शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ७४६ रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:37 IST

ठाणे : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. शनिवारी दिवसभरात ७४६ रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला. ...

ठाणे : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. शनिवारी दिवसभरात ७४६ रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आता २ लाख ६९ हजार ६५ रुग्णांची नोंद झाली. तर जिल्ह्यातील मृतांची संख्या ६ हजार २९९ वर गेली आहे.

ठाणे शहरात २२० रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता ६३ हजार ४९६ झाली आहे. शहरात एकाचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूंची संख्या १ हजार ४०० झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत २१० रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू आहे. आता ६४ हजार ३८६ रुग्ण बाधित असून १ हजार २०७ मृत्यूंची नोंंद झाली आहे.

उल्हासनगरमध्ये ९ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ९५७ झाली. तर, ३७२ मृतांची नोंद कायम आहे. भिवंडीला सात बाधितांसह एकही मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ८३१ असून मृतांची संख्या ३५५ कायम आहे. मीरा-भाईंदरमध्ये ६४ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. या शहरात बाधितांची संख्या २७ हजार ४३५ असून मृतांची संख्या ८०४ आहे.

अंबरनाथमध्ये १३ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. येथे बाधित आठ हजार असून मृत्यू ३१५ आहेत. बदलापूरमध्ये ४० रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधित १० हजार १२५ झाले आहेत. या शहरात एकही मृत्यू नसल्यामुळे मृत्यूंची संख्या १२७ कायम आहे. ग्रामीणमध्ये २१ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही.आता बाधित १९ हजार ६७३ आणि आतापर्यंत ५९७ मृत्यू झाले आहेत.