शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
6
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
7
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
8
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
9
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
10
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
11
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
12
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
13
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
14
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
15
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
16
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
17
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
18
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
19
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
20
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे : पाणीगळतीवर उतारा वॉटर आॅडिटचा , २४ तास पाणी : पालिकेचा प्रस्ताव, ९५.४६ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:48 IST

ठाणे शहराला २४ बाय ७ पाणीपुरवठा होण्यासाठी आता महापालिकेने पावले उचलली आहेत. यानुसार, पाणीवितरण व्यवस्थेचे रिमॉडेलिंग, मीटर यंत्रणा बसवणे, जलवाहिन्या बदलणे या कामांसह आता महापालिका प्रथमच पाण्याचे आॅडिट करणार आहे.

ठाणे : ठाणे शहराला २४ बाय ७ पाणीपुरवठा होण्यासाठी आता महापालिकेने पावले उचलली आहेत. यानुसार, पाणीवितरण व्यवस्थेचे रिमॉडेलिंग, मीटर यंत्रणा बसवणे, जलवाहिन्या बदलणे या कामांसह आता महापालिका प्रथमच पाण्याचे आॅडिट करणार आहे. यामुळे शहरात कोणत्या स्रोतांकडून किती पाणी आले आणि किती वितरित झाले, मुख्य जलवाहिनीवरील गळती याची यामध्ये मोजणी केली जाणार आहे. सुरुवातीला पाणी आॅडिटचे काम हे पीपीपीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न होता. परंतु, आता ते स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करण्याचा पालिकेचा विचार आहे. यासाठीच्या ९५ कोटी ४६ लाख २७ हजार १६५ रुपये एवढ्या प्रस्तावित खर्चातील ७० टक्के हिस्सा हा स्मार्ट सिटीतून आणि ३० टक्के पालिकेच्या निधीतून केला जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव २० नोव्हेंबरच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.ठाणे शहराला आजघडीला विविध स्रोतांच्या माध्यमातून ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा रोज होत असून पाणीगळतीचे प्रमाण हे ४५ टककयांच्या आसपास आहे. पुरेसे पाणी असतानाही काही भागांना पाणीकपातीचा सामना करावा लागत असून पाण्याचे योग्य नियोजन नसल्यानेही पाणीवितरण व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. केवळ पाणीपुरवठ्यावर १८० कोटी रु पये वर्षाला खर्च केले जात आहेत, तर पाणीपट्टीतून सुमारे १०० कोटी महापालिकेच्या तिजोरीत जमा होत आहे. ही तफावत ८० कोटींची असून केवळ सबसिडीने नागरिकांना मिळत असलेल्या पाण्यामुळे नाही तर भरमसाट गळतीमुळे निर्माण झाली आहे. त्यामुळेच पालिकेने हा पाण्याचे आॅडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. धरणापासून पाणीपुरवठा प्रक्रिया केंद्रापर्यंत आणि त्यानंतर शहरातील जलकुंभापर्यंत होणाºया पाणीपुरवठ्याचे आॅडिट केले जाणार आहे. खासगी संस्थेच्या माध्यमातून हे काम केले जाणार आहे. या दरम्यान होणारी पाणीगळती कोणकोणत्या पातळीवर होत आहे, याची माहिती नेमण्यात आलेली संस्था महापालिकेला देणार आहे. मुळात धरणातून उचललेले पाणी आणि प्रक्रि येनंतर जलकुंभापर्यंत पोहोचलेले पाणी, या प्रवासादरम्यान कोणत्या टप्प्यात गळतीचे प्रमाण जास्त आहे, याची माहिती या संस्थेकडून लावण्यात येणाºया मोठ्या क्षमतेच्या मीटरमुळे (फ्लो मीटर) कळणार आहे.त्यामुळे ही गळती थांबवणे महापालिकेला शक्य होणार आहे. तसेच या संस्थेच्या माध्यमातून शहरातील जलकुंभातील दररोजच्या जलसाठ्याची माहिती होणार आहे. हे काम किमान सात वर्षांसाठी दिले जाणार आहे. दरम्यान, सुरुवातीला हे काम पीपीपीच्या माध्यमातून करण्याचा पालिकेचा मानस होता. त्यानुसार, निविदादेखील काढण्यात आल्या. सल्लागाराने या कामाचा खर्च ७८ कोटी ८८ लाख ४३ लाख ८४६ रुपये इतका अपेक्षित धरला होता. परंतु, प्रत्यक्षात या कामाचा खर्च ९९ कोटींच्या आसपास जाईल, असे स्पष्ट झाले. त्यानुसार, ठेकेदाराशी वाटाघाटीअंती ही रक्कम ९५ कोटी ४६ लाख २७ हजार १६५ रुपये अंतिम झाली आहे. यातील ७० टक्के म्हणजेच ४९ कोटी ९० लाख २२ हजार ८८९ रुपयांचा खर्चाचा भार स्मार्ट सिटीतून करण्याचा पालिकेचा मानस आहे. तर, ३० टक्के भार पालिका उचलणार आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाWaterपाणी