शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ठाण्याचा बिहार होतोय का?; माणुसकीला काळिमा फासणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 23:38 IST

माणुसकीला काळिमा फासणारी घटना : सामाजिक संघटनांच्या महिलांचे मत

ठाणे : कर्जाचा हप्ता थकविल्याने पत्नीला उचलून नेण्याची धमकी एका खासगी वित्तीय कंपनीच्या प्रतिनिधीने दिली. यावरून ठाण्यातील विविध संघटनांच्या महिलांमधून निषेधाचा सूर व्यक्त होत आहे. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात घडलेली ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून, ठाण्याचे बिहार होत आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तसेच अशी धमकी देणाऱ्यावर पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे.

दहा लाखांच्या व्यावसायिक कर्जाचा हप्ता थकविल्यामुळे व्यावसायिकाच्या पत्नीला उचलून नेण्याची धमकी मॅन्टिफी फायनान्स कंपनीच्या राज शुक्ला या प्रतिनिधीने दिली होती. यावरून पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित होत आहे. ही घटना दखलपात्र गुन्ह्याची असल्याने पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून त्या प्रतिनिधीला अटक करण्याची मागणी समस्थ महिलावर्गाकडून होत आहे. ही अत्यंत असंस्कृत आणि असभ्यपणाची लक्षणे आहे. महाराष्ट्राने स्त्रियांचा नेहमीच आदर केला आहे आणि अशी घटना महाराष्ट्रात घडत असतील तर त्या घटनेची दखल पोलिसांनी घेतली पाहिजे, असे मत व्यक्त होत आहे. 

पत्नीला उचलून नेऊ असे बोलणे हा मोठा गुन्हा आहे. मुळात आजची परिस्थिती पाहता कर्जाचा हप्ता भरण्याचा तगादा ती वित्तीय कंपनी लावू शकत नाही, तसे आदेशही आहेत. पत्नीला उचलून नेऊ असे म्हणणाऱ्याला अटक झालीच पाहिजे. ही तर माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. आपण कोणत्या काळात आहोत ?     - वंदना शिंदे,  सदस्य, भारतीय महिला फेडरेशन

अशी धमकी देणे यावरून महाराष्ट्र मागे जातोय का? असा प्रश्न पडला आहे. महाराष्ट्र हे सुसंकृत राज्य आहे. चांगल्या गोष्टींची प्रथा महाराष्ट्राने पाडली आहे. आता महाराष्ट्राचा बिहार होतोय का? असे वाटत आहे. जर असे कुणी बोलू शकते तर त्यांची मानसिकता तशीच आहे. अशा लोकांवर कोणाचाही वचक किंवा धाक राहिलेला नाहीये. - सुमीता दिघे, सामाजिक कार्यकर्त्या

आताच्या काळात अशी दिली जाणारी धमकी ऐकल्यावर विचित्र वाटत आहे. जुलूमशाही परत आली की काय असे वाटत आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे.- यामिनी पानगावकर, लेखिका

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र