सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर खूनी हल्ला करणाऱ्या आराेपीला सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा
By जितेंद्र कालेकर | Updated: June 20, 2025 17:53 IST2025-06-20T17:53:29+5:302025-06-20T17:53:42+5:30
पिंपळे याच्या हाताची फेरीवाल्याने छाटली होती बोटे: वाढीव शिक्षेसाठी उच्च न्यायालयात दाद मागणार- ॲड शिशिर हिरे

सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर खूनी हल्ला करणाऱ्या आराेपीला सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा
ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या तत्कालीन सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर चाकूने खूनी हल्ला करुन त्यांच्या हाताची बाेटे छाटणाऱ्या आराेपी अमरजित सिंह यादव याला ठाणे न्यायालयाने सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा शुक्रवारी सुनावली. आराेपीला आणखी शिक्षा मिळण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी दिली.
पिंपळे या ३० ॲागस्ट २०२१ राेजी काेविडच्या काळात पथकासह कासारवडवलीतील मार्केट परिसरात अनाधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईसाठी गेल्या हाेत्या. त्यावेळी यादव या फेरीवाल्याने पिंपळे यांच्यासह त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला हाेता. यामध्ये पिंपळे यांची तीन बाेटे तर पालवे यांचे एक बाेट यात कापले गेले हाेते. या गंभीर हल्ल्यात पिंपळे यांची बोटे तुटून खाली पडली होती. त्यांच्या डाेक्यालाही मार लागला हाेता.
कासारवडवली पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी यादव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. याच खटल्याची सुनावणी २० जून २०२५ राेजी ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आशुताेष भागवत यांच्या न्यायालयात झाली. पिंपळे यांच्यावरील जखमा या जीवघेण्या नसल्या तरी आराेपीचा हेतू जीवघेणा हाेता. हा हल्ला मर्मस्थळांवर नसला तरी हात मध्ये आल्यानेच मर्मस्थळांवरील हल्ला वाचला. शिवाय, हल्लेखाेर वारंवार हल्ला करीत हाेता, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याचे ॲड. हिरे यांनी सांगितले.
अंगरक्षक पालवे यांच्यावरही खूनी हल्ला झाला. पिंपळे यांना या हल्ल्यातून वाचविनंतरही आराेपीने त्यांना दमदाटी केली हाेती. सर्व साक्षी पुराव्याच्या आधारे खूनाचा प्रयत्नाच्या कलमाखाली सात वर्षांची सक्तमजूरी, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला- तीन वर्ष सक्तमजूरी, सुरक्षा धाेक्यात आणणे-कलम ३३७ नुसार दाेन वर्ष आणि आर्म ॲक्ट खाली दाेन वर्ष सक्तमजूरीची शिक्षा सुनावली. विशेष सरकारी वकील हिरे यांच्यासह विजय मुंडे आणि संजय काेकणे यांनीही आराेपीला शिक्षा हाेण्यासाठी भक्कमपणे बाजू मांडली. तर आराेपीच्या बाजूने ॲड. आशिष पांडे यांनी बाजू मांडली.
‘‘हल्लेखाेर याने जीवघेणा हल्ला करुन खूनाचा प्रयत्न केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. त्यामुळेच त्याला सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली. परंतू, तरीही ही शिक्षा कमी असल्याने उच्च न्यायालयातही आराेपीला आणखी शिक्षा मिळण्यासाठी दाद मागणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यावरील हल्ल्याची ही ठाण्यातील पहिलीच शिक्षा आहे.-ॲड. शिशिर हिरे, विशेष सरकारी वकील, ठाणे.