शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात आंबा, चिक्कूच्या फळबागांसह सोनचाफा, मोगर १3१४ हेक्टरवर; राज्यभरासाठी अभिमानास्पद

By सुरेश लोखंडे | Updated: October 19, 2023 14:39 IST

जिल्ह्यात आंबा, चिक्कूच्या फळबागांसह सोनचाफा, मोगर १3१४ हेक्टरवर; राज्यभरासाठी अभिमानास्पद!

सुरेश लोखंडे

ठाणे : यंदा खरीपाच्या लागवडीसह आंबा, चिक्कू, सीताफळ, काजू, केळी, नारळीच्या बांगासह सोनचाफा, मोगरा, चंदन फुलशेतीची लागवड तब्बल एक हजार 3१४ हेक्टरवर करण्यासाठी शेतक-यांना कृषी खात्याने तत्पर केले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील या फळबाग लागवडी राज्यात अव्वल आहे. त्यामुळे राज्याच्या कृषी आयुक्तालय, फलोत्पादनचे संचालक डॉ. के.पी. मोते यांनी ठाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधीकार दिपक कुटे यांचे विशेष अभिनंदन करून हे काम अभिमानास्पद व कौतुकास्पद असल्याचे सुतोवच अभिनंदनपर पत्राव्दारे केले आहे.या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रम यंदाही राज्यात हाती घेण्यात आला आहे. या २०२3-२४ च्या कार्यक्रमाचा राज्यस्तरीय आढावा अलिकडेच संचालकांनी घेतला. त्यात ठाणे जिल्ह्याने एक हजार ५०० हेक्टरच्या लक्षांकापैकी आतापर्यंत एक हजार 3१४ हेक्टरवर फळबाग लागवडीसह फूलशेतीची काम पूर्ण केल्याचे उघड झाले. या ह्यअतिशय उल्लेखनीयह्ण कामाची दखल घेत राज्याच्या संचालकांनी विशेष अभिनंदन करून ठाणे जिल्ह्यातील हे काम अभिमानास्पद व कौतुकास्पद असल्याच्या गौरवोद्गाराव्दारे जिल्ह्याच्या कृषी अधीक्षकांच्या कामाची दाखल घेतली आहे.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शेतक-यांना फळबागांसह चाफा, मोगरा आदी फुलशेतीकडे वळण्याचे आवाहन केले होते. त्यास अनुसरून कृषी विभागाने झापाटल्यागत काम करून लक्षांकाच्या तुलनेत ८६.६६ टक्के काम पूर्ण केल्याचे उघड झाले आहे. ४५ ते ५० हेक्टरवर चाफा, मोगरा, चंदना फुलशेती यंदा जिल्ह्यात केली जात आहे. यामध्ये मोगरा १3.९५ हेक्टर, सोनचाफा २८.3२ हेक्टर,चंदनाची शेती दीड हेक्टरवर जिल्ह्यात हाती घेती आहे.या फळबाग, फुलशेतीकडे वळलेल्या दोन हजार ५१२ शेतक-यांपैकी एक हजार ९५४ शेतक-यांनी त्यांच्या एक हजार 3१४ हेक्टर शेतीवर फळबाग व फूलशेतीची लागवड पूर्ण केली आहे. यामध्ये सवार्धिक आंब्याच्या बागा एक हजार १६3 हेक्टरवर आहेत. तर नारळी पोफळीच्या बागा २६ हेक्टरवर आहेत. याशिवाय चिक्क्ू चार हेक्टर, काजू 3.९५ हेक्टर, फणस नऊ हेक्टर,शेवगा १९.५० हेक्टर, जांभूळ १६.८५ हेक्टर, केळी १.७० हेक्टर, सीताफळ १२ हेक्टर आदीं शेत जमिनीवर फळबागांची ही लागवड पूर्ण झाली आहे.तालुकानिहाय आंब्याच्या सवार्धिक बागा खालीलप्रमाणे

शहापूर तालुक्यात सर्वाधिक ४१४ हेक्टरवर आंबा लागवड झाली. मुरबाड तालुक्यात 3११हेक्टर, भिवडी २४६ हेक्टर, उल्हासनगर ९० हेक्टर आणि कल्याण येथे १०० हेक्टरवर आंब्याच्या बागा आहेत.