शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

पक्षप्रमुखांच्या ‘त्या’ वक्तव्यांमुळे शिवसेनेत संभ्रम! अजित पवारांनी केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 4:22 AM

एकीकडे सत्तेत राहायचे, मंत्रीपदे कायम ठेवायची, पण दुसरीकडे मात्र पहारेकरी चोर आहे, जागावाटप गेले खड्ड्यांत, कुंभकर्णाला जागे करायला चाललोय, म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोंब मारायची, अशा दोन परस्पर भूमिकांमुळे शिवसेनेत संभ्रम असल्याचे दिसते,

डोंबिवली : एकीकडे सत्तेत राहायचे, मंत्रीपदे कायम ठेवायची, पण दुसरीकडे मात्र पहारेकरी चोर आहे, जागावाटप गेले खड्ड्यांत, कुंभकर्णाला जागे करायला चाललोय, म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोंब मारायची, अशा दोन परस्पर भूमिकांमुळे शिवसेनेत संभ्रम असल्याचे दिसते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केली.एका खाजगी कार्यक्रमानिमित्त पवार डोंबिवलीत आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘साडेचार वर्षे शिवसेना आणि भाजपाचे केंद्रात आणि राज्यात सरकार आहे. असे असतानाही शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडून एखाद्या विरोधी पक्षाप्रमाणे वक्तव्ये केली जात आहेत. हे हास्यास्पद आहे. सध्याच्या आणीबाणीपेक्षाही भयंकर अवस्थेला भाजपासह शिवसेनाही तितकीच कारणीभूत आहे. नोटाबंदीमुळे कोणाचे भले झाले, हे त्यांना सांगता आलेले नाही. दहशतवादी, देशद्रोही आणि नक्षलवादी कारवायांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी लॅपटॉप आणि मोबाइलवर ‘वॉच’ ठेवून लोकांच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याचे धंदे सरकारने चालू केले आहेत.’‘अठरापगड जातींच्या आणि विविध धर्मांच्या या देशात हनुमान कोणत्या जातीचा, याला जास्त महत्त्व दिले जात आहे. यांना गोत्र काढण्याचा अधिकार कोणी दिला? प्रभू रामचंद्र, राम मंदिराचा मुद्दा आळवला जाऊ लागला की, समजायचे निवडणुका जवळ आल्या आहेत. साडेचार वर्षांत राम मंदिराचा मुद्दा का आठवला नाही’, अशा शब्दांत पवार यांनी युतीचा समाचार घेतला.मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. आम्ही समविचारी पक्षांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतोय. सध्याची परिस्थिती पाहता लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित लागतील, अशीही शंका उपस्थित होत आहे. आम्ही निवडणुकीत केवळ मते मागत नाही, तर समस्या सोडवण्याचाही प्रयत्न करतो. पण, सध्याचे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे, अशी टीका त्यांनी केली. जेथे आमची सत्ता होती, तेथील महापालिका क्षेत्रांचा विकास आम्ही केला. परंतु, २२ वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या युतीने कल्याण-डोंबिवलीत ठोस अशी विकासकामे झालेली नाहीत, असेही पवार म्हणाले. दरम्यान, यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी पालकमंत्री गणेश नाईक, माजी खा. आनंद परांजपे, आ. जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे उपस्थित होते. तर कार्यक्रमाप्रसंगी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, प्रदेश महासचिव सुभाष पिसाळ आदी उपस्थित होते.१० जानेवारीपासून निर्धार परिवर्तनयात्राआम्ही १० जानेवारीपासून महाराष्ट्रामध्ये ‘निर्धार परिवर्तनाचा’ यात्रा सुरू करत आहोत. कोकणातून या यात्रेला सुरुवात होईल. महाडला चवदार तळ्याच्या ठिकाणी पहिली सभा होईल.या सरकारच्या अपयशाचे पाढे या यात्रेच्या निमित्ताने वाचणार आहोत. हे सरकार शहरी आणि ग्रामीण भागाला, कामगारांना, शेतकºयांना न्याय देऊ शकलेले नाही. समाजातील एकही घटक समाधानी नाही. त्यामुळे देशात ८ व ९ जानेवारीला कामगारसंघटनांनी बंद पुकारला आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.लोकलमधून प्रवासडोंबिवलीत खाजगी कार्यक्रमास येताना वाहतूककोंडी टाळण्यासाठी आणि रेल्वे प्रवाशांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी पवार आणि पाटील यांनी दुपारी ३.३० च्या कसारा लोकलमधून प्रवास केला. दुपारी ४.४० वाजता ते डोंबिवली स्थानकात पोहोचले. प्रवासात प्रवाशांनी अनेक तक्रारी आणि समस्या मांडल्याचे पवार म्हणाले.नरेंद्र पाटलांना सुनावले खडेबोलमुख्यमंत्र्यांच्या पुढे झुकून दबून राहण्याची गरज नाही. माथाडींचा नेता हा स्वयंभू असला पाहिजे. तुम्ही जर वाकायला, झुकायला आणि टेकवायला लागतात, तर माथाडींना आणि मला पण ते आवडणार नाही, असे खडेबोल अजित पवार यांनी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना सुनावले.काही महिन्यांपूर्वी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या आग्रहानुसार भाजपाच्या कोट्यातील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत एका खाजगी कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेल्या माथाडी कामगारांसमोरच पाटील यांना पवारांनी खडेबोल सुनावले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार