शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

ठाणे : पाणीगळतीवर उतारा वॉटर आॅडिटचा , २४ तास पाणी : पालिकेचा प्रस्ताव, ९५.४६ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:48 IST

ठाणे शहराला २४ बाय ७ पाणीपुरवठा होण्यासाठी आता महापालिकेने पावले उचलली आहेत. यानुसार, पाणीवितरण व्यवस्थेचे रिमॉडेलिंग, मीटर यंत्रणा बसवणे, जलवाहिन्या बदलणे या कामांसह आता महापालिका प्रथमच पाण्याचे आॅडिट करणार आहे.

ठाणे : ठाणे शहराला २४ बाय ७ पाणीपुरवठा होण्यासाठी आता महापालिकेने पावले उचलली आहेत. यानुसार, पाणीवितरण व्यवस्थेचे रिमॉडेलिंग, मीटर यंत्रणा बसवणे, जलवाहिन्या बदलणे या कामांसह आता महापालिका प्रथमच पाण्याचे आॅडिट करणार आहे. यामुळे शहरात कोणत्या स्रोतांकडून किती पाणी आले आणि किती वितरित झाले, मुख्य जलवाहिनीवरील गळती याची यामध्ये मोजणी केली जाणार आहे. सुरुवातीला पाणी आॅडिटचे काम हे पीपीपीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न होता. परंतु, आता ते स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करण्याचा पालिकेचा विचार आहे. यासाठीच्या ९५ कोटी ४६ लाख २७ हजार १६५ रुपये एवढ्या प्रस्तावित खर्चातील ७० टक्के हिस्सा हा स्मार्ट सिटीतून आणि ३० टक्के पालिकेच्या निधीतून केला जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव २० नोव्हेंबरच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.ठाणे शहराला आजघडीला विविध स्रोतांच्या माध्यमातून ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा रोज होत असून पाणीगळतीचे प्रमाण हे ४५ टककयांच्या आसपास आहे. पुरेसे पाणी असतानाही काही भागांना पाणीकपातीचा सामना करावा लागत असून पाण्याचे योग्य नियोजन नसल्यानेही पाणीवितरण व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. केवळ पाणीपुरवठ्यावर १८० कोटी रु पये वर्षाला खर्च केले जात आहेत, तर पाणीपट्टीतून सुमारे १०० कोटी महापालिकेच्या तिजोरीत जमा होत आहे. ही तफावत ८० कोटींची असून केवळ सबसिडीने नागरिकांना मिळत असलेल्या पाण्यामुळे नाही तर भरमसाट गळतीमुळे निर्माण झाली आहे. त्यामुळेच पालिकेने हा पाण्याचे आॅडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. धरणापासून पाणीपुरवठा प्रक्रिया केंद्रापर्यंत आणि त्यानंतर शहरातील जलकुंभापर्यंत होणाºया पाणीपुरवठ्याचे आॅडिट केले जाणार आहे. खासगी संस्थेच्या माध्यमातून हे काम केले जाणार आहे. या दरम्यान होणारी पाणीगळती कोणकोणत्या पातळीवर होत आहे, याची माहिती नेमण्यात आलेली संस्था महापालिकेला देणार आहे. मुळात धरणातून उचललेले पाणी आणि प्रक्रि येनंतर जलकुंभापर्यंत पोहोचलेले पाणी, या प्रवासादरम्यान कोणत्या टप्प्यात गळतीचे प्रमाण जास्त आहे, याची माहिती या संस्थेकडून लावण्यात येणाºया मोठ्या क्षमतेच्या मीटरमुळे (फ्लो मीटर) कळणार आहे.त्यामुळे ही गळती थांबवणे महापालिकेला शक्य होणार आहे. तसेच या संस्थेच्या माध्यमातून शहरातील जलकुंभातील दररोजच्या जलसाठ्याची माहिती होणार आहे. हे काम किमान सात वर्षांसाठी दिले जाणार आहे. दरम्यान, सुरुवातीला हे काम पीपीपीच्या माध्यमातून करण्याचा पालिकेचा मानस होता. त्यानुसार, निविदादेखील काढण्यात आल्या. सल्लागाराने या कामाचा खर्च ७८ कोटी ८८ लाख ४३ लाख ८४६ रुपये इतका अपेक्षित धरला होता. परंतु, प्रत्यक्षात या कामाचा खर्च ९९ कोटींच्या आसपास जाईल, असे स्पष्ट झाले. त्यानुसार, ठेकेदाराशी वाटाघाटीअंती ही रक्कम ९५ कोटी ४६ लाख २७ हजार १६५ रुपये अंतिम झाली आहे. यातील ७० टक्के म्हणजेच ४९ कोटी ९० लाख २२ हजार ८८९ रुपयांचा खर्चाचा भार स्मार्ट सिटीतून करण्याचा पालिकेचा मानस आहे. तर, ३० टक्के भार पालिका उचलणार आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाWaterपाणी