शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीच्या चार नामनियुक्त नगरसेवकांचे निलंबन रद्द; हायकोर्टाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:22 IST

सिद्धेश्वर मोगलप्पा कामूर्ती, राहुल छगन खटके, मोहम्मद साजीद अशफाक खान व देवानंद रूपचंद थळे यांचे निलंबन रद्द

मुंबई : भिवंडी महापालिकेवर नऊ महिन्यांपूर्वी नामनियुक्तीने नेमलेल्या सिद्धेश्वर मोगलप्पा कामूर्ती, राहुल छगन खटके, मोहम्मद साजीद अशफाक खान व देवानंद रूपचंद थळे या चार नगरसेवकांची नियुक्ती निलंबित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. परिणामी, हे चौघेही पुन्हा नगरसेवक म्हणून काम करू शकतील.भिवंडी-निजामपूर महापालिकेने १२ जुलै २०१८ च्या ठरावाने या चौघांसह आठ जणांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून निवड केली. पाच महिन्यांनी श्याम मनसुखलाल अगरवाल या निवडून आलेल्या भाजप नगरसेवकाच्या तक्रारीवरून नगरविकास खात्याने महापालिकेचा संपूर्ण ठराव निलंबित न करता त्यातील फक्त चौघांच्या नियुक्तीचा भाग २७ नोव्हेंबर २०१८ रोजी निलंबित केला.याविरुद्ध या चौघांनी केलेल्या याचिका मंजूर करून न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. बी.पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठाने सरकारचा निर्णय रद्द केला. मुळात महापालिकेच्या ठरावात सरकारने हस्तक्षेप करण्याचे सबळ कारण नव्हते. चारही निलंबित नगरसेवक काँग्रेसचे आहेत. भिवंडी महापालिकेत युतीची सत्ता आहे. त्यामुळे भाजप नगरसेवकाच्या तक्रारीचे निमित्त करून सरकारने विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना निलंबित करण्याचे राजकारण केले. हा पक्षीय राजकारणासाठी अधिकारांचा उघडपणे केलेला सवंग वापर आहे, असे ताशेरे न्यायालयाने ओढले.खंडपीठाने म्हटले की, या चौघांची नामनियुक्ती नियमांनुसार नाही, असे अगरवाल यांना वाटत होते तर त्यासाठी न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग त्यांना उपलब्ध होता. त्याप्रमाणे त्यांनी याचिका केलीही होती. परंतु त्यावर आदेश होण्याआधीच त्यांनी सरकारकडे धाव घेतली. सरकारनेही अगरवाल यांना पर्याय उपलब्ध नाही, असे खोटे कारण देत त्यांच्या तक्रारीची दखल घेतली.न्यायालय म्हणते की, सरकारने हा निर्णय घेण्याचे समर्पक कारण दिलेले नाही. या चौघांच्या नियुक्त्या नियमांनुसार झाल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसते, एवढेच सरकारने म्हटले. एवढेच नव्हे तर पाच महिन्यांपूर्वी झालेल्या या नेमणुका आता का निलंबित केल्या जात आहेत, याचाही खुलासा केलेला नाही.या सुनावणीत याचिकाकर्त्या नगरसेवकांसाठी अ‍ॅड. ड. रामदास सब्बन, राज्य सरकारसाठी सहायक सरकारी वकील कीर्ति कुलकर्णी तर महापालिकेसाठी अ‍ॅड. नारायण बुबना यांनी काम पाहिले.पुन्हा असे वागू नकाया प्रकरणात वैधानिक अधिकारांचा राजकारणासाठी वापर केल्याचे स्पष्ट झाल्याने भविष्यात पुन्हा असे करण्यास संबंधित धजावू नयेत, यासाठी सरकारला दाव्याच्या खर्चापोटी अद्दल घडेल, एवढा दंड लावावा, अशी मागणी अ‍ॅड. सब्बन यांनी केली. मात्र सरकारी वकिलाने गयावया केल्याने खंडपीठाने तसा आदेश दिला नाही.

टॅग्स :bhiwandiभिवंडीMumbai High Courtमुंबई हायकोर्ट