शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

ठाण्यात आजी-माजी शिवसैनिकांत ‘काँटे की टक्कर’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 2:45 AM

ठाणे लोकसभा मतदारसंघात २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले, तरी खरी लढत ही शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांच्यातच झाली

अजित मांडके

ठाणे लोकसभा मतदारसंघात २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले, तरी खरी लढत ही शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांच्यातच झाली. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक प्रचार संपेपर्यंत अटीतटीची होत गेली. यात राष्ट्रवादीसाठी नवी मुंबई आणि मीरा-भाईंदरचा कौल सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. तर, शिवसेनेसाठी ठाणे, कोपरी-पाचपाखाडी आणि ओवळा-माजिवडे हा विधानसभा मतदारसंघ निर्णायक ठरतील.

मागील काही दिवसांपासून प्रचाराचा जो काही धुरळा उडाला होता, तसेच आरोप-प्रत्यारोपांच्या ज्या फैरी झडल्याचे दिसून आले, त्यावरून ही निवडणूक रंगतदार होत गेली. प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या उमेदवाराच्या शिक्षणाचा मुद्दा लावून धरल्याने वातावरण चांगलेच तापले. मात्र, आम्ही शिक्षणापेक्षा ठाणेकरांवर विश्वास ठेवत असून त्यांनी दिलेल्या मतांच्या कौलावर आम्ही विश्वास ठेवत आहोत; ठाण्याचा विकास केल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला. परंतु, राष्ट्रवादी एवढ्यावरच थांबली नाही, तर होर्डिंग्ज पडल्याच्या मुद्द्यानेही या निवडणुकीत राजकीय वळण घेतल्याचे दिसून आले. त्या होर्डिंग्जसाठी एका खासदाराने पाच लाख घेतल्याचा आरोप राष्ट्रवादीने करून थेट विचारेंनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर, पालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल नंदलाल समितीच्या अहवालाचे भूत पुन्हा बाहेर काढून विचारे यांच्यापुढील अडचणींत वाढ केल्याचे दिसून आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे परांजपे यांनी ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदरमधील समस्यांचा पाढाच वाचल्याचे दिसून आले. यावर हवा तसा पलटवार शिवसेनेकडून झाला नाही. या घडामोडींनंतर शिवसेनेतही चलबिचल सुरू झाली असून ते सुद्धा आता ‘काँटे की टक्कर’ होईल, असे खाजगीत मान्य करू लागले आहेत.

शिवाय, या निवडणुकीच्या निमित्ताने विद्यमान पालकमंत्री, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्रीकरणाचा मुद्दा मांडत दलित ऐक्याची हाक देत ज्या रिपब्लिकन पक्षाला सोबत घेतले, त्याला सत्तेत वाटा मिळत नसल्याच्या नाराजीतून रिपब्लिकन आठवले गटाने युतीची साथ सोडून परांजपे यांना पाठिंबा दिला. त्याचवेळी ब्राह्मण समाजाच्या पाठिंब्यावरही दोन्ही उमेदवारांनी दावा केल्याने विविध समाजांतही ही लढत चर्चेत आली होती.

मागील पाच वर्षांत ठाणेकरांनी विश्वास दाखवला आहे. त्यामुळेच मतदारसंघात विविध विकासकामे करण्यात यश आले. ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदरचे केंद्राच्या पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यानुसार, अनेक कामे सुरू झाली आहेत. काही कामांना मंजुरी मिळाली आहे. - राजन विचारे, शिवसेना

केवळ, महापालिकेच्या अर्थसंकल्पात ज्या कामांचा समावेश करण्यात आला होता, त्या कामांचा शिवसेना उमेदवाराचा वचननामा आहे. परंतु, आजही वाहतुकीचा, आरोग्याचा, डम्पिंगचा, मीरा-भाईंदरमधील जेट्टीचा आणि इतर महत्त्वाचे प्रश्न सुटलेले नाहीत. पाण्याचा प्रश्न आजही कायम आहे. - आनंद परांजपे, राष्ट्रवादी

कळीचे मुद्देडम्पिंग, रेल्वेचे प्रश्न अद्याप सुटू शकलेले नाहीत. ठाण्यातील पाण्याचा प्रश्न सुटू शकलेला नाही. हक्काचे धरण मिळवण्यात अपयश.नवीन ठाणे स्टेशनचे भिजत पडलेले घोंगडे, रेल्वेचे अन्य रखडलेले प्रकल्पही चर्चेत. सर्व शहरांतील वाहतूककोंडी, मीरा-भाईंदरचा जेट्टीचा रखडलेला प्रश्नही प्रचारात अग्रभागी.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकthane-pcठाणेShiv SenaशिवसेनाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019