शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

परवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास निलंबनाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 01:57 IST

राज्यातील आरोग्य विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी हे वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीशिवाय कार्यालयात अनुपस्थित राहत असल्याचे तसेच महत्त्वाच्या बैठकांना दांडी मारीत असल्याचे निदर्शनास आले आहे

नारायण जाधवठाणे : राज्यातील आरोग्य विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी हे वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीशिवाय कार्यालयात अनुपस्थित राहत असल्याचे तसेच महत्त्वाच्या बैठकांना दांडी मारीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कधीकधी तर डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे रुग्ण दगावण्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे.आरोग्य विभागाच्या २१ जून २०१८ च्या निर्णयानुसार पूर्वपरवानगीशिवाय आपल्या कामाच्या ठिकाणाचे मुख्यालय सोडल्यास किंवा महत्त्वाच्या बैठकांना दांडी मारणाºया कर्मचारी आणि अधिकाºयांवर एका महिन्याच्या आत निलंबनाची कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहेत....तर वरिष्ठ अधिकारी जबाबदारडॉक्टर वा कर्मचाºयांच्या अनुपस्थितीअभावी ग्रामीण भागात प्रसुती झालेल्या अवघडलेल्या महिला, सर्प, विंचु किंवा अपघातग्रस्त रुग्ण यांचे तर यामुळे खूपच हाल होतात. परंतु, शासनाच्या नव्या आदेशांमुळे या सर्वांना मोठा दिलासा मिळणार आहे.दोषींवर अशी कारवाई केली नाही तर त्यांना पाठिशी घालणाºया संबधित अधिकाºयास जबाबदार धरण्यात येईल,असेही बजावण्यात येणार आहे.यांना बसणार फटकाआरोग्य विभागाच्या आदेशाचा दणका ठाणे जिल्ह्यातील १ जिल्हा रुग्णालय, २ उपजिल्हा रुग्णालय, ६ ग्रामीण रुग्णालये आहेत. तर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील १० रुग्णालये, १ विशेष रुग्णालये, ८ वाखाने, १ प्रसुतीगृह,३३ प्राथमिक आरोग्य केंद्र, १८७ उपकेंद्रातील २३४ डॉक्टर, ६०० परिचारीकांसह इतर कर्मचाºयांना बसणार आहे.ठाणे हा सर्वात जास्त नागरिकरण झालेला राज्यातील मोठा जिल्हा असून जिल्ह्यात सहा महापालिकांसह ग्रामीणही मोठा आहे. यात शहापूर, मुरबाड सारखे आदिवासी तालुकेही आहेत.येथील दुर्गम भागातील अनेक दवाखाने, ग्रामीण रुग्णालयातील बहुतांश डॉक्टर व अनेक कर्मचारी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडतात. काही तर ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली सारख्या शहरी भागात राहून येजा करतात.यात बºयाचदा ते जिल्हारूग्णालय, तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयात हजर नसतात. पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडतात, सुटीत परदेशात जातात. यामुळे अनेकदा आरोग्यसेवेचे संपूर्ण नियोजन कोलमडते.पावसाळ्यात तर ग्रामीण भागातील रूग्णांचे अतोनात हाल होतात. ठाणे हा अतिवृष्टीचा जिल्हा असून येथे १२०० ते २००० मिमीपर्यंत वार्षिक पाऊस पडतो. यामुळे साथीचे आजार येथे नेहमीच डोकेवर काढतात.एका महिन्याच्या आत होणार कारवाईअनेकदा डॉक्टरच रुग्णालयात नसल्याने रुग्ण दगावतो. किंवा त्यांचे आजार बळावतात. यामुळे आरोग्य विभागाने हे आदेश काढले आहेत. यानुसार अशा कामचुकार कर्मचाºयांच्या अनुपस्थितीचा अहवाल वरिष्ठांना पाठवायचा आहे. त्यानंतर अशा कर्मचाºयांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर आले नाही तर त्यांना एका महिन्याच्या आत निलंबित करून शिस्तभंगाची कारवाई करावयाची आहे.