शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

परवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास निलंबनाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 01:57 IST

राज्यातील आरोग्य विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी हे वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीशिवाय कार्यालयात अनुपस्थित राहत असल्याचे तसेच महत्त्वाच्या बैठकांना दांडी मारीत असल्याचे निदर्शनास आले आहे

नारायण जाधवठाणे : राज्यातील आरोग्य विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी हे वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीशिवाय कार्यालयात अनुपस्थित राहत असल्याचे तसेच महत्त्वाच्या बैठकांना दांडी मारीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कधीकधी तर डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे रुग्ण दगावण्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे.आरोग्य विभागाच्या २१ जून २०१८ च्या निर्णयानुसार पूर्वपरवानगीशिवाय आपल्या कामाच्या ठिकाणाचे मुख्यालय सोडल्यास किंवा महत्त्वाच्या बैठकांना दांडी मारणाºया कर्मचारी आणि अधिकाºयांवर एका महिन्याच्या आत निलंबनाची कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहेत....तर वरिष्ठ अधिकारी जबाबदारडॉक्टर वा कर्मचाºयांच्या अनुपस्थितीअभावी ग्रामीण भागात प्रसुती झालेल्या अवघडलेल्या महिला, सर्प, विंचु किंवा अपघातग्रस्त रुग्ण यांचे तर यामुळे खूपच हाल होतात. परंतु, शासनाच्या नव्या आदेशांमुळे या सर्वांना मोठा दिलासा मिळणार आहे.दोषींवर अशी कारवाई केली नाही तर त्यांना पाठिशी घालणाºया संबधित अधिकाºयास जबाबदार धरण्यात येईल,असेही बजावण्यात येणार आहे.यांना बसणार फटकाआरोग्य विभागाच्या आदेशाचा दणका ठाणे जिल्ह्यातील १ जिल्हा रुग्णालय, २ उपजिल्हा रुग्णालय, ६ ग्रामीण रुग्णालये आहेत. तर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील १० रुग्णालये, १ विशेष रुग्णालये, ८ वाखाने, १ प्रसुतीगृह,३३ प्राथमिक आरोग्य केंद्र, १८७ उपकेंद्रातील २३४ डॉक्टर, ६०० परिचारीकांसह इतर कर्मचाºयांना बसणार आहे.ठाणे हा सर्वात जास्त नागरिकरण झालेला राज्यातील मोठा जिल्हा असून जिल्ह्यात सहा महापालिकांसह ग्रामीणही मोठा आहे. यात शहापूर, मुरबाड सारखे आदिवासी तालुकेही आहेत.येथील दुर्गम भागातील अनेक दवाखाने, ग्रामीण रुग्णालयातील बहुतांश डॉक्टर व अनेक कर्मचारी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडतात. काही तर ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली सारख्या शहरी भागात राहून येजा करतात.यात बºयाचदा ते जिल्हारूग्णालय, तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयात हजर नसतात. पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडतात, सुटीत परदेशात जातात. यामुळे अनेकदा आरोग्यसेवेचे संपूर्ण नियोजन कोलमडते.पावसाळ्यात तर ग्रामीण भागातील रूग्णांचे अतोनात हाल होतात. ठाणे हा अतिवृष्टीचा जिल्हा असून येथे १२०० ते २००० मिमीपर्यंत वार्षिक पाऊस पडतो. यामुळे साथीचे आजार येथे नेहमीच डोकेवर काढतात.एका महिन्याच्या आत होणार कारवाईअनेकदा डॉक्टरच रुग्णालयात नसल्याने रुग्ण दगावतो. किंवा त्यांचे आजार बळावतात. यामुळे आरोग्य विभागाने हे आदेश काढले आहेत. यानुसार अशा कामचुकार कर्मचाºयांच्या अनुपस्थितीचा अहवाल वरिष्ठांना पाठवायचा आहे. त्यानंतर अशा कर्मचाºयांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर आले नाही तर त्यांना एका महिन्याच्या आत निलंबित करून शिस्तभंगाची कारवाई करावयाची आहे.