शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

एसटी संप : अवैध वाहतूकदारांकडून लूट; ५५० फेऱ्या रद्द, विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 23:35 IST

एसटी कर्मचा-यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे ठाणे जिल्ह्यात सामान्य जनतेसह विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. खासगी वाहतूकदारांनी अडलेल्या प्रवाशांची अक्षरश: लूट केली.

ठाणे : एसटी कर्मचा-यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे ठाणे जिल्ह्यात सामान्य जनतेसह विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. खासगी वाहतूकदारांनी अडलेल्या प्रवाशांची अक्षरश: लूट केली. जिल्ह्यातील एसटीच्या आठ आगारांतून रोज एसटीच्या एक हजार सहा फेºया होतात. मात्र, या संपात सुमारे ४८ टक्के वाहक व चालकांनी सक्रिय सहभाग घेतल्याने संध्याकाळपर्यंत ५५० फेºया रद्द कराव्या लागल्याचे एसटीचे ठाणे विभाग नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी लोकमतला सांगितलेपुढील सहा दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजामुळे वेळीच घर गाठण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रवाशांना संपाचा फटका बसला. त्यांच्या या गरजेचा गैरफायदा घेऊन अवैध वाहतूक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात फोफावली. नेहमीपेक्षा जास्त भाडे आकारून या अवैध वाहतूकदारांनी प्रवाशांची चांगलीच लूट केली. यादरम्यान जिल्ह्यात कोठेही अनुचित घटना घडली नाही.सकाळी या संपास न जुमानता काही वाहक, चालकांनी बस नेहमीप्रमाणे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपात सहभागी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यास विरोध केल्यामुळे भिवंडीसह अन्य ठिकाणी आपापसात बाचाबाची झाली. तरीदेखील एक हजार १४४ बसफेºयांपैकी संपात सहभागी नसलेल्या काही वाहक, चालकांनी एकत्र येऊन सुमारे ५९४ बसफेºया पूर्ण केल्या. सुमारे ५२ टक्के वाहक, चालकांनी संपात सहभाग घेतला नाही. तर, ४८ टक्के कर्मचाºयांच्या सक्रिय सहभागामुळे एसटीचे दिवसभराच्या कालावधीत अंदाजे ३० लाखांचे नुकसान झाल्याचे ऐकायला मिळत आहे.जिल्ह्यातील कल्याण, विठ्ठलवाडी, मुरबाड, वाडा या बस आगारांत काही प्रवासी वाहतूक सेवा दुपारी १२ वाजेपर्यंत सुरळीत होती. तर शहापूर, भिवंडी, ठाणे १, ठाणे २ आदी चार बस आगारांतील बस दिवसभरासाठी बंद होत्या. मात्र, काही कालावधीनंतर त्या आगारातही काही बसफेºया पूर्ववत करण्यात आल्या. जिल्हाभरातील आठ बस आगारांपैकी ठाणे १ येथे ११८ फेºया व ठाणे २ वरील १०४ प्रवासी फेºया रद्द कराव्या लागल्या.याशिवाय, भिवंडी आगारात सर्वाधिक १८२ बसफेºया रद्द केल्यामुळे केवळ ३४ फेºया दुपारनंतर पूर्ण केल्या. याखालोखाल शहापूरला ८९ फेºया, कल्याणला केवळ चार फेºया, विठ्ठलवाडीला ४३, मुरबाडला चार फेºया आणि वाडा येथील बस आगारातील सहा बसफेºया रद्द कराव्या लागल्या.शहापुरात आगर व्यवस्थापक पी.एम. शिंदे यांनी प्रवाशांची काळजी घेतली.भिवंडी आगारातील महाराष्ट्र कामगार संघटनेचा सदस्य जी.बी. इंगळे व व्ही.जी. आव्हाड यांच्यामध्ये बस आगाराबाहेर काढण्यावरून शिवीगाळ व बाचाबाची झाल्याने इंगळे यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात जाऊन आव्हाड यांच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी याबाबत नोंद घेऊन दोघांनाही समज दिली. या संपाचा फायदा घेऊन शहरातील काही रिक्षाचालकांनी ठाणे व कल्याण येथे जाण्यासाठी प्रवाशांची वाढीव भाडे मागून लूट केली. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ