शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

ठाणेकरांना हवे आहेत आणखी साडेपाच हजार तरुण पोलिस; पोलिस महासंचालकांकडे प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 06:53 IST

पोलिस महासंचालकांकडे प्रस्ताव: शासनाकडून मंजुरीची प्रतीक्षा

- जितेंद्र कालेकरठाणे : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील व्हीआयपी बंदोबस्त, गुन्ह्यांचा निपटारा करताना ठाणे शहर पोलिसांची दमछाक होत असल्याने ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातील ३५ पोलिस ठाण्यांसाठी ५० टक्के वाढीव म्हणजे पाच हजार ४९७ इतक्या अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी पोलिस महासंचालकांकडे प्रस्तावित आहे. त्याचबरोबर सहा नवीन पोलिस ठाण्यांचा प्रस्ताव दिला आहे. हे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ठाणे पोलिसांची कार्यक्षमता वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे.

पूर्वीच्या ठाणे ग्रामीणमधून ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाची १९८१ मध्ये निर्मिती झाली. त्यावेळी जेमतेम चार ते पाच हजारांचे संख्याबळ आयुक्तालयाच्या पोलिसांचे होते. त्यावेळी आयुक्तपदही विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाचे होते. ठाणे आयुक्तालयाने सुमारे साडेपाच हजार इतक्या अतिरिक्त मनुष्यबळाचा प्रस्ताव महासंचालक कार्यालयात ऑगस्ट २०२३ मध्ये पाठविला आहे. यातील दोन हजार १४१ कर्मचारी हे ३५ पोलिस ठाण्यांसाठी दिले जातील. 

अशी आहे ठाण्यातील सध्याची स्थितीआता आयुक्तपद पोलिस महासंचालक दर्जाचे झाले. त्याशिवाय, सहआयुक्तांसह चार अतिरिक्त पोलिस आयुक्त, ११ उपायुक्त, ३० सहायक आयुक्त, १८२ निरीक्षक  आणि २३९ सहायक पोलिस निरीक्षक असे ९२५ अधिकारी तसेच सुमारे नऊ हजार कर्मचारी असे दहा हजार ६६ पोलिसांचे संख्याबळ आयुक्तालयात तूर्त आहे. हे सर्व ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या  पाच परिमंडळातील ३५ पोलिस ठाण्यासह गुन्हे अन्वेषण, विशेष शाखा आणि वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. आता ही संख्या रोजचा बंदोबस्त, कायदा सुव्यवस्था, गुन्ह्यांचा शोध आणि वाहतूक नियंत्रणासाठी अत्यंत तोकडी पडत आहे. वाहतूक विभागासाठी तर ८०० कर्मचाऱ्यांची गरज आहे.

पोलिस ठाण्यांची संख्या ४१ होणार

वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि गुन्हेगारी त्याचबरोबर भौगोलिक परिस्थिती गुन्हेगारी नियंत्रण, कायदा सुव्यवस्था तसेच रस्ते अपघात अशा सर्वच अनुषंगाने विचार केल्यास ठाणे आयुक्तालयात आणखी सहा पोलिस ठाण्यांची गरज आहे. संवेदनशील मुंब्रा पोलिस ठाण्याचे विभाजन करुन नवीन दिवा, भिवंडीतील नारपोलीमधून दापोडे, शांतीनगरचे विभाजन करुन वंजारपट्टी तसेच शांतीनगर आणि नारपोली या दोन पोलिस ठाण्यांमधून मानसरोवर तर कल्याणच्या मानपाडा पोलिस ठाण्याच्या विभाजनातून काटई आणि उल्हासनगरच्या हिललाईनमधून नेवाळी या सहा पोलिस ठाण्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे. या सहा पोलिस ठाण्यांसाठी ६६४ इतक्या वाढीव कर्मचाऱ्यांचीही  गरज लागणार आहे. या पोलिस ठाण्यांच्या जागेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातही प्रस्ताव दिला आहे. शासन मंजुरी मिळाल्यानंतर पोलिस ठाण्यांची संख्याही ३५ वरून ४१ होणार आहे. 

टॅग्स :Policeपोलिसthaneठाणे