शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

संचारबंदीमध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांनी केली १४ हजार ८८८ चालकांवर कारवाई: ५४ लाखांचा दंड वसूल

By जितेंद्र कालेकर | Updated: April 17, 2020 00:03 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्हयातील सर्वच भागांमध्ये संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी दिले आहेत. संचारबंदी लागू झाल्यापासून ठाणे ग्रामीण पोलिसांनी गेल्या २५ दिवसांमध्ये १४ हजार ८८८ चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करुन त्यांच्याकडून ५४ लाख ३२ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

ठळक मुद्दे८२६ वाहने जप्त भार्इंदर आणि मीरा रोड विभागामध्ये सर्वाधिक एक हजार १५३ जणांविरुद्ध गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: संचारबंदी लागू झाल्यापासून ठाणे ग्रामीण पोलिसांनी गेल्या २५ दिवसांमध्ये १४ हजार ८८८ चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये खटले दाखल केले आहेत. त्यांच्याकडून ५४ लाख ३२ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला असून त्यातील ८२६ वाहने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्हयातील सर्वच भागांमध्ये संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर २७ नाक्यांसह पाचही उप विभागांमध्ये तीव्रपणे कारवाईची मोहीम राबविली जात आहे.मीरा रोड आणि भार्इंदर या शहरी भाग असलेल्या उपविभागांमध्ये नागरिक विनाकारण रस्त्यावर येण्याचे प्रमाण अधिक आहे. भार्इंदर विभागामध्ये २२ मार्च ते १५ एप्रिल २०२० या कालावधीमध्ये संचारबंदीचे उल्लंघन करणारे, मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या ८०१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून १०३ गुन्हे दाखल केले आहेत. त्यापाठोपाठ मीरा रोड विभागात ३५२ जणांविरुद्ध १३९ गुन्हे दाखल झाले आहेत. तर शहापूर सारख्या ग्रामीण भागातही १३१ नागरिकांनी संचारबंदीचे उल्लंघन केले. त्यांच्याविरुद्ध ६१ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापाठोपाठ कोरोनाच्या रुग्ण आढळलेल्या मुरबाड विभागामध्ये ७७ जणांविरुद्ध ३० गुन्हे दाखल झाले आहेत. तर गणेशपूरी या विभागात अत्यल्प म्हणजे ४८ जणांविरुद्ध २३ गुन्हे दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. २२ मार्च ते १५ एप्रिल या २५ दिवसांच्या कालावधीमध्ये एक हजार ४०९ जणांविरुद्ध ३५६ गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय, ग्रामीणच्या वाहतूक नियंत्रण शाखेकडून १४ हजार ८८८ जणांविरुद्ध कारवाई झाली आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने केलेल्या कारवाईमध्ये वाहतूक पोलिसांनी ८२६ वाहने जप्त केली असून आतापर्यंत ५४ लाख ३२ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केली आहे. वैद्यकीय तसेच अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त बाहेर पडणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसांनी त्यांचे फिक्स पाँर्इंटही बदलले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून कारवाई होण्यापेक्षा कोरोनासारख्या साथीच्याा आजाराला दूर ठेवण्यासाठी नागरिकांनी स्वत:हून शिस्त पाळावी. स्वत:बरोबर आपल्या कुटूंबियांचेही जीव धोक्यात घालू नये आणि घराबाहेर पडू नये,असे आवाहन ठाणे ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

 

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस