शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, बस फेऱ्यांमध्ये कमालीची घट, शेकडो प्रवासी ताटकळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 13:11 IST

कल्याण, डोंबिवली डेपोमध्ये सोमवारी सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये एसटी बसच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून आली. त्यामुळे मंत्रालयामध्ये व मुंबईत अन्य ठिकाणी कामाला जाणारे चाकरमानी चार तास ताटकळले. 

ठळक मुद्देप्रवासी संख्या भरपूर असून सगळ्यांना राज्य शासनाने लोकल प्रवासाची मुभा दिलेली नाही. त्यामुळे समस्या वाढली आहे.

- अनिकेत घमंडी

डोंबिवली : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांना कोरानाची लागण झाली आहे. काही कर्मचारी भीतीने कामावर येत नसल्याने तर काही जेवणाची आबाळ होत असल्याने कल्याण, डोंबिवलीच्या रुटवर येण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे कल्याण, डोंबिवली डेपोमध्ये सोमवारी सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये एसटी बसच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून आली. त्यामुळे मंत्रालयामध्ये व मुंबईत अन्य ठिकाणी कामाला जाणारे चाकरमानी चार तास ताटकळले. 

सकाळी ८ वाजता रांगा लावून दुपारी १२ वाजेपर्यंत बस न मिळाल्याने त्यांच्यामध्ये नाराजी पसरलेली होती. एरव्ही डोंबिवलीमधून सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये १५० हून अधिक बस फे-या होत असत, परंतू सोमवारी १२ वाजेपर्यंत मत्रांलय, ठाणे, कल्याण आदी मार्गावर अवघ्या ५१ फे-या झाल्याची माहिती नियंत्रण कक्षामधून मिळाली. 

तेथील अधिका-यांनी सांगितले की, आम्ही देखील प्रवाशांना उत्तर देऊन हैराण झालो आहोत. बसच्या फे-या कमी झाल्या आहेत हे वास्तव आहे. अनेक सहकार्यांना कोरोनाची लागण झाली, तर काहींच्या जेवणा, राहण्याची आबाळ झाली. तर काहीजण भीतीपोटी कामावरच येत नसल्याने ही स्थिती झाली आहे. सकाळपासून कल्याण डेपोमध्ये सुद्धा अशीच अवस्था झाल्याचे सांगण्यात आले.

प्रवासी संख्या भरपूर असून सगळ्यांना राज्य शासनाने लोकल प्रवासाची मुभा दिलेली नाही. त्यामुळे समस्या वाढली आहे. त्यातच मंत्रालयामधील काही विभागांना लोकलने जाण्याची सुविधा आहे तर काहींना नाही, त्यामुळे अन्य विभागांचे कर्मचारी रांग लावून उभे आहेत. 

सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये १० वाजता मंत्रालय मार्गावर बस सुटली होती, त्यानंतर १२ वाजेपर्यंत बस नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. ६ वाजल्यापासू १२ वाजेपर्यंत मत्रांलय १६, मुंबईतील शासकीय रुग्णालये ३, ठाणे २०, कल्याण १२ अशा एकूण अवघ्या ५१ बस फे-या सोडण्यात आल्याने १२ नंतरही प्रवाशांच्या रांगा कमी झालेल्या नव्हत्या.

मंत्रालयामध्ये कामाला असून मला तेथे जाण्यासाठी सकाळपासून इंदिरा गांधी चौकामध्ये ९ वाजण्याच्या सुमारास उभा आहे. परंतू १२ वाजले तरीही मंत्रालय बसचा पत्ता नाही. कामावर जायचे कसे, कधी? हा मोठा प्रश्न आहे. आता दुपारच्या सत्रामध्ये बस कधी येणार हे बघावे लागेल - केतन वामन, प्रवासी,डोंबिवली.

आणखी बातम्या...

CoronaVirus News : धक्कादायक! मल्टीनॅशनल कंपनीत कोरोनाचा विस्फोट, २८८ कर्मचारी आढळले पॉझिटिव्ह

दूध आंदोलनाला राज्यात सुरुवात, दगडाला अभिषेक घालून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण    

रावणाने पहिले विमान उड्डाण केले, सिद्ध करण्याचा श्रीलंकेचा दावा    

सरकारी कर्मचार्‍यांसाठी खूशखबर! नाईट शिफ्ट केली तर आता असा होणार फायदा...    

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसstate transportएसटीdombivaliडोंबिवली