शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
3
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
4
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
5
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
6
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
7
प्रॅक्टिस वेळी 'दादागिरी'; Live मॅचमध्ये आली तोंडावर पडण्याची वेळ! पृथ्वीसह चौघांच्या पदरी भोपळा
8
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
9
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
10
Pankaj Dhir: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
11
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
12
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
13
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
14
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
15
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
16
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
17
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक
18
प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय; बिहार विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार, कारण काय..?
19
अ‍ॅश्ले टेलिस यांना ट्रम्प भारतात राजदूत बनवणार होते, अचानक हेरगिरी प्रकरणी अटक; चीनशी कनेक्शनचा आरोप
20
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली

तोंडाला मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध ठाणे पोलीस करणार कारवाई

By जितेंद्र कालेकर | Updated: April 9, 2020 00:40 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनी संचारबंदीच्या काळात आधी विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर साथ रोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले होते. यापुढे तोंडाला मास्क नसणा-यांवरही गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांनी काढले आदेशठाणे शहर, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या परिमंडळांमध्ये होणार गुन्हे दाखल मास्क न घातल्यामुळे अगदी न्यायालयीन कोठडीही मिळू शकते

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मुंबई महानगरपालिकेपाठोपाठ आता ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातही तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असल्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी बुधवारी काढले आहेत. या आदेशाचे पालन न करणा-यांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी या आदेशात म्हटले आहे.पोलीस आयुक्त फणसळकर यांनी आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे की, राज्यभरात १३ मार्च २०२० पासून साथरोग अधिनियम १८९७ ची अंमलबजावणी सुरु झाली आहे. कोरोनावर नियंत्रण आणि प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम २०२० नुसार नियमावली तयार केली आहे. मास्क परिधान केल्याने कोरोना विषाणूचा प्रसार कमी होऊ शकतो. त्यामुळे सामाजिक अंतर राखण्याच्या उपायांबरोबरच परस्परांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींच्या बाबतीत मास्क परिधान करणेही महत्वपूर्ण आहे. त्यामुळेच सार्वजनिक ठिकाणी फिरणा-या व्यक्तींनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे. त्यामुळे ८ एप्रिल २०२० पासून कोणत्याही कारणास्तव रस्ता, रुग्णालय, कार्यालय आणि बाजारपेठ आदी ठिकाणी जाणा-यांनी मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. वैयक्तिक किंवा शासकीय वाहनातून प्रवास करणा-यांसाठीही हाच नियम लागू राहणार आहे. कार्यालयांमध्ये काम करतांना तसेच कोणत्याही बैठकीच्या वेळी एखाद्या जमावामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक केले आहे. हे आदेश ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांमध्ये लागू राहणार आहेत.* कोणत्याही केमिस्टकडे उपलब्ध असलेले सुधारित किंवा घरी बनविलेले (धुण्यायोग्य असे) मास्क धुतल्यानंतर निर्जंतूकीकरण करुन पुन्हा वापरता येऊ शकणारे मास्कही वापरता येतील. या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई झालेल्या आरोपीला शिक्षेचीही तरतूद आहे.

* काय होणार कारवाईएखाद्याने बाहेर सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावरुन जातांना तोंडाला मास्क लावलेला नसल्याचे आढळल्यास त्याला सुरुवातीला भादंवि कलम १८८ नुसार नोटीस बजावली जाणार आहे. त्याला पोलीस ताब्यात घेऊ शकतात. त्यानंतर न्यायालयातून त्याला जामीन घ्यावा लागेल. जर जामीन मिळाला नाहीतर न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यास थेट कारागृहातही जाण्याची वेळ संबंधितांवर बेतू शकते, असेही एका पोलीस अधिका-याने सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस