शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नेमलेल्या पथकांनाच गैरप्रकारांची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 17:43 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : मीरा भाईंदरमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याने कोरोना संसर्ग झपाट्याने पसरला. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे वैद्यकीय सेवा, पालिका व पोलीस आदी यंत्रणांवर आर्थिक आणि प्रशासकीय ताण मोठ्या प्रमाणावर पडत आहे.

मीरारोड - कोरोना संसर्ग आटोक्यात आण्यासाठी कोरोना रोखण्यासाठीच्या नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी शहरात ५७ पथके तैनात करून कोरोना संसर्ग रोखण्यासाठीचा नवा पॅटर्न शहरात आणला. परंतु या बहुतांश पथकांना कामचुकारपणा आणि गैरप्रकाराची लागण झाल्याने नियमांचे पालन होताना दिसत नाही. एका पथकास कारवाई करण्यास सांगून देखील त्यांनी उल्लंघन करणाऱ्यास सावध केल्याने शेवटी स्वतः उपायुक्त अजित मुठे यांनीच जाऊन कारवाई करत २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. 

मीरा भाईंदरमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याने कोरोना संसर्ग झपाट्याने पसरला. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे वैद्यकीय सेवा, पालिका व पोलीस आदी यंत्रणांवर आर्थिक आणि प्रशासकीय ताण मोठ्या प्रमाणावर पडत आहे. संसर्ग झाल्यावर वैद्यकीय उपचार यंत्रणा आणि होणारा मोठा खर्च  पाहता त्या ऐवजी कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी जास्तीजास्त खबरदारी घेण्यासाठी घेता यावी  म्हणून मीरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी तब्बल ५७ गस्ती पथके शहरात नेमली. प्रत्येक पथकात पालिकेचा लिपिक, शिपाई, सफाई कामगार व ठेक्याचा सुरक्षा रक्षकासह १ पोलीस कर्मचारी असे ५ जणांचा समावेश आहे. पथकांचे प्रमुख व नियंत्रण अधिकारी प्रत्येक प्रभाग समिती निहाय नेमण्यात आलेले आहेत. 

पथकांनी त्यांच्या अखत्यारीतील प्रभागात सतत गस्त घालण्यासह कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व गरज पडल्यास फौजदारी कारवाई करायची आहे. विना मास्क वा मास्क नीट घातलेला नसेल, गर्दी  केली असेल, बंदी असून देखील दुकाने - आस्थापना खुली असेल, फेरीवाले बसले असतील किंवा अन्य नियमांचे उल्लंघन होत असेल तर अशांवर ठरवून दिलेल्या दंडानुसार कारवाई पथकांनी करायची आहे. पथकांमधील जगदीश भोपतराव, राज घरत आदी काही अधिकारी कारवाई तसेच दंड वसुली केल्याचे पालिककडून कळवले जाते. परंतु काही अपवाद वगळताच ही पथके कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर काटेकोर आणि नियमितपणे कारवाई करत असल्याचे शहरात चित्र आहे. त्यातही प्रत्येक पथकात पोलीस कर्मचाऱ्याचा आयुक्तांनी समावेश केला असला तरी पोलीस कर्मचारी पथका सोबत येत नसल्याचे सुद्धा दिसून आले आहे. 

कोरोना संसर्ग पसरण्यास नियमांचे काटेकोर पालन केले जात नसल्याचे महत्वाचे कारण असल्याने लोकांचा बेशिस्तपणा रोखण्यासाठी नगरसेवक - राजकारण्यांसह पोलीस व पालिका प्रशासनाने मिळून कारवाईचा कठोर बडगा उगारणे गरजेचे आहे. परंतु त्यासाठी नेमलेली पथकेच कामचुकारपणा आणि गैरप्रकार करू लागल्याने शहरात राजरोस नियमांचे उल्लंघन सुरू आहे. भाईंदर पूर्वेस रेल्वे स्थानक समोर असलेले सुरभी स्नॅक्स कॉर्नर हे नियमांचे उल्लंघन करून सुरु असल्याचे आणि दुकाना बाहेर गर्दी होत असल्याची माहिती उपायुक्त अजित मुठे यांनी रविवारी तेथील प्रभाग अधिकारी व पथकास छायाचित्रासह दिली. परंतु पथक गेले आणि सुरभी केंद्र बंद असल्याचे फोटो उपायुक्तांना पाठवून उपायुक्तांची माहिती खोटी ठरवल . 

रात्री उशिरापर्यंत सुरभी नाश्ता केंद्र सुरू असल्याचे मुठे यांना समजले. सोमवारी स्वतः मुठे यांनीच थेट सुरभी नाश्ता केंद्रावर धाड टाकली आणि बंदी असून सुद्धा ते दुकान सुरु असल्याचे सिद्ध केले. मुठे यांनी पालिका पथकास बोलावून घेऊन चालकाकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल करायला लावला. या प्रकरणी प्रभाग अधिकारी दामोदर संख्ये आणि पथकाची हजेरी घेत खुलासा सादर करण्यास सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरात मास्क घालणे बंधनकारक असूनही अनेक लोक मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणे, आस्थापना, दुकाने, फेरीवाले, गृहनिर्माण संस्था, झोपडपट्ट्या आदीपासून अगदी महापालिका कार्यालयात सुद्धा वावरतात. भाज्या - मासळी आदी खरेदीसाठी प्रचंड गर्दी करणे, खाण्या - पिण्याच्या ठिकाणी सुद्धा गर्दी असते.  त्यामुळे नियमांचे पालन न करता संसर्ग पसरवणाऱ्या लोकांवर कारवाईचा कठोर बडगा उगारण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक