शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

ठाणे : पाणीगळतीवर उतारा वॉटर आॅडिटचा , २४ तास पाणी : पालिकेचा प्रस्ताव, ९५.४६ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:48 IST

ठाणे शहराला २४ बाय ७ पाणीपुरवठा होण्यासाठी आता महापालिकेने पावले उचलली आहेत. यानुसार, पाणीवितरण व्यवस्थेचे रिमॉडेलिंग, मीटर यंत्रणा बसवणे, जलवाहिन्या बदलणे या कामांसह आता महापालिका प्रथमच पाण्याचे आॅडिट करणार आहे.

ठाणे : ठाणे शहराला २४ बाय ७ पाणीपुरवठा होण्यासाठी आता महापालिकेने पावले उचलली आहेत. यानुसार, पाणीवितरण व्यवस्थेचे रिमॉडेलिंग, मीटर यंत्रणा बसवणे, जलवाहिन्या बदलणे या कामांसह आता महापालिका प्रथमच पाण्याचे आॅडिट करणार आहे. यामुळे शहरात कोणत्या स्रोतांकडून किती पाणी आले आणि किती वितरित झाले, मुख्य जलवाहिनीवरील गळती याची यामध्ये मोजणी केली जाणार आहे. सुरुवातीला पाणी आॅडिटचे काम हे पीपीपीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न होता. परंतु, आता ते स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करण्याचा पालिकेचा विचार आहे. यासाठीच्या ९५ कोटी ४६ लाख २७ हजार १६५ रुपये एवढ्या प्रस्तावित खर्चातील ७० टक्के हिस्सा हा स्मार्ट सिटीतून आणि ३० टक्के पालिकेच्या निधीतून केला जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव २० नोव्हेंबरच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.ठाणे शहराला आजघडीला विविध स्रोतांच्या माध्यमातून ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा रोज होत असून पाणीगळतीचे प्रमाण हे ४५ टककयांच्या आसपास आहे. पुरेसे पाणी असतानाही काही भागांना पाणीकपातीचा सामना करावा लागत असून पाण्याचे योग्य नियोजन नसल्यानेही पाणीवितरण व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. केवळ पाणीपुरवठ्यावर १८० कोटी रु पये वर्षाला खर्च केले जात आहेत, तर पाणीपट्टीतून सुमारे १०० कोटी महापालिकेच्या तिजोरीत जमा होत आहे. ही तफावत ८० कोटींची असून केवळ सबसिडीने नागरिकांना मिळत असलेल्या पाण्यामुळे नाही तर भरमसाट गळतीमुळे निर्माण झाली आहे. त्यामुळेच पालिकेने हा पाण्याचे आॅडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. धरणापासून पाणीपुरवठा प्रक्रिया केंद्रापर्यंत आणि त्यानंतर शहरातील जलकुंभापर्यंत होणाºया पाणीपुरवठ्याचे आॅडिट केले जाणार आहे. खासगी संस्थेच्या माध्यमातून हे काम केले जाणार आहे. या दरम्यान होणारी पाणीगळती कोणकोणत्या पातळीवर होत आहे, याची माहिती नेमण्यात आलेली संस्था महापालिकेला देणार आहे. मुळात धरणातून उचललेले पाणी आणि प्रक्रि येनंतर जलकुंभापर्यंत पोहोचलेले पाणी, या प्रवासादरम्यान कोणत्या टप्प्यात गळतीचे प्रमाण जास्त आहे, याची माहिती या संस्थेकडून लावण्यात येणाºया मोठ्या क्षमतेच्या मीटरमुळे (फ्लो मीटर) कळणार आहे.त्यामुळे ही गळती थांबवणे महापालिकेला शक्य होणार आहे. तसेच या संस्थेच्या माध्यमातून शहरातील जलकुंभातील दररोजच्या जलसाठ्याची माहिती होणार आहे. हे काम किमान सात वर्षांसाठी दिले जाणार आहे. दरम्यान, सुरुवातीला हे काम पीपीपीच्या माध्यमातून करण्याचा पालिकेचा मानस होता. त्यानुसार, निविदादेखील काढण्यात आल्या. सल्लागाराने या कामाचा खर्च ७८ कोटी ८८ लाख ४३ लाख ८४६ रुपये इतका अपेक्षित धरला होता. परंतु, प्रत्यक्षात या कामाचा खर्च ९९ कोटींच्या आसपास जाईल, असे स्पष्ट झाले. त्यानुसार, ठेकेदाराशी वाटाघाटीअंती ही रक्कम ९५ कोटी ४६ लाख २७ हजार १६५ रुपये अंतिम झाली आहे. यातील ७० टक्के म्हणजेच ४९ कोटी ९० लाख २२ हजार ८८९ रुपयांचा खर्चाचा भार स्मार्ट सिटीतून करण्याचा पालिकेचा मानस आहे. तर, ३० टक्के भार पालिका उचलणार आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाWaterपाणी