शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

अरे देवा ! रेल्वेचे तिकीट नाही मिळालं; वाहतुकी कोंडीमुळे हुकली विद्यार्थ्यांची  परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 17:46 IST

मोठ्या प्रमाणात झालेल्या वाहतूक कोंडीमुळे आणि रेल्वेचं तिकिट न मिळाल्यानं विद्यार्थ्यांची मेहनत गेली वाया.

ठळक मुद्देमोठ्या प्रमाणात झालेल्या वाहतूक कोंडीमुळे आणि रेल्वेचं तिकिट न मिळाल्यानं विद्यार्थ्यांची मेहनत गेली वाया.

मयुरी चव्हाण 

खड्डयांमुळे आजवर अनेक अपघात झालेले आपण ऐकले आहेत. इतकंच नाही तर लोकलसेवेच्या प्रवासासाठी मर्यादा असल्याने कामावरही लेटमार्क लागल्याचे प्रकार समोर आले. मात्र वाहतूक कोंडी आणि खड्डे आणि एकंदरीतच खराब रस्त्यांमुळे कल्याण- डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परीसरातील सुमारे 10 ते 15 विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर उशिरा पोहचले. परिणामी, या विद्यार्थ्यांना  परीक्षेला मुकावे लागले आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून केलेली मेहनत वाया गेली अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिल्या आहेत. 

एमआयडीसी विभागाच्या असिस्टंट पदासाठी शनिवारी ठाणे येथील घोडबंदर परिसरातील नियोजित परीक्षा केंद्रावर संध्याकाळी ५ वाजता परीक्षा होणार होती. मात्र शनिवारी, एकीकडे पाऊस, खड्डे, खराब रस्ते आणि ट्रॅफिक जाम यामुळे काही विद्यार्थी उशिरा परीक्षा केंद्रांवर पोहोचले. परिणामी, विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास मुकावे लागले आहे. या प्रकारामुळे परीक्षेसाठी केलेली सर्व मेहनत वाया गेली अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. शहापूर ,मुरबाड, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ व ग्रामीण भागातील  बहुतांश विद्यार्थी अभ्यास करूनही परीक्षा देऊ न शकल्याने खंत व्यक्त केली. तर काही विद्यार्थी ठाणे शहरात पोहोचले खरे मात्र वाहतूक कोंडी इतकी होती की परीक्षा केंद्रावर पोहचेपर्यंत तब्बल तीन तासांचा कालावधी लागला अस विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले आहे. 

परीक्षा पुन्हा घेऊन, एक संधी पुन्हा द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. कोरोनाचा कालावधी असल्याने तिकीट मिळत नव्हते. त्यामुळे रस्ता हाच एकमेव पर्याय होता. अशा स्थितीत, ओला, रिक्षा, टॅक्सीचा आधार घेत प्रवास करावा लागतो. मात्र, सतत पडणारा पाऊस, रस्त्यांची सुरू असलेली कामं, खड्डे, खराब रस्ते व वाहतूक कोंडीमुळे वेळेआधी निघूनही परीक्षा केंद्रावर  जाण्यास उशिर झाला असेही या निवेदनात म्हटले आहे. हे  निवेदन परीक्षा केंद्रावर जमा केल्याचं विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आलं. मात्र असं कोणतेही निवेदन प्राप्त झाले नसल्याचे एमआयडीसीने स्पष्ट केले आहे. तर यासंदर्भात मंत्रालयात दाद मागितली जाईल असे परीक्षा देण्यास इच्छुक असलेल्या सुरेखा केदार यांनी सांगितले. 

एमआयडीसी प्रशासन काय म्हणाले ? काही परीक्षार्थी पाच वाजून गेल्यावर आले ही वस्तुस्थिती खरी आहे. परीक्षेची वेळ पाच वाजता होती. त्यासाठी साडेतीन वाजल्यापासून प्रवेश दिला जाणार होता.साडेचार वाजता गेट बंद करण्यात येईल अस स्पष्ट करण्यात आलं होतं. परीक्षा सुरू होण्यापूर्वी पंधरा मिनिटं अगोदर जे विद्यार्थी आले त्यांना सुद्धा प्रवेश देण्यात आला. मात्र परीक्षा सुरू झाल्यानंतर  जे विद्यार्थी आले त्यांना प्रवेश दिला गेला नाही असे ठाणे एमआयडीसीचे  विभागीय अधिकारी विजयसिंग पाटील यांनी सांगितले. तसेच आवश्यक प्रक्रिया कम्प्युटर बेस असल्यामुळे लॉग इन व इतर गोष्टी दिल्यानंतर कोणालाही प्रवेश दिला गेला नसल्याचही पाटील म्हणाले. यासंदर्भात कोणतेही निवेदन अद्याप आपल्यापर्यंत आले नाही मात्र हा सर्व विषय माहित असल्याचेही त्यांनी मान्य केलं.  

कल्याणमध्ये गौरीपाडा परीसरात मी राहते. कल्याणपासूनच मला खूप ट्रॅफिक लागला. जवळपास अर्धा तास चालत मी स्टेशनपर्यंत पोहचले. वाहतूक कोंडी झाल्याने दोनदा आम्हाला बस मधून उतरावं लागलं.मयुरी बोटे ,कल्याण. 

मी कळव्याला राहतो. परीक्षेची वेळ पाच वाजताची होती. चार वाजता परीक्षा केंद्रावर पोहचणे अपेक्षित होते. मात्र कळवा नाक्यापासूनच ट्रॅफिक लागला. एरवी कळव्याहून ठाणे शहरात जायला 20 मिनिटं लागतात. मात्र शनिवारी 5 वाजून गेले तरी केंद्रावर पोहचणे शक्य झाले नाही. राकेश शिंदे,  कळवा.

टॅग्स :examपरीक्षाthaneठाणेrailwayरेल्वेMaharashtraमहाराष्ट्र