शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनच्या जनसुनावणीस ठाणेकरांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 4:33 AM

ठाणे : मुंबई-नागपूर (बुलेट ट्रेन) हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या दृष्टीने पर्यावरण आणि सामाजिक या विषयावर जनमत व सार्वजनिक सल्ला मसलतीची ...

ठाणे : मुंबई-नागपूर (बुलेट ट्रेन) हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या दृष्टीने पर्यावरण आणि सामाजिक या विषयावर जनमत व सार्वजनिक सल्ला मसलतीची बैठक शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे पार पडली. जिल्ह्यातील ५६ गावे या प्रकल्पाने बाधित होत आहेत. त्यास अनुसरून नागरिकांची मते जाणून घेऊन ही सुनावणी पार पडली. मात्र, यावेळी फारच कमी जिल्हावासीयांनी उपस्थित दर्शविली. अनेकांनी दांडी मारल्याने सभागृह रिकामे होते.

या स्पीड रेल्वे प्रकल्पाने जिल्ह्यातील ५६ गाव या बाधित होणार आहेत. यामध्ये शहापूर तालुक्यातील २८ गावे, कल्याण तालुक्यातील सात आणि भिवंडी तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे. या गावांतील भूमिपुत्र, शेतकरी, गावकऱ्यांपर्यंत जिल्ह्यातील पर्यावरण व सामाजिक विषयावर काम करणाऱ्या संस्था, तसेच तज्ज्ञ, जागरूक नागरिक आदींना या सुनावणीला उपस्थित राहणे आवश्यक होते, पण यावेळी फारसा प्रतिसाद दिसून आला नाही. केवळ जिल्ह्याभरातून आठ ते नऊ जणच उपस्थित होते. उपस्थिती कमी असल्याने बैठक सुरू होण्यास दुपारचे तीन वाजले.

या बैठकीला प्रारंभ होण्यापूर्वीच कल्याणच्या फळेगाव येथील चार ते पाच जागरूक भूमिपूत्र, गावकरी निघून गेले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी प्रशांत सूर्यवंशी यांना बैठक पुढे ढकलण्यात यावी, याबाबत निवेदन दिले. त्यांनी निवेदन स्वीकारले, पण बैठक पुढे ढकलण्यात येणार नाही, असे स्पष्ट सांगितले होते, असे येथील उपस्थितांपैकी गिरीश साळगांवकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील उपस्थित बाधित गावातील भूमिपुत्र, शेतकरी, गावकरी, पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था व कार्यकर्ते याच्या सर्वाच्या वतीने सविस्तर सर्व मुद्दे बैठकीत उपस्थित करण्यात आले.

हा स्पीड रेल्वे प्रकल्प प्रस्तावित सुरू करण्यापूर्वी (डीपीआर) डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचे काम सुरू आहे. या विवाद क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था, कार्यकर्ते, स्थानिक भूमिपुत्रांच्या सल्लामसलतीची नितांत आवश्यकता आहे. ही उणीव राहू नये व भविष्यातील संघर्ष टाळावा, या उद्देशाने बैठक पुढे ढकलण्यात यावी व व्यापक स्वरूपात जनजागृती करावी, ही तोंडी व लेखी विनंती कोळीवाडे गावठाण सेवा समिती व‌ ठाणे शहर गावठाण कोळीवाडे पाडे संवर्धन समितीच्या वतीने साळगांवकर यांनी केली, पण त्यानंतरही सुनावणी रद्द केली नाही, असे त्यांनी सांगितले.