शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

भाजपच्या संजय केळकर यांनी राखले ठाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 01:04 IST

मनसेच्या इंजीनमुळे फुटला घाम; शहराच्या मध्यवर्ती भागातील मतदारांनी दिला हात

ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील काँटे की टक्करमध्ये अखेर भाजपचे संजय केळकर यांनी मनसेचे अविनाश जाधव यांचा १९ हजार २२४ मतांनी पराभव केला. अनेक महत्त्वाच्या बुथमध्ये भाजप आणि मनसेच्या मतांमध्ये फारच थोडा फरक दिसत आहे. मात्र, ठाणे शहरातील मध्यवर्ती भागाने अखेरच्या क्षणी केळकरांना तारले आणि त्यांचा विजय निश्चित झाला. मागील निवडणुकीच्या तुलनेत केळकर यांच्या मताधिक्यामध्ये घट झाली आहे. ठाणे विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना आणि भाजपचा बालेकिल्ला असल्याने या मतदारसंघात मनसेने या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे.

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात एकूण ५२.४७ टक्के मतदान झाले होते. मागील निवडणुकीच्या तुलनेत येथे चार टक्क्यांनी मते कमी झाली होती. गुरुवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. एकूण साडेसत्तावीस फेऱ्या झाल्या. पहिल्याच फेरीत भाजपचे संजय केळकर यांनी ७८४ मतांनी आघाडी घेतली. त्यानंतर, पुढील दोन फेऱ्यांमध्येही केळकर यांची आघाडी ४५०० च्या पुढे गेली. त्यानंतर, चौथ्या फेरीत अविनाश जाधव यांना २७७८ मते मिळाली, तर भाजपचे संजय केळकर यांना २२२५ मते मिळाली. याठिकाणी जाधव यांनी ५५३ मतांची आघाडी घेतली. परंतु, केळकर हेच आघाडीवर होते. त्यानंतर दहाव्या फेरीपर्यंत केळकर यांना नऊ हजारांची आघाडी होती. मात्र, अकराव्या फेरीत जाधव यांना ४१०० मते मिळाली, तर केळकर यांना २२३४ मते मिळाली. या फेरीत पुन्हा जाधव यांनी १८६६ मतांची आघाडी घेतली.

सतराव्या फेरीला पुन्हा मनसेने आघाडी घेतली. त्यानंतर, एकोणिसाव्या फेरीत मनसेला तीन हजारांच्या आसपास मताधिक्य प्राप्त झाले. त्यामुळे आता मनसे ही जागा जिंकणार, अशी शक्यता वर्तविली जात होती. यामुळे केळकर यांची आघाडी १० हजारांवरून थेट सहा हजारांच्या आसपास घसरली. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमधील धाकधूक वाढली होती. त्यानंतर, शहराच्या मध्यवर्ती भागातील मते मोजण्यास सुरुवात झाली आणि तेथून केळकर यांचा विजय निश्चित झाला. यापुढील साडेसात फेºयांमध्ये केळकर यांनी निर्णायक आघाडी घेतली. अखेर, केळकर यांना ९२ हजार २९८ मते मिळाली, तर मनसेचे अविनाश जाधव यांना ७२ हजार ८७४ मते मिळाली. केळकर यांनी जाधव यांचा १९ हजार ४२४ मतांनी पराभव केला.

मागील निवडणुकीत केळकर यांना ७० हजार ८८४ मते मिळाली होती. या निवडणुकीत त्यांच्या मतांमध्ये २१ हजार ४२७ मतांनी वाढ झाली. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांना ठाणे विधानसभा मतदारसंघातून ८३ हजारांची आघाडी मिळाली होती. त्या तुलनेत विधानसभेत केळकर यांच्या आघाडीत तब्बल ६२ हजार मते कमी झाली. एकूणच केळकर यांचा विजय झाला असला, तरी येत्या काळात मनसेने घेतलेली मते पाहता ही शिवसेना आणि भाजप यांच्याकरिता धोक्याची घंटा मानली जात आहे.

ठाणेकर मतदारांना धन्यवाद देईन. पाच वर्षांत केलेल्या कामांची पोचपावती ठाणेकरांनी दिली आहे. भाजप-शिवसेना युतीचा हा विजय आहे. ठाण्याचा विकास करण्याच्या दृष्टीने यापुढेही प्रयत्न करीन. मतांची आघाडी कमी झालेली नाही. मला मागील वेळेच्या तुलनेत २० हजार जास्त मते मिळाली आहेत.- संजय केळकर, ठाणे मतदारसंघातील विजयी उमेदवार, भाजप

शिवसेना, भाजपच्या बालेकिल्ल्यात आमची ताकद नसतानाही आम्ही तरुण पिढीला सोबत घेऊन लढलो. मतदारांनी जी साथ दिली, त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. युतीच्या बालेकिल्ल्यात त्यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. हार-जित तर होत राहतेच, मात्र लढलो त्याचा अभिमान आहे.- अविनाश जाधव, ठाणे मतदारसंघातील मनसेचे उमेदवार

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019thane-acठाणे शहरBJPभाजपाMNSमनसे