शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तोंडाला मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध ठाणे पोलीस करणार कारवाई

By जितेंद्र कालेकर | Updated: April 9, 2020 00:40 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनी संचारबंदीच्या काळात आधी विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर साथ रोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले होते. यापुढे तोंडाला मास्क नसणा-यांवरही गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांनी काढले आदेशठाणे शहर, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या परिमंडळांमध्ये होणार गुन्हे दाखल मास्क न घातल्यामुळे अगदी न्यायालयीन कोठडीही मिळू शकते

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मुंबई महानगरपालिकेपाठोपाठ आता ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातही तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असल्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी बुधवारी काढले आहेत. या आदेशाचे पालन न करणा-यांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी या आदेशात म्हटले आहे.पोलीस आयुक्त फणसळकर यांनी आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे की, राज्यभरात १३ मार्च २०२० पासून साथरोग अधिनियम १८९७ ची अंमलबजावणी सुरु झाली आहे. कोरोनावर नियंत्रण आणि प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम २०२० नुसार नियमावली तयार केली आहे. मास्क परिधान केल्याने कोरोना विषाणूचा प्रसार कमी होऊ शकतो. त्यामुळे सामाजिक अंतर राखण्याच्या उपायांबरोबरच परस्परांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींच्या बाबतीत मास्क परिधान करणेही महत्वपूर्ण आहे. त्यामुळेच सार्वजनिक ठिकाणी फिरणा-या व्यक्तींनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे. त्यामुळे ८ एप्रिल २०२० पासून कोणत्याही कारणास्तव रस्ता, रुग्णालय, कार्यालय आणि बाजारपेठ आदी ठिकाणी जाणा-यांनी मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. वैयक्तिक किंवा शासकीय वाहनातून प्रवास करणा-यांसाठीही हाच नियम लागू राहणार आहे. कार्यालयांमध्ये काम करतांना तसेच कोणत्याही बैठकीच्या वेळी एखाद्या जमावामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक केले आहे. हे आदेश ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांमध्ये लागू राहणार आहेत.* कोणत्याही केमिस्टकडे उपलब्ध असलेले सुधारित किंवा घरी बनविलेले (धुण्यायोग्य असे) मास्क धुतल्यानंतर निर्जंतूकीकरण करुन पुन्हा वापरता येऊ शकणारे मास्कही वापरता येतील. या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई झालेल्या आरोपीला शिक्षेचीही तरतूद आहे.

* काय होणार कारवाईएखाद्याने बाहेर सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावरुन जातांना तोंडाला मास्क लावलेला नसल्याचे आढळल्यास त्याला सुरुवातीला भादंवि कलम १८८ नुसार नोटीस बजावली जाणार आहे. त्याला पोलीस ताब्यात घेऊ शकतात. त्यानंतर न्यायालयातून त्याला जामीन घ्यावा लागेल. जर जामीन मिळाला नाहीतर न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यास थेट कारागृहातही जाण्याची वेळ संबंधितांवर बेतू शकते, असेही एका पोलीस अधिका-याने सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस