शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

अटी मान्य असतील तरच बोला; लग्नाच्या बाजारात डॉक्टर, इंजिनीअरची क्रेझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 00:31 IST

ठाण्यातील तरुणींची पहिली पसंती : शेतकरी, छोटी नोकरी, व्यवसाय करणाऱ्या मुलांना मिळताे आहे नकार  

स्नेहा पावसकरठाणे : गेल्या काही वर्षांत लग्न जमणे हा जणू एक सोहळा आणि तो जमवणे म्हणजे एक व्यवसाय झाला आहे. लग्न जमवताना आधी विचारल्या जातात त्या अपेक्षा; पण आता या अपेक्षांना अटीचे स्वरूप आले आहे. पूर्वीच्या काळी घरातील वडीलधारी मंडळी ठरवतील तिथे मुलं-मुली लग्न करायची. कालांतराने मुलांच्या अटी विचारात घेऊ जाऊ लागल्या आणि आता तर मुलांपेक्षा मुलींच्याच अटी जास्त पाहायला मिळतात. ठाणे जिल्ह्यातील कित्येक मुलींच्या लग्नासाठीच्या अपेक्षा अव्वाच्या सव्वा वाढल्या आहेत. या मुलींना शेतकरी किंवा एखादी छोटी नोकरी किंवा व्यवसाय करणारा नवरा नको तर त्यांना हवाय डॉक्टर, इंजिनीअर किंवा एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीतला उच्चपदस्थ अधिकारी आणि चाळीत, झोपडपट्टीत राहणारा नाही, तर एखाद्या हायफाय सोसायटीत राहणारा.

लग्न करायचं म्हटलं की, बदलत्या काळानुसार बहुतांश कुटुंबात वधू-वर दोघांच्याही अपेक्षा जाणून घेतल्या जातात. पण, या अपेक्षा दिवसागणिक वाढत चालल्या आहेत. ग्लोबल होणाऱ्या ठाणे जिल्ह्याचा बराच भाग अद्यापही ग्रामीण बाजाचा आहे. येथील अनेक तरुण शिक्षणाअभावी पारंपरिक शेतीचा व्यवसाय करतात. बळीराजा लाखोंचा पोशिंदा आहे, मात्र लग्नाच्या मांडवात याची किंमत काडीमोल आहे. ठाणे जिल्ह्यात अनेक वधू-वर सूचक मंडळे आहेत. त्यात हजारो तरुण-तरुणींची नोंदणी आहे. मात्र, यातील बहुतांशी तरुणींच्या अपेक्षा पाहता त्यांना वर निवडताना तो उच्चशिक्षित, उच्चपदस्थ नोकरीचा आणि उच्चभ्रू वस्तीत राहणारा हवा आहे. 

सर्वाधिक मागणी...लग्न करताना हल्लीच्या मुलींच्या अपेक्षा मोठ्या आहेत. डॉक्टर, इंजिनीअर, मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीला असलेला, बँकेत उच्चपदस्थ अधिकारी असलेला मुलगा त्यांना वर म्हणून हवा आहे. शेतकरी मुलगा नवरा म्हणून स्वीकारणाऱ्या मुली खूपच कमी आहेत. किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, त्याच मुली शेतकरी मुलाची निवड करतात.

अटी मान्य असतील तरच बोलामुलींच्या इतरही अनेक अटी दिसतात. मुलींना मुंबई, ठाणे, पुण्यात राहणारा नवरा हवाय. तसेच एकत्र कुटुंबात न राहता लग्नानंतर स्वतंत्र राहण्याची त्यांची मागणी असते. एकत्र कुटुंब असले तरी ते छोटे असावे, स्वतंत्र बेडरूम असावा. शेती असली तरी शेतात काम करावे लागणार नसेल तर विचार करू, असे वधूपक्षाच्या कुटुंबीयांचे म्हणणे असते.

आमची मुलगी चांगली शिक्षित असली तर तिच्या भविष्याचा विचार आम्ही करणारच ना? एवढं शिकून तिला शेतात काम करावे लागले तर काय उपयोग? तिचा संसार तिच्या मनासारखा व्हावा हीच आमची इच्छा असते. - दिनेश धारीवाल, वधूपिता

शेतकरी हा माणूस नाही का? एखाद्या उच्चशिक्षितापेक्षाही शेतकरी अधिक मेहनत करतो. आता निसर्ग साथ देत नाही आणि मालाला योग्य भाव मिळत नाही, म्हणून शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारत नाही. पण, शेतकऱ्याला लग्नाच्या मांडवात नाकारणे चुकीचे आहे.    - बळीराम पानरे, वरपिता

एखादा मुलगा शेतकरी असेल तर त्याबाबत मुली फारशा चौकशीही करीत नाहीत. त्यातही जर एखाद्याची घरची भरपूर जमीन, शेती असेल आणि तिथे शेतात काम करावे लागणार नसेल तरच त्या स्थळाचा विचार करतात. अन्यथा त्यांना चांगला नोकरदार मुलगाच नवरा म्हणून हवाय, अशी माहिती एका वधू-वर सूचक मंडळाच्या प्रमुखांनी दिली.

टॅग्स :marriageलग्नdoctorडॉक्टर