला. शिवाय यापुढे जर पुन्हा शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली तर नाल्यातील गाळ पालिका मुख्यालयसमोर टाकला जाईल, असा इशाराही यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आला.

सोमवारी झालेल्या तासाभराच्या पावसातच ठाणे शहरातील अनेक भाग जलमय झाले होते. पालकमंत्र्यांच्या घरात आणि आयुक्तांच्या बंगल्यासमोरही पाणीच पाणी अशी स्थिती निर्माण झाली होती. तर शहरातील वर्तकनगर, नौपाड्यातील चिखलवाडी परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे महापालिकेने केलेल्या टुकार नालेसफाईच्या विरोधात बुधवारी काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी एक दिवसाचे लाक्षणकि उपोषण केले. त्याला आनंद परांजपे यांनी भेट दिली. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते हणमंत जगदाळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रभाकर सावंत, रवींद्र पालव, नितीन पाटील, काँग्रेसचे सचिन शिंदे, राजेश जाधव, प्रदीप राव आदी उपस्थित होते. यावेळी ठामपा उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे निवेदन स्वीकारले.यावेळी चव्हाण नालेसफाई योग्य झालेली नसून कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोपही केला. खुद्द पालकमंत्र्यांच्या घरात पाणी शिरल्याने ते काढण्यासाठीच हे उपोषण केले असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या नालेसफाईच्या कामांच्या निविदासुद्धा उशिराने काढल्याने पालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका ठाणेकरांना बसला असून या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पालिका आयुक्तांनी यामध्ये लक्ष घालून नालेसफाईच्या कामांची चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्याविरोधात कारवाईची मागणीही त्यांनी केली.अधिकाऱ्यांचे ठेकेदारांशी संगनमतराष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष परांजपे म्हणाले की, साधारणपणे ३१ मे पर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याची गरज असतानाही ती कामे पूर्ण झालेली नव्हती. त्यामुळेच सोमवारी रात्री अवघ्या एक तासाच्या पावसामुळे पालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली. वर्तकनगर, नौपाडा आणि मुंब्रा प्रभाग समितीअंतर्गत असलेल्या अनेक भागांमध्ये पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या.च्गेल्या वर्षी अतिवृष्टीत संभाजीनगर भागातून एक महिला नाल्यातून वाहून गेली होती. तरीही, प्रशासनाला आणि सत्ताधारी शिवसेनेला त्याचे सोयरसुतक नव्हते. अनेक वर्षे एकाच ठिकाणी बसलेल्या या अधिकाऱ्यांचे ठेकेदारांशी हितसंबध असल्याने ते ठेकेदारांवर मेहरनजर करीत आहेत. त्यातूनच नालेसफाई झाली नसतानाहीत्यांना अभय दिले जात असल्याचा आरोप परांजपे यांनी केला. 

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेस