शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

शहिदाबद्दल बेताल वक्तव्य करणे हा देशाचा अपमान- सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 01:53 IST

स्मार्ट सिटी, स्टार्टअप, डिजिटल इंडियासह विविध योजना फसल्या

ठाणे : साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेले वक्तव्य हे अतिशय लाजिरवाणे असून एखाद्या योद्धयाबद्दल असे वक्तव्य करणे, हा देशाचा आणि संपूर्ण महाराष्टÑाचा अपमान आहे. यामुळे सत्ताधारी पक्षाने त्यावर कारवाई करणे अपेक्षित असताना त्यांनी उमेदवारीचे बक्षीस देणे, ही अतिशय दुर्दैवी बाब असल्याचे मत राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी ठाण्यात व्यक्त केले.राष्टÑवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारार्थ ठाण्यातील एका सभागृहात आयोजित महिला मेळाव्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. राज्यातील मराठी शाळा बंद करण्याचा प्रयत्न युती सरकारकडून सुरूअसून काँग्रेस, राष्टÑवादी पक्ष मराठी शाळा केव्हाही बंद पडू देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. डान्स बारबंदी हटवावी, अशी कोणीही मागणी केली नव्हती. मात्र, या मंडळींनी ही बंदी उठवून काय साधले, असा सवालही त्यांनी केला. ज्या योद्धयामुळे आपण सुरक्षित आहोत, अशांबद्दल साध्वींनी बेताल वक्तव्य करणे अतिशय चुकीचे आहे. त्यामुळे या महिलेला साध्वी म्हणावे का, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मागील पाच वर्षांत विकासाची कोणतीच कामे सत्ताधाऱ्यांकडून झालेली नाहीत. स्मार्ट सिटीचा प्रकल्प संपूर्ण देशात फसला आहे. स्टार्टअप, डिजिटल इंडिया यासारख्या योजनाही फसल्या आहेत. विकासाचे मुद्दे घेऊन कुठेही भाजपकडून प्रचार होताना दिसत नाही.उमेदवारीसाठी पंतप्रधानांचे शक्तिप्रदर्शन ही दुर्दैवी बाबउमेदवारी अर्ज भरण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना शक्तिप्रदर्शन करावे लागते, यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कुठलीच नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडीवर बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांच्याकडे विकासाचे कोणतेही मुद्दे नसल्याने ते अशा पद्धतीने वक्तव्य करत आहेत. त्यांनी आपण ज्या खुर्चीवर बसलो आहोत, त्याचा किमान मान राखावा, असेही वाटते. राज्यात आज पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत आहे. परंतु, यावर युतीकडून काहीच बोलले जात नसल्याचेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Supriya Suleसुप्रिया सुळे