शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

ठाण्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आले ४२ टक्क्यांवर;८३८ जण परतले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 1:28 AM

ठाणेकरांना मोठा दिलासा

ठाणे : ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता २० टक्क्यांवरून ४२ टक्क्यांवर आले असून सोमवारपर्यंत ८३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. याच कालावधीत दोन हजारांहून अधिक रुग्ण उपचार घेत असले तरी प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही १२०० च्या आसपास आहे.

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कधी १०० ते कधी १५० रुग्ण शहरात आढळत आहेत. त्यामुळे ठाणेकरांच्या चिंतेत वाढ होत आहे. परंतु, क्वॉरंटाइन केलेल्या रुग्णांच्या संख्येमुळेच बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे तीदेखील शहरासाठी समाधानकारक बाब म्हणावी लागणार आहे.

शहरात आजघडीला दोन हजारांहून अधिक रुग्ण हे कोरोनाबाधित आढळले असून यातील ८३८ हून अधिक रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

घाबरण्याऐवजी काळजी घेण्याची गरज

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी ठाणेकरांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र ठाणेकरांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. ज्या रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे, परंतु सौम्य लक्षणे दिसत असतील, अशांना आता रुग्णालयात दाखल करून घेण्याऐवजी घरीच उपचार घेण्याचा सल्ला महानगरपालिकेने दिला आहे. परंतु, झोपडपट्टीत राहणाºया नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येईल, असेही महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.परंतु, मृतांमध्येही ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, ज्यांचे वय ६० हून अधिक आहे, ज्यांना इतर व्याधी आहेत, अशा रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका