शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

विश्वासावरच सर्व जग अवलंबून, अविश्वासातून होते संशयाची निर्मिती- श्री श्री रविशंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 09:47 IST

‘उल्हास उत्सव’ सोहळ्यातून अध्यात्मिक जागर

लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर: जीवनात विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. विश्वासासाठी ज्ञान आणि विज्ञान या दोन्हींवरही विश्वास ठेवावा लागतो. विश्वासावर सर्व जग अवलंबून असून, अविश्वास आल्यास संशय निर्माण होतो. योग, ध्यान आणि प्राणायाम यामुळे आपल्या जीवनात कौशल्य, प्राविण्य येते. त्यातून कोणत्याही कामात यशस्वी होऊ शकतो. यशामुळे साहजिकच जीवन अधिक सुंदर होते, अशा शब्दांत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक आणि प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी यशस्वी जीवनाचा मंत्र सांगितला.

उल्हासनगरमधील गायकवाड पाडा येथे मंगळवारी सायंकाळी ‘उल्हास उत्सव’ या अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

श्री श्री रविशंकर यांची गुरुवाणी ऐकण्यासाठी परिसरातून जनसागर लोटला होता. तणावमुक्त जीवन, ध्यान, अध्यात्मिक शक्ती याबाबत विवेचन करताना त्यांनी विश्वास सर्वांत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. मानवी जीवनात आनंद आणि शांतता मिळवण्यासाठी ध्यानाशिवाय पर्याय नाही, असा संदेश त्यांनी दिला.

आत्मविश्वास तीन प्रकारचा आहे. दुसऱ्यावर विश्वास ठेवल्याने जीवनाला गती मिळते. योग करण्यासाठी मन शुद्ध असणे गरजेचे आहे. भारतीय म्हणून आपण सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी भाविकांनी विचारलेल्या प्रश्नांचे श्री श्री रविशंकर यांनी निरसन केले. श्री श्री रविशंकर यांच्या गुरुवाणीने भक्त मंत्रमुग्ध झाले होते. सर्व वातावरण अध्यात्मिक झाले होते.

सिंधी समाजाच्या डीएनएमध्ये व्यापार

फाळणीच्या वेळी सिंधी समाजाला जन्मभूमी सोडावी लागली. मात्र, आज सिंधी समाज जगभर सामावला आहे. सिंधी समाजाच्या डीएनएमध्ये व्यवसाय आहे. नोकरी करणारा सिंधी माणूस असू शकत नाही, असे साधारणपणे म्हटले जाते. दक्षिण भारतातील माणूस नोकरीत रमतो, असे ते म्हणाले.

महाराष्ट्राचे मोठे मन

महाराष्ट्राचा माणूस प्रांतवाद सोडून देशवासी बनलेला आहे. महाराष्ट्राचे मन मोठे आहे. विठ्ठलावर सर्व महाराष्ट्राची श्रद्धा आहे. पंढरपूरचा विठोबा सर्व भारताचे दैवत आहे, असेही ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Trust sustains the world; distrust breeds doubt: Sri Sri Ravi Shankar.

Web Summary : Sri Sri Ravi Shankar emphasized trust's importance, linking it to knowledge and science. He highlighted yoga, meditation, and pranayama for skill development and success. He praised Maharashtra's inclusivity and the widespread devotion to Lord Vithoba.
टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर