शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

ठाणे मतदाता जागरण अभियान उभारणार अवास्तव बिलांच्या परताव्यासाठी जनआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 00:01 IST

कोरोना रुग्णांची बिले, अनेक कोरोनाग्रस्त नागरिकांची लूट होऊनही सरकारदरबारी याबाबत काही न्याय मिळण्याची शक्यता नाही.

ठाणे : कोविडकाळात आरोग्यव्यवस्थेतील त्रुटींमुळे अनेक पातळ्यांवर रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये पुरेशा खाटा उपलब्ध नसल्याने खाजगी रुग्णालयांंत अव्वाच्या सव्वा बिले भरावी लागली. ज्या रुग्णांना महात्मा फुले योजनेत मोफत उपचार मिळायला हवे होते, त्यांनादेखील उपचार मोफत मिळाले नाहीत. अशा प्रकारे ९० टक्के रुग्णांना आयुष्यभराची कमाई या साथीच्या काळात गमवावी लागली किंवा कर्जबाजारी व्हावे लागले. अशा रुग्णांना बिलांचा परतावा मिळावा, यासाठी ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या माध्यमातून जनआंदोलन उभारले जाणार आहे.

अनेक कोरोनाग्रस्त नागरिकांची लूट होऊनही सरकारदरबारी याबाबत काही न्याय मिळण्याची शक्यता नाही. जनकल्याणाची भाषा करणाऱ्या परंतु समर्थ सार्वजनिक आरोग्यव्यवस्था निर्माण न करू शकलेले सरकार व राजकीय पक्ष या लुटीला जबाबदार आहेेत.  राजकीय पक्ष या गंभीर परिस्थितीवर शांत असून लोक मात्र कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे ठाणे मतदाता जागरण अभियान अशा सर्व रुग्णांशी संपर्क साधून त्यांनी भरलेल्या मोठ्या रकमेच्या बिलांचा परतावा मिळावा, यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी जनआंदोलन उभारले जाईल, असे अभियानाच्या वतीने सांगण्यात आले.

१० डिसेंबरला सभा वेळ पडल्यास न्यायालयात दाद मागितली जाणार आहे. मुंबईत जनआरोग्य अभियान या संस्थेच्या वतीने परतावा मिळण्यासाठी आंदोलन उभारण्याची पायरी म्हणून मोठी सभा १० डिसेंबरला होणार असल्याची माहिती अभियानाच्या वतीने देण्यात आली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल