शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

आमदारांच्या गावातच टँकर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 2:33 AM

जलुबाईची विहीर आटली; आश्रमशाळेला सुटी असल्याने मुलांची त्रासातून सुटका

- जनार्दन भेरेभातसानगर : शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई दोन महिन्यांपासून दिवसेंदिवस तीव्र होते आहे. येथील १४२ गावपाड्यांत टंचाईच्या झळा बसत असून या गावांमध्ये आमदारांच्या गावाचाही समावेश आहे.पेंढरघोळ हे तालुक्याचे आ. पांडुरंग बरोरा यांचे गाव. या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी वनविभागाच्या वतीने पाणीयोजना राबवण्यात आली आहे. कधीही न आटणाऱ्या जलुबाई या विहिरीवरून पाणीयोजना तयार करण्यात येऊन अनेक वर्षांपासून येथे पाणीपुरवठा केला जातो. तीन पाडे जवळजवळ असल्याने त्यांनादेखील पाण्याचा प्रश्न कधी भेडसावला नाही. मात्र, या गावाला पाणी पुरवण्यासाठी असलेली जलुबाईची ही विहीर यंदा आटली. परिणामी, आज या पाड्याला आटगाव, पेंढारघोळच्या सरपंच पद्मावती बरोरा यांच्या प्रयत्नाने टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या विहिरींच्या वरच्या बाजूला असणारा तलावही यंदा लवकरच आटला. यामुळे परिसराला बारमाही पाणीपुरवठा केल्यानंतरही भरून राहणाºया या विहिरीने आता तळ गाठला आहे. विहीर कोरडी झाल्याने या पाड्यांना पाण्यासाठी पावसाची वाट पाहावी लागणार आहे. या पाड्यातच आदिवासी आश्रमशाळा आहे. सध्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपल्याने ते घरी गेले आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय टळली आहे. सातशे ते साडेसातशे लोकसंख्या असलेल्या या पाड्याला दररोज टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.अखेर दुर्गापूरवासीयांना टँकरने पाणीपुरवठामुरबाड : शहापूरपाठोपाठ मुरबाड तालुक्यातही पाणीटंचाई तीव्र होते आहे. त्यातच, आठवडाभरापूर्वी तालुक्यातील दुर्गापूर येथील ‘पाण्यासाठी नववधू विहिरीवर’ गेल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आणि हे गाव एकदम प्रकाशझोतात आले. मुरबाड पंचायत समितीने त्याची तत्काळ दखल घेत तेथे टँकरची सुविधा उपलब्ध केल्याने दुर्गापूर ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.डिसेंबरपासून धसई परिसरातील कळभांड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दुर्गापूर येथील ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र, तरीही दुर्गापूर गावाचा समावेश टंचाई आराखड्यात झाला नाही.मुरबाड तालुक्यातील २०७ गावांपैकी चार गावे आणि १४ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई असून त्यात अजून वाढ होऊ शकते. १० गावे आणि १५ वाड्यांमध्येदेखील तीव्र स्वरूपात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आता दुर्गापूर गावाला त्यात प्राधान्य दिल्याने त्या ठिकाणी दररोज दोन टँकरने पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून मिळाली आहे.पाऊस लवकर गेल्याने या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे टंचाई निर्माण झाली आहे. त्यावर तोडगा म्हणून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.- पद्मावती बरोरा, सरपंच, आटगाव-पेंढरघोळ ग्रामपंचायतकधीही न आटणारी विहीर आटल्याने पाड्यात टंचाई निर्माण झाली आहे. त्यावर मात करणे सुरू आहे. पुढच्या वर्षी हाच त्रास जाणवू नये, यासाठी उपाययोजना करण्यात येईल.- भास्कर बरोरा, माजी सरपंच

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई