शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीमध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांनी केली १४ हजार ८८८ चालकांवर कारवाई: ५४ लाखांचा दंड वसूल

By जितेंद्र कालेकर | Updated: April 17, 2020 00:03 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्हयातील सर्वच भागांमध्ये संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी दिले आहेत. संचारबंदी लागू झाल्यापासून ठाणे ग्रामीण पोलिसांनी गेल्या २५ दिवसांमध्ये १४ हजार ८८८ चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करुन त्यांच्याकडून ५४ लाख ३२ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

ठळक मुद्दे८२६ वाहने जप्त भार्इंदर आणि मीरा रोड विभागामध्ये सर्वाधिक एक हजार १५३ जणांविरुद्ध गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: संचारबंदी लागू झाल्यापासून ठाणे ग्रामीण पोलिसांनी गेल्या २५ दिवसांमध्ये १४ हजार ८८८ चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये खटले दाखल केले आहेत. त्यांच्याकडून ५४ लाख ३२ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला असून त्यातील ८२६ वाहने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्हयातील सर्वच भागांमध्ये संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर २७ नाक्यांसह पाचही उप विभागांमध्ये तीव्रपणे कारवाईची मोहीम राबविली जात आहे.मीरा रोड आणि भार्इंदर या शहरी भाग असलेल्या उपविभागांमध्ये नागरिक विनाकारण रस्त्यावर येण्याचे प्रमाण अधिक आहे. भार्इंदर विभागामध्ये २२ मार्च ते १५ एप्रिल २०२० या कालावधीमध्ये संचारबंदीचे उल्लंघन करणारे, मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या ८०१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून १०३ गुन्हे दाखल केले आहेत. त्यापाठोपाठ मीरा रोड विभागात ३५२ जणांविरुद्ध १३९ गुन्हे दाखल झाले आहेत. तर शहापूर सारख्या ग्रामीण भागातही १३१ नागरिकांनी संचारबंदीचे उल्लंघन केले. त्यांच्याविरुद्ध ६१ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापाठोपाठ कोरोनाच्या रुग्ण आढळलेल्या मुरबाड विभागामध्ये ७७ जणांविरुद्ध ३० गुन्हे दाखल झाले आहेत. तर गणेशपूरी या विभागात अत्यल्प म्हणजे ४८ जणांविरुद्ध २३ गुन्हे दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. २२ मार्च ते १५ एप्रिल या २५ दिवसांच्या कालावधीमध्ये एक हजार ४०९ जणांविरुद्ध ३५६ गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय, ग्रामीणच्या वाहतूक नियंत्रण शाखेकडून १४ हजार ८८८ जणांविरुद्ध कारवाई झाली आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने केलेल्या कारवाईमध्ये वाहतूक पोलिसांनी ८२६ वाहने जप्त केली असून आतापर्यंत ५४ लाख ३२ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केली आहे. वैद्यकीय तसेच अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त बाहेर पडणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसांनी त्यांचे फिक्स पाँर्इंटही बदलले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून कारवाई होण्यापेक्षा कोरोनासारख्या साथीच्याा आजाराला दूर ठेवण्यासाठी नागरिकांनी स्वत:हून शिस्त पाळावी. स्वत:बरोबर आपल्या कुटूंबियांचेही जीव धोक्यात घालू नये आणि घराबाहेर पडू नये,असे आवाहन ठाणे ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

 

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस