शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शहिदाबद्दल बेताल वक्तव्य करणे हा देशाचा अपमान- सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 01:53 IST

स्मार्ट सिटी, स्टार्टअप, डिजिटल इंडियासह विविध योजना फसल्या

ठाणे : साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेले वक्तव्य हे अतिशय लाजिरवाणे असून एखाद्या योद्धयाबद्दल असे वक्तव्य करणे, हा देशाचा आणि संपूर्ण महाराष्टÑाचा अपमान आहे. यामुळे सत्ताधारी पक्षाने त्यावर कारवाई करणे अपेक्षित असताना त्यांनी उमेदवारीचे बक्षीस देणे, ही अतिशय दुर्दैवी बाब असल्याचे मत राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी ठाण्यात व्यक्त केले.राष्टÑवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारार्थ ठाण्यातील एका सभागृहात आयोजित महिला मेळाव्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. राज्यातील मराठी शाळा बंद करण्याचा प्रयत्न युती सरकारकडून सुरूअसून काँग्रेस, राष्टÑवादी पक्ष मराठी शाळा केव्हाही बंद पडू देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. डान्स बारबंदी हटवावी, अशी कोणीही मागणी केली नव्हती. मात्र, या मंडळींनी ही बंदी उठवून काय साधले, असा सवालही त्यांनी केला. ज्या योद्धयामुळे आपण सुरक्षित आहोत, अशांबद्दल साध्वींनी बेताल वक्तव्य करणे अतिशय चुकीचे आहे. त्यामुळे या महिलेला साध्वी म्हणावे का, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मागील पाच वर्षांत विकासाची कोणतीच कामे सत्ताधाऱ्यांकडून झालेली नाहीत. स्मार्ट सिटीचा प्रकल्प संपूर्ण देशात फसला आहे. स्टार्टअप, डिजिटल इंडिया यासारख्या योजनाही फसल्या आहेत. विकासाचे मुद्दे घेऊन कुठेही भाजपकडून प्रचार होताना दिसत नाही.उमेदवारीसाठी पंतप्रधानांचे शक्तिप्रदर्शन ही दुर्दैवी बाबउमेदवारी अर्ज भरण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना शक्तिप्रदर्शन करावे लागते, यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कुठलीच नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडीवर बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांच्याकडे विकासाचे कोणतेही मुद्दे नसल्याने ते अशा पद्धतीने वक्तव्य करत आहेत. त्यांनी आपण ज्या खुर्चीवर बसलो आहोत, त्याचा किमान मान राखावा, असेही वाटते. राज्यात आज पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत आहे. परंतु, यावर युतीकडून काहीच बोलले जात नसल्याचेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Supriya Suleसुप्रिया सुळे