शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या संजय केळकर यांनी राखले ठाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 01:04 IST

मनसेच्या इंजीनमुळे फुटला घाम; शहराच्या मध्यवर्ती भागातील मतदारांनी दिला हात

ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील काँटे की टक्करमध्ये अखेर भाजपचे संजय केळकर यांनी मनसेचे अविनाश जाधव यांचा १९ हजार २२४ मतांनी पराभव केला. अनेक महत्त्वाच्या बुथमध्ये भाजप आणि मनसेच्या मतांमध्ये फारच थोडा फरक दिसत आहे. मात्र, ठाणे शहरातील मध्यवर्ती भागाने अखेरच्या क्षणी केळकरांना तारले आणि त्यांचा विजय निश्चित झाला. मागील निवडणुकीच्या तुलनेत केळकर यांच्या मताधिक्यामध्ये घट झाली आहे. ठाणे विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना आणि भाजपचा बालेकिल्ला असल्याने या मतदारसंघात मनसेने या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे.

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात एकूण ५२.४७ टक्के मतदान झाले होते. मागील निवडणुकीच्या तुलनेत येथे चार टक्क्यांनी मते कमी झाली होती. गुरुवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. एकूण साडेसत्तावीस फेऱ्या झाल्या. पहिल्याच फेरीत भाजपचे संजय केळकर यांनी ७८४ मतांनी आघाडी घेतली. त्यानंतर, पुढील दोन फेऱ्यांमध्येही केळकर यांची आघाडी ४५०० च्या पुढे गेली. त्यानंतर, चौथ्या फेरीत अविनाश जाधव यांना २७७८ मते मिळाली, तर भाजपचे संजय केळकर यांना २२२५ मते मिळाली. याठिकाणी जाधव यांनी ५५३ मतांची आघाडी घेतली. परंतु, केळकर हेच आघाडीवर होते. त्यानंतर दहाव्या फेरीपर्यंत केळकर यांना नऊ हजारांची आघाडी होती. मात्र, अकराव्या फेरीत जाधव यांना ४१०० मते मिळाली, तर केळकर यांना २२३४ मते मिळाली. या फेरीत पुन्हा जाधव यांनी १८६६ मतांची आघाडी घेतली.

सतराव्या फेरीला पुन्हा मनसेने आघाडी घेतली. त्यानंतर, एकोणिसाव्या फेरीत मनसेला तीन हजारांच्या आसपास मताधिक्य प्राप्त झाले. त्यामुळे आता मनसे ही जागा जिंकणार, अशी शक्यता वर्तविली जात होती. यामुळे केळकर यांची आघाडी १० हजारांवरून थेट सहा हजारांच्या आसपास घसरली. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमधील धाकधूक वाढली होती. त्यानंतर, शहराच्या मध्यवर्ती भागातील मते मोजण्यास सुरुवात झाली आणि तेथून केळकर यांचा विजय निश्चित झाला. यापुढील साडेसात फेºयांमध्ये केळकर यांनी निर्णायक आघाडी घेतली. अखेर, केळकर यांना ९२ हजार २९८ मते मिळाली, तर मनसेचे अविनाश जाधव यांना ७२ हजार ८७४ मते मिळाली. केळकर यांनी जाधव यांचा १९ हजार ४२४ मतांनी पराभव केला.

मागील निवडणुकीत केळकर यांना ७० हजार ८८४ मते मिळाली होती. या निवडणुकीत त्यांच्या मतांमध्ये २१ हजार ४२७ मतांनी वाढ झाली. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांना ठाणे विधानसभा मतदारसंघातून ८३ हजारांची आघाडी मिळाली होती. त्या तुलनेत विधानसभेत केळकर यांच्या आघाडीत तब्बल ६२ हजार मते कमी झाली. एकूणच केळकर यांचा विजय झाला असला, तरी येत्या काळात मनसेने घेतलेली मते पाहता ही शिवसेना आणि भाजप यांच्याकरिता धोक्याची घंटा मानली जात आहे.

ठाणेकर मतदारांना धन्यवाद देईन. पाच वर्षांत केलेल्या कामांची पोचपावती ठाणेकरांनी दिली आहे. भाजप-शिवसेना युतीचा हा विजय आहे. ठाण्याचा विकास करण्याच्या दृष्टीने यापुढेही प्रयत्न करीन. मतांची आघाडी कमी झालेली नाही. मला मागील वेळेच्या तुलनेत २० हजार जास्त मते मिळाली आहेत.- संजय केळकर, ठाणे मतदारसंघातील विजयी उमेदवार, भाजप

शिवसेना, भाजपच्या बालेकिल्ल्यात आमची ताकद नसतानाही आम्ही तरुण पिढीला सोबत घेऊन लढलो. मतदारांनी जी साथ दिली, त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. युतीच्या बालेकिल्ल्यात त्यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. हार-जित तर होत राहतेच, मात्र लढलो त्याचा अभिमान आहे.- अविनाश जाधव, ठाणे मतदारसंघातील मनसेचे उमेदवार

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019thane-acठाणे शहरBJPभाजपाMNSमनसे