शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
5
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
6
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
7
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
8
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
9
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
10
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
11
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
12
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
13
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
14
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
15
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
16
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
17
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
18
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
19
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
20
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

राज्य सरकारच्या परवानगीकडे निर्मात्यांचे लागले लक्ष;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:41 AM

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारने महाराष्ट्रात शूटिंगवर बंदी आणल्याने सध्या अनेक वाहिन्यांवरील लोकप्रिय मालिकांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारने महाराष्ट्रात शूटिंगवर बंदी आणल्याने सध्या अनेक वाहिन्यांवरील लोकप्रिय मालिकांच्या निर्मात्यांनी गुजरात, हैदराबाद येथे मोर्चा वळवला आहे. ठाणे हे अनेक मालिकांच्या शूटिंगचे आवडते डेस्टिनेशन आहे. मुंबई, ठाण्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने राज्य सरकार केव्हा शूटिंगवरील बंदी उठवते आणि पुन्हा ठाण्यात शूटिंग सुरू करतो, याकडे निर्मात्यांचे लक्ष लागले आहे.

कोरोनाचा प्रकोप सुरू होताच सरकारने शूटिंगवर बंदी आणली. त्यामुळे निर्माते, वाहिन्यांची पंचाईत झाली. ‘मेरे साई, अहिल्या, गणेश, जिजाऊ’ या मालिकांनी गुजरातमधील उंबरगाव हे महाराष्ट्राच्या सीमेलगतचे गाव गाठून तेथे मालिकांचे शूटिंग सुरू केले. काही मालिकांचे शूटिंग वलसाड, दमण, सिल्वासा येथे सुरू आहे. ‘शुभमंगल ऑनलाईन’ व ‘सूर नवा-ध्यास नवा’ यांसारख्या मालिका व कार्यक्रमांचे शूटिंग गोव्यात सुरू होते. एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा यांच्या निमंत्रणावरून निर्मात्यांनी गोवा गाठले होते. मात्र गोव्यात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागल्याने गोव्यात शूटिंगवर बंदी आली. हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीतही काही मालिकांचे शूटिंग सुरू आहे.

सुप्रसिद्ध निर्माते नितीन वैद्य म्हणाले की, शेतकरी जसा पावसाची वाट पाहतो, तसे सर्व कलाकार, तंत्रज्ञ हे महाराष्ट्र सरकार केव्हा शूटिंगला परवानगी देते याची वाट पाहत आहेत. आम्ही सारेच कुटुंबापासून दूर वेगवेगळ्या राज्यांत सध्या शूटिंग करीत आहोत. काही कलाकार, कामगार, तंत्रज्ञ यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोना झाला. त्यांना इस्पितळात दाखल करावे लागले. काहींचे निधन झाले. यामुळे घरापासून दूर असलेल्यांच्या जिवाची घालमेल झाली. काहींनी शूटिंग सोडून परतण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाच्या काळजीमुळे सारेच चिंतेत आहेत. त्यामुळे सरकारने लवकर शूटिंगला परवानगी द्यावी.

गतवर्षी मे महिन्यात सरकारने शूटिंगला परवानगी दिली. तेव्हापासून दर आठवड्याला सेटवरील प्रत्येकाची कोरोना चाचणी केली जात आहे. सर्वांचा दोन लाखांचा कोविड विमा उतरवला होता. यंदा पाच लाखांचा विमा उतरवला आहे. जर एखाद्याचे निधन झाले, तर कुटुंबाला २५ लाख रुपये मिळतील, अशी व्यवस्था केली आहे. महाराष्ट्रात व विशेष करून मुंबई, ठाण्यात मालिकांची शूटिंग ही बंदिस्त ठिकाणी होतात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणाऱ्यांमुळे संसर्ग पसरू नये याकरिता काही कामगार, तंत्रज्ञ यांची निवासाची व्यवस्था केली जाते. जेथे शूटिंग सुरू असते, तेथे व कपडेपटाचे निर्जंतुकीकरण केले जाते. कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांचे मार्गदर्शन घेऊन कलाकार, कामगार यांनी कोविड प्रसार टाळण्याकरिता काय खबरदारी घ्यावी, याचे मार्गदर्शन केले असून त्याचे पालन केले जात आहे. एवढी काळजी घेतल्याने दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात शूटिंगला परवानगी मिळेल, असे वाटत होते. मात्र काही काळ रुग्णवाढ असल्याने शूटिंग बंद केले असले तरी, लवकरच परवानगी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

.........