लोकचळवळ ठरलेल्या वनराई बंधाऱ्यांसाठी ठाणे जि.प.कडून अधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 07:11 PM2019-12-29T19:11:13+5:302019-12-29T19:19:47+5:30

ठाणे : यंदाच्या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे (सीईओ) यांनी ...

Thane ZP congratulates the officers for the demolition of Vanarai Bandh. | लोकचळवळ ठरलेल्या वनराई बंधाऱ्यांसाठी ठाणे जि.प.कडून अधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव

गावाच्या पाण्यासाठी वनराई बंधारे श्रमदानातून बांधत असल्याचे लक्षात घेऊन ग्राम पंचायतींच्या सदस्यांनी व ग्रावकऱ्यांनी देखील त्यात हिरीरीने सहभाग

Next
ठळक मुद्दे तालुक्यांमध्ये आतापर्यंत १५०० च्या जवळपासून वनराई बंधारे बांधलेजिल्ह्यातील गावखेड्यांमध्ये वनराई बंधारे बांधण्याची आताही लोकचळवळ हा उपक्रम राज्य पातळीवर राबण्यासाठी प्रयत्न

ठाणे : यंदाच्या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्याच्या दृष्टीनेठाणेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे (सीईओ) यांनी ग्राम पंचायत विभागाव्दारे जिल्ह्यातील नदी, नाले, ओवळ आदींवर वनराई बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला. लोकसहभागातून सुरू केलेला हा उपक्रम जिल्ह्यात लोकचळवळ ठरला आहे. त्याची दखल घेत ठाणे जिल्हा परिषदेने अभिनंदनाचा ठराव घेऊन सीईओंसह अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. गावखे्यांसाठी नवसंजीवनी ठरलेला हा उपक्रम राज्य पातळीवर राबण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
        जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या तालुक्यांमध्ये आतापर्यंत १५०० च्या जवळपासून वनराई बंधारे बांधले आहेत. एक पैसाही खर्च न करता लोकसहभागातून या वनराई बंधाऱ्यांचे कामे सीईओ यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.बी. नेमाणे यांच्या नियंत्रणात ग्राम पंचायतींचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी हाती घेतले. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी,                          कर्मचाऱ्यांरी आपल्या गावाच्या पाण्यासाठी वनराई बंधारे श्रमदानातून बांधत असल्याचे लक्षात घेऊन ग्राम पंचायतींच्या सदस्यांनी व ग्रावकऱ्यांनी देखील त्यात हिरीरीने सहभाग घेतला. जिल्ह्यातील गावखेड्यांमध्ये वनराई बंधारे बांधण्याची आताही लोकचळवळ झाली आहे.या यशस्वी उपक्रमाची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दीपाली पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेत सदस्य सुभाष घरत यांनी अधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठरावा मांडला असता त्यास सर्वांनी सहमती दर्शविली.
          या वनराई बंधाऱ्यांमध्ये अडवण्यात आलेल्या पाण्याचा वापर रब्बी व पालेभाज्याचे उत्पन्न घेण्यासाठी होऊ शकतो. याशिवाय विहितील पाण्याची साठवण क्षेमता वाढण्यास व पाणी टिकवून ठेवण्यास मदत होत आहे. जंगलातील माळरानावरील पशूपक्ष, गायी, म्हशी, आदी जनावराच्या पाण्यासाठी या बंधाऱ्यांचा उपयोग होत आहे. गावखेड्यांची संभाव्य पाणी टंचाईचा काळ पुढे गेला आहे. वाहून जाणाऱ्यां या पाण्याचा वनराई बंधाऱ्यांमुळे वापर करणे सहज शक्य झाले आहे. याशिवाय यासाठी कोणताही निधी खर्च झाला नाही. यासाठी लागलेल्या काही लाख सिमेंटच्या रिकाम्या गोण्याही महापालिका, बांधकाम विभाग, एमएमआरडीए आदींकडून मोफत मिळवलेल्या आहेत. त्यातून गावखेड्यांना पाणी समस्यापासून नवसंजीवनी देणाऱ्यां या वनराई बंधाºयांचा उपक्रम राज्यभर राबवण्यासाठी देखील जिल्हा परिषद राज्य शासनाकडे आग्रही धरणार आहे.

Web Title: Thane ZP congratulates the officers for the demolition of Vanarai Bandh.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.