शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
3
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
4
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
5
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
6
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
7
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
9
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
10
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
11
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
12
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
13
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
14
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
15
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
16
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
17
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
18
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
19
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
20
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."

संचारबंदीमध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांनी केली १४ हजार ८८८ चालकांवर कारवाई: ५४ लाखांचा दंड वसूल

By जितेंद्र कालेकर | Updated: April 17, 2020 00:03 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्हयातील सर्वच भागांमध्ये संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी दिले आहेत. संचारबंदी लागू झाल्यापासून ठाणे ग्रामीण पोलिसांनी गेल्या २५ दिवसांमध्ये १४ हजार ८८८ चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करुन त्यांच्याकडून ५४ लाख ३२ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

ठळक मुद्दे८२६ वाहने जप्त भार्इंदर आणि मीरा रोड विभागामध्ये सर्वाधिक एक हजार १५३ जणांविरुद्ध गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: संचारबंदी लागू झाल्यापासून ठाणे ग्रामीण पोलिसांनी गेल्या २५ दिवसांमध्ये १४ हजार ८८८ चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये खटले दाखल केले आहेत. त्यांच्याकडून ५४ लाख ३२ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला असून त्यातील ८२६ वाहने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्हयातील सर्वच भागांमध्ये संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर २७ नाक्यांसह पाचही उप विभागांमध्ये तीव्रपणे कारवाईची मोहीम राबविली जात आहे.मीरा रोड आणि भार्इंदर या शहरी भाग असलेल्या उपविभागांमध्ये नागरिक विनाकारण रस्त्यावर येण्याचे प्रमाण अधिक आहे. भार्इंदर विभागामध्ये २२ मार्च ते १५ एप्रिल २०२० या कालावधीमध्ये संचारबंदीचे उल्लंघन करणारे, मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या ८०१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून १०३ गुन्हे दाखल केले आहेत. त्यापाठोपाठ मीरा रोड विभागात ३५२ जणांविरुद्ध १३९ गुन्हे दाखल झाले आहेत. तर शहापूर सारख्या ग्रामीण भागातही १३१ नागरिकांनी संचारबंदीचे उल्लंघन केले. त्यांच्याविरुद्ध ६१ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापाठोपाठ कोरोनाच्या रुग्ण आढळलेल्या मुरबाड विभागामध्ये ७७ जणांविरुद्ध ३० गुन्हे दाखल झाले आहेत. तर गणेशपूरी या विभागात अत्यल्प म्हणजे ४८ जणांविरुद्ध २३ गुन्हे दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. २२ मार्च ते १५ एप्रिल या २५ दिवसांच्या कालावधीमध्ये एक हजार ४०९ जणांविरुद्ध ३५६ गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय, ग्रामीणच्या वाहतूक नियंत्रण शाखेकडून १४ हजार ८८८ जणांविरुद्ध कारवाई झाली आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने केलेल्या कारवाईमध्ये वाहतूक पोलिसांनी ८२६ वाहने जप्त केली असून आतापर्यंत ५४ लाख ३२ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केली आहे. वैद्यकीय तसेच अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त बाहेर पडणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसांनी त्यांचे फिक्स पाँर्इंटही बदलले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून कारवाई होण्यापेक्षा कोरोनासारख्या साथीच्याा आजाराला दूर ठेवण्यासाठी नागरिकांनी स्वत:हून शिस्त पाळावी. स्वत:बरोबर आपल्या कुटूंबियांचेही जीव धोक्यात घालू नये आणि घराबाहेर पडू नये,असे आवाहन ठाणे ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

 

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस