शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

राजस्थानच्या अपहृत दोन संचालकांची ठाणे पोलिसांनी केली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 10:11 PM

उदयपूर येथील एका वित्त संस्थेकडे मोठे कर्ज मागण्याच्या बहाण्याने दोन संचालकांचे अपहरण करून त्यांच्याकडून २५ लाखांची खंडणी उकळणाऱ्या सहा जणांना ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून २५ लाखांची रोकड, कार आणि तलवारही जप्त करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे मुंबईच्या पोलीस हवालदारासह सहा जणांना अटक२५ लाखांची रोकड, कार आणि तलवार हस्तगतचौघांना मिळाली पोलीस कोठडी

ठाणे : उदयपूर (राजस्थान) येथील एका खासगी वित्त संस्थेकडे मोठे कर्ज मागण्याच्या बहाण्याने दोन संचालकांचे अपहरण करून त्यांच्याकडून २५ लाखांची खंडणी उकळण्याचा डाव ठाणेखंडणीविरोधी पथकाने उधळून लावला. यातील लेनीन कुट्टीवट्टे याच्यासह सहा जणांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून ही २५ लाखांची रोकड आणि तलवारही हस्तगत केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली. विशेष म्हणजे आरोपींमध्ये तुकाराम मुदगन या मुंबईच्या पोलीस हवालदाराचाही समावेश आहे.उदयपूरच्या ‘श्री तिरुपती फायनानिक्स निधी लिमिटेड’ या कंपनीकडे लेनीन आणि त्याच्या साथीदारांनी आधी मालमत्तेच्या तारणावर मोठ्या कर्जाची मागणी केली. त्यानंतर कल्याण, भिवंडी परिसरातील मालमत्तेची मूळ कागदपत्रे आणि मालमत्ता दाखवण्याच्या बहाण्याने देवानंद वरंदानी आणि रोनक सैनी (रा. दोघेही उदयपूर, राजस्थान) या दोन्ही संचालकांना ठाण्याच्या अशोक सिनेमागृह भागात बोलवले. त्यांचे ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वा.च्या सुमारास अपहरण करून डोंबिवलीतील इस्टेट एजंटच्या कार्यालयात त्यांना नेले. तिथे तलवारीच्या धाकावर तसेच त्यांना मारहाण करून त्यांच्याकडे एक कोटीच्या खंडणीची मागणी केली. पैसे दिले नाही, तर ठार करण्याचीही त्यांनी धमकी दिली. भीतीने देवानंद यांनी अखेर २५ लाख रुपये देण्याचे मान्य केले. उदयपूर येथून त्यांचा साथीदार पैसे घेऊन येईपर्यंत देवानंदसह दोघांनाही कल्याण येथील एका लॉज आणि घरात ठेवले. त्यानंतर, ८ सप्टेंबर रोजी हे पैसे घेऊन आलेल्याला त्यांनी आपल्या गाडीत घेतले. त्याची गाडी मात्र खंडणीखोरांनी परत पाठवण्यास सांगितली. त्याचवेळी देवानंद यांच्या मित्राने ही माहिती ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना दिली. त्यानंतर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कोथमिरे, विकास घोडके, उपनिरीक्षक रमेश कदम, विकास बाबर, अविनाश महाजन, रोशन देवरे, हेमंत ढोले, जमादार जानू पवार, हवालदार संजय भिवणकर, अंकुश भोसले आणि नितीन ओवळेकर आदींच्या पथकाने सापळा लावून अपहरणकर्त्यांची गाडी कल्याण भागातून पाठलाग करून ८ सप्टेंबर रोजी पकडली. याच गाडीतून त्यांनी एका अपहृत संचालकांची सुटका केली. त्यावेळी लेनीन आणि शेलार यांना २५ लाखांच्या रोकड आणि कारसह शनिवारी सायंकाळी अटक केली. त्यांच्याकडील चौकशीतून अन्य एका संचालकाची हाजीमलंग रोड येथील घरातून सुटका केली. तिथून सागर साळवे, ओमप्रकाश जैस्वाल, अभिषेक झा आणि पोलीस हवालदार तुकाराम मुदगन अशा चौघांना ९ सप्टेंबर रोजी तलवारीसह अटक केली. यातील साळवेसह चौघांना १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

-----------------------

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी