शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

बालकांच्या २५ टक्के आरक्षणातील प्रवेशाच्या ठाणे जिल्ह्यात दहा हजार जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 5:49 PM

दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये देखील आर्थिक दुर्बल घटक, मागासवर्गीय परिवारातील मुलां - मुलींसाठी २५ टक्के जागा आरक्षित ठेवून मोफत प्रवेश दिला जात आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यात १६ हजार ५४६ जागा राखिव आहेत. त्यापैकी आतापर्यंत सुमारे सहा हजार २९१ जागांवर प्रवेश निश्चित केले

ठळक मुद्दे शिक्षणाचा हक्क या कायद्याखाली जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणा-या ६४० शाळांमध्ये या १६ हजार ५४६ जागा आरक्षित जागा रिक्त असूनही विद्यार्थ्यास दूरवरून यावे लागण्याच्या कारणाखाली काही शाळा विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारात आहेत.पालकांना चांगले वागणून न देता अपमानीत करण्याचा देखील प्रयत्न

ठाणे : मोठमोठ्या रकमेच्या देणग्या देऊन बालकांचे प्रवेश श्रीमंत पालकांकडून घेतले जातात. या महागड्या पण दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये देखील आर्थिक दुर्बल घटक, मागासवर्गीय परिवारातील मुलां - मुलींसाठी २५ टक्के जागा आरक्षित ठेवून मोफत प्रवेश दिला जात आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यात १६ हजार ५४६ जागा राखिव आहेत. त्यापैकी आतापर्यंत सुमारे सहा हजार २९१ जागांवर प्रवेश निश्चित केले. तिस-या फेरी अखेरच्या या प्रवेशानंतर देखील जिल्ह्याभरात अजून दहा हजार २५५ जागा रिक्त आहेत. त्यासाठी दोन दिवसात चौथ्या फेरीव्दारे प्रवेश देण्याचे प्रयत्न आहेत.           प्लेगृप, फ्रीकेजी, ज्युनिअर केजी, सिनिअर केली आणि फर्स्ट म्हणजे पहिलीच्या वर्गात या २५ टक्के आरक्षणातून बालकांना मोफत प्रवेश मिळत आहे. शिक्षणाचा हक्क या कायद्याखाली जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणा-या ६४० शाळांमध्ये या १६ हजार ५४६ जागा आरक्षित आहेत. त्यापैकी दोन फे-यांव्दारे पाच हजार ३५२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. तिस-या फेरीव्दारे निवड केलेल्या ९३९ विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत केवळ १५० विद्यार्थ्यांचे प्रवेश होणे बाकी आहेत. संबंधीत शाळांमध्ये हे प्रवेश झाले आहेत. मात्र त्यांनी आॅनलाईन अपडेट अजून केले नाहीत. पण आगामी दोन दिवसात या प्रवेशांचे अपडेट व पुन्हा चौथ्या फेरीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची निवड होईल, असा दावा शिक्षण विभागाव्दारे करण्यात आला.              आधीच्या दोन फे-यांव्दारे पाच हजार ३५२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. आता तिस-या फेरी अखेर ९३९ निवड केलेल्यापैकी प्लेगृपसाठी दहा विद्यार्थ्यांचे प्रवेश आहेत. तर प्रीकेजीच्या वर्गासाठी २२६ विद्यार्थी, ज्यु.के.जी.साठी ३१६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले आहेत. याप्रमाणेच सीकेजीच्या वर्गासाठी चार विद्यार्थी आणि पहिलीच्या वर्गा करीता ३८३ विद्यार्थ्यांना या तिस-या फेरीव्दारे दिल्याचे नियोजन आहेत. पाल्याचे प्रवेश वेळेत घेण्यासाठी पालकांना सतत सांगितले जात असल्याचे सांगितले जात आहेत. पण विविध कागदपत्रांसह अन्य तृटींच्या कारणाखाली संबंधीत बालकांच्या पाल्याना प्रवेश देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे प्रवेश घेतलेल्या बालकांची संख्या कमी दिसून येत आहेत.** जागा रिक्त असूनही विद्यार्थ्यास दूरवरून यावे लागण्याच्या कारणाखाली काही शाळा विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारात आहेत. तर काही विविध कागदपत्रे, आधारकार्ड आदींच्या त्रृटी काढून प्रवेश नाकारले जात आहेत. पालकांना चांगले वागणून न देता अपमानीत करण्याचा देखील प्रयत्न काही शाळांमध्ये होत असल्याच्या तक्रारी पालकांच्या आहेत. शाळेतील साहित्य , गणवेश, स्कूल बस प्रवास आदीं शुल्कांबाबत देखील पालक व शाळांमध्ये शाब्दीक चकमकी होत असल्यामुळे प्रवेश रखडले जात आहेत. तर काहींकडे मोबाईल नसल्यामुळे निवड झाल्याचा निरोप वेळेत न मिळाल्याची समस्या देखील या आरटीई प्रवेशात ऐकायला मिळत आहे.

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळा