शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
3
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
4
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
5
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
6
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
7
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
8
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
9
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
10
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
11
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
12
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
13
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
14
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
15
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
16
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
17
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
18
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
19
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
20
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा

घनकचरा विभाग भ्रष्टाचाराचे कुरण, राष्ट्रवादीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 4:42 PM

घनकचरा विभागामार्फतच ठाण्याची शिवसेना पोसली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. घनकचरा विभाग हे भ्रष्टाचाराचे कुरण असल्याचेही विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले आहे.

ठळक मुद्देअ‍ॅण्टी करप्शन मार्फत चौकशीची मागणीउच्च न्यायालयातही धाव घेणार

ठाणे - घनकचरा विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु असल्याची बाब लक्षवेधीच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आणायची होती. परंतु त्यावर चर्चा करु दिली नसल्याचा आरोप करीत विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी घनकचरा विभाग हा भ्रष्टाचाराचे कुरण असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे यामध्ये सुरु असलेल्या कारभाराची अ‍ॅण्टी करप्शन मार्फत चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच ठाणेकरांचा पैसा लाटणाऱ्या सत्ताधारी आणि प्रशासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका सुध्दा दाखल करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत पाटील आणि राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली.                  ठाणे महापालिकेकडून २००२ मध्ये ७५० मेट्रीक टन कचरा उचलला जात होता. २०१८ मध्येही तेवढाच कचरा उचलला जात आहे. परंतु २००२ मध्ये यासाठी भांडवली आणि महसुली खर्च हा ४२ कोटींच्या घरात होता, जो आज ६०० कोटींच्या घरात गेला आहे. कचरा वाढलाच नाही तर खर्च वाढला कसा असा आक्षेपही त्यांनी घेतला आहे. २०१३ मध्ये पालिकेने उच्च न्यायालयात माहिती देतांना २०१९ पर्यंत आम्ही कचºयाची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावू अशी हमी दिली होती. परंतु एवढ्या वर्षात पालिकेला डायघरचे डम्पींग ग्राऊंड सुरु करता आले नाही, पाच ठिकाणी बायोमिथेनायझेशन प्लान्ट सुरु करण्यात येणार होते, परंतु त्या जागा सुध्दा पालिकेला अद्यापही ताब्यात घेता आलेल्या नाहीत. ओला कचरा, सुका कचरा वेगळा करण्याचे आवाहन सोसायटीवाल्यांना केले जात आहे. परंतु हा कचरा वेगळा जरी जमा होत असला तरी तो घंटागाडीमध्ये एकत्रच जमा केला जात आहे, तोच कचरा पुढे सीपी तलावाला एकत्र टाकला जात असून पुढे तो दिव्याला पाठविला जात आहे.                  दरम्यान असे असतांनाही पालिकेच्या माध्यमातून आता सोसायटीधारकांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. त्यातही उपविधीचा ठराव मंजुर झाल्यानंतर वाढीव दर असल्याने त्याचा विरोध झाला होता. त्यानंतर एक वर्षापर्यंत त्याला स्थगिती देण्यात आली होती. परंतु आता वर्ष संपत आले असतांना पुन्हा अशा प्रकारे नोटीसा बजावण्याचे काम पालिकेने सुरु केले आहे. परंतु हे करीत असतांना आधी पालिकेने सुविधा द्याव्यात मगच वसुली करावी अशी मागणीसुध्दा त्यांनी केली आहे. महापौर मीनाक्षी शिंदे यांनी मात्र सोमवारी झालेल्या महासभेत अद्याप दर निश्चित करण्यात आले नसून पालकमंत्र्यांच्या बैठकीत यावर चर्चा होऊन दर निश्चित झाल्यावर तसा प्रस्ताव पुन्हा महासभेच्या पटलावर ठेवला जाईल असे स्पष्ट केले आहे. महापौरांनी असे भाष्य केले असले तरीसुध्दा कचऱ्याची शास्त्रोक्तपध्दतीने विल्हेवाट न लावता, अशा पध्दतीने वसुली करणे अयोग्य असल्याचा दावाही पाटील यांनी केला आहे. 

कामगार कमी पगार मात्र जास्त कामगारांचेघंटागाडीवरील कामगारांनी माहिती अधिकारात मिळविलेल्या माहितीच्या अधिकारात जे कामगार कामावर नाहीत, त्यांचे पगार सुध्दा काढले जात असल्याची बाब समोर आली आहे. तसेच ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे, त्याला इतर ठिकाणी काळ्या यादीत टाकले आहे. असे असतांनासुध्दा त्याला पालिकेने ठेका दिला आहे. घंटागाडीच्या फेºयांमध्येच दिवसाला पाच ते सात लाखांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही यावेळी पाटील यांनी केला. 

बुरपुल्ले आणि हळदेकर टेक्नीकल पर्सन नाहीघनकचरा विभागात काम करणारे अधिकारी हे टेक्नीकल पर्सन असणे अपेक्षित आहे. परंतु अशोक बुरपुल्ले आणि बालाजी हळदेकर नॉन टेक्नीकल पर्सन असूनही ते या विभागात काम करीत आहेत. हळदेकर तर डॉक्टर असून त्यांच्यावर वारंवार कारवाईची मागणी करुनही अद्याप प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली झालेल्या नाहीत. 

कचरा हे शिवसेनेसाठी भ्रष्टाचाराचे कुरण - परांजपेघनकचरा व्यवस्थापनामधून पैसा कमावणे हेच शिवसेनेचे धोरण आहे. त्यामुळे ही संघटना कचऱ्यावरच पोसली जात असून त्यांच्यासाठी कचरा हे कुरण असल्याचा आरोप आनंद परांजपे यांनी केला. आजवर टक्केवारीवरच शिवसेनेचे पालपोषण झालेले आहे. त्यामुळे आता ठाणेकरांच्या माथी कचरा कर मारु न त्यातून स्वत:चा फायदा करु न घेण्याचा प्रयत्न केलाा जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस