शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

ठाणेकरांना हवे आहेत आणखी साडेपाच हजार तरुण पोलिस; पोलिस महासंचालकांकडे प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 06:53 IST

पोलिस महासंचालकांकडे प्रस्ताव: शासनाकडून मंजुरीची प्रतीक्षा

- जितेंद्र कालेकरठाणे : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील व्हीआयपी बंदोबस्त, गुन्ह्यांचा निपटारा करताना ठाणे शहर पोलिसांची दमछाक होत असल्याने ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातील ३५ पोलिस ठाण्यांसाठी ५० टक्के वाढीव म्हणजे पाच हजार ४९७ इतक्या अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी पोलिस महासंचालकांकडे प्रस्तावित आहे. त्याचबरोबर सहा नवीन पोलिस ठाण्यांचा प्रस्ताव दिला आहे. हे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ठाणे पोलिसांची कार्यक्षमता वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे.

पूर्वीच्या ठाणे ग्रामीणमधून ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाची १९८१ मध्ये निर्मिती झाली. त्यावेळी जेमतेम चार ते पाच हजारांचे संख्याबळ आयुक्तालयाच्या पोलिसांचे होते. त्यावेळी आयुक्तपदही विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाचे होते. ठाणे आयुक्तालयाने सुमारे साडेपाच हजार इतक्या अतिरिक्त मनुष्यबळाचा प्रस्ताव महासंचालक कार्यालयात ऑगस्ट २०२३ मध्ये पाठविला आहे. यातील दोन हजार १४१ कर्मचारी हे ३५ पोलिस ठाण्यांसाठी दिले जातील. 

अशी आहे ठाण्यातील सध्याची स्थितीआता आयुक्तपद पोलिस महासंचालक दर्जाचे झाले. त्याशिवाय, सहआयुक्तांसह चार अतिरिक्त पोलिस आयुक्त, ११ उपायुक्त, ३० सहायक आयुक्त, १८२ निरीक्षक  आणि २३९ सहायक पोलिस निरीक्षक असे ९२५ अधिकारी तसेच सुमारे नऊ हजार कर्मचारी असे दहा हजार ६६ पोलिसांचे संख्याबळ आयुक्तालयात तूर्त आहे. हे सर्व ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या  पाच परिमंडळातील ३५ पोलिस ठाण्यासह गुन्हे अन्वेषण, विशेष शाखा आणि वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. आता ही संख्या रोजचा बंदोबस्त, कायदा सुव्यवस्था, गुन्ह्यांचा शोध आणि वाहतूक नियंत्रणासाठी अत्यंत तोकडी पडत आहे. वाहतूक विभागासाठी तर ८०० कर्मचाऱ्यांची गरज आहे.

पोलिस ठाण्यांची संख्या ४१ होणार

वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि गुन्हेगारी त्याचबरोबर भौगोलिक परिस्थिती गुन्हेगारी नियंत्रण, कायदा सुव्यवस्था तसेच रस्ते अपघात अशा सर्वच अनुषंगाने विचार केल्यास ठाणे आयुक्तालयात आणखी सहा पोलिस ठाण्यांची गरज आहे. संवेदनशील मुंब्रा पोलिस ठाण्याचे विभाजन करुन नवीन दिवा, भिवंडीतील नारपोलीमधून दापोडे, शांतीनगरचे विभाजन करुन वंजारपट्टी तसेच शांतीनगर आणि नारपोली या दोन पोलिस ठाण्यांमधून मानसरोवर तर कल्याणच्या मानपाडा पोलिस ठाण्याच्या विभाजनातून काटई आणि उल्हासनगरच्या हिललाईनमधून नेवाळी या सहा पोलिस ठाण्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे. या सहा पोलिस ठाण्यांसाठी ६६४ इतक्या वाढीव कर्मचाऱ्यांचीही  गरज लागणार आहे. या पोलिस ठाण्यांच्या जागेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातही प्रस्ताव दिला आहे. शासन मंजुरी मिळाल्यानंतर पोलिस ठाण्यांची संख्याही ३५ वरून ४१ होणार आहे. 

टॅग्स :Policeपोलिसthaneठाणे