शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
4
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
5
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
6
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
7
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
8
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
9
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
10
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
11
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
12
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
13
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
14
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
15
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
16
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
17
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
18
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
20
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य

ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो प्रकल्प अडकला धामणकर नाक्यावर; पुढचा मार्ग निश्चित नसल्याने काम रखडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 14:55 IST

ठाणे बाळकुम भिवंडी कल्याण नाका मार्गे कल्याण या २४. ९० किमी लांबीच्या मार्गासाठी ८४१६ . १५ कोटी रुपये खर्च केल्या जाणाऱ्या या मार्गाचा भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

- नितिन पंडीत 

भिवंडी: भिवंडी बहुचर्चित ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो प्रकल्प पाच मधील दुसऱ्या फेज मधील भिवंडी कल्याण मार्गाचा विकास आराखडा अजूनही बासनात असल्याने ठाणे भिवंडी या पहिल्या फेज मधील काम सुमारे ६० टक्के पूर्ण होत आले असताना पुढील काम अडखळत सुरू असल्याने सध्या तरी ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो भिवंडीत अडकली आहे. धामणकर नाक्या पर्यंत मेट्रोचे काम मोठ्या ताकदीने व जलद गतीजने करण्यात आले आहे मात्र त्यापुढे हे काम सरकले नसल्याने मेट्रो प्रकल्पाचे काम याच ठिकाणी येऊन थांबले आहे . 

ठाणे बाळकुम भिवंडी कल्याण नाका मार्गे कल्याण या २४. ९० किमी लांबीच्या मार्गासाठी ८४१६ . १५ कोटी रुपये खर्च केल्या जाणाऱ्या या मार्गाचा भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. परंतु भिवंडी शहरातील मार्ग आज ही निश्चित झाले नसल्याने मेट्रो जाणार कोठून हा प्रश्न उपस्थित होत आहे . या मेट्रोचे नियोजित भिवंडी शहरातील मार्ग अंजुरफाटा , धामणकर नाका , कल्याण नाका येथून राजनोली नाका मार्गे कल्याणच्या दिशेने जाणार होती परंतु त्याच दरम्यान कल्याण नाका ते राजनोली नाका दरम्यान एमएमआरडीए ने उड्डाणपूल बनविल्याने या मार्गावर पुन्हा मेट्रो साठी मोठया प्रमाणावर रस्ता रुंदीकरण करण्याची गरज असून त्यास येथील व्यापारी व स्थानिक निवासी नागरिक या सर्वांचाच विरोध होत आहे .त्यामुळे भिवंडी वंजारपट्टी नाका पोगाव मार्गे मेट्रो मार्ग वळविण्याचा एक पर्याय समोर आला परंतु तो खर्चिक व कमी उपयोगात येणार असल्याने त्यास आजही प्रतिसाद मिळाला नाही .

भिवंडीतून जाणाऱ्या या मेट्रोचे काम ठाणे बाळकुम ते भिवंडीतील धामणकर नाका पर्यंत काम युद्ध पातळीवर सुरू असून काही ठिकाणी पिलर व त्यावरील आडव्या तुळई टाकून काम पूर्ण होत आले पण त्यापुढे धामणकर नाका ते कल्याण च्या दिशेने जाणार मार्ग अजून ही निश्चित नसून त्या कामाबाबत निविदा प्रक्रिया सुध्दा सुरू झाली नसल्याने मेट्रो १८ ऑक्टोबर २०१९ रोजी सुरू झालेला हा प्रकल्प २०२२ मध्ये पूर्णत्वास जाणार होता परंतु ठाणे येथून सुरू झालेले काम भिवंडीतील धामणकर नाका येथे येऊन थांबले असल्याने या कालावधीत पूर्ण होईल का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने भिवंडीकरांच्या मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होण्यास अजून नेमकी किती कालावधी लागणार याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Metroमेट्रोBhiwandiभिवंडी