शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पक्षप्रमुखांच्या ‘त्या’ वक्तव्यांमुळे शिवसेनेत संभ्रम! अजित पवारांनी केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 04:22 IST

एकीकडे सत्तेत राहायचे, मंत्रीपदे कायम ठेवायची, पण दुसरीकडे मात्र पहारेकरी चोर आहे, जागावाटप गेले खड्ड्यांत, कुंभकर्णाला जागे करायला चाललोय, म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोंब मारायची, अशा दोन परस्पर भूमिकांमुळे शिवसेनेत संभ्रम असल्याचे दिसते,

डोंबिवली : एकीकडे सत्तेत राहायचे, मंत्रीपदे कायम ठेवायची, पण दुसरीकडे मात्र पहारेकरी चोर आहे, जागावाटप गेले खड्ड्यांत, कुंभकर्णाला जागे करायला चाललोय, म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोंब मारायची, अशा दोन परस्पर भूमिकांमुळे शिवसेनेत संभ्रम असल्याचे दिसते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केली.एका खाजगी कार्यक्रमानिमित्त पवार डोंबिवलीत आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘साडेचार वर्षे शिवसेना आणि भाजपाचे केंद्रात आणि राज्यात सरकार आहे. असे असतानाही शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडून एखाद्या विरोधी पक्षाप्रमाणे वक्तव्ये केली जात आहेत. हे हास्यास्पद आहे. सध्याच्या आणीबाणीपेक्षाही भयंकर अवस्थेला भाजपासह शिवसेनाही तितकीच कारणीभूत आहे. नोटाबंदीमुळे कोणाचे भले झाले, हे त्यांना सांगता आलेले नाही. दहशतवादी, देशद्रोही आणि नक्षलवादी कारवायांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी लॅपटॉप आणि मोबाइलवर ‘वॉच’ ठेवून लोकांच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याचे धंदे सरकारने चालू केले आहेत.’‘अठरापगड जातींच्या आणि विविध धर्मांच्या या देशात हनुमान कोणत्या जातीचा, याला जास्त महत्त्व दिले जात आहे. यांना गोत्र काढण्याचा अधिकार कोणी दिला? प्रभू रामचंद्र, राम मंदिराचा मुद्दा आळवला जाऊ लागला की, समजायचे निवडणुका जवळ आल्या आहेत. साडेचार वर्षांत राम मंदिराचा मुद्दा का आठवला नाही’, अशा शब्दांत पवार यांनी युतीचा समाचार घेतला.मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. आम्ही समविचारी पक्षांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतोय. सध्याची परिस्थिती पाहता लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित लागतील, अशीही शंका उपस्थित होत आहे. आम्ही निवडणुकीत केवळ मते मागत नाही, तर समस्या सोडवण्याचाही प्रयत्न करतो. पण, सध्याचे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे, अशी टीका त्यांनी केली. जेथे आमची सत्ता होती, तेथील महापालिका क्षेत्रांचा विकास आम्ही केला. परंतु, २२ वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या युतीने कल्याण-डोंबिवलीत ठोस अशी विकासकामे झालेली नाहीत, असेही पवार म्हणाले. दरम्यान, यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी पालकमंत्री गणेश नाईक, माजी खा. आनंद परांजपे, आ. जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे उपस्थित होते. तर कार्यक्रमाप्रसंगी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, प्रदेश महासचिव सुभाष पिसाळ आदी उपस्थित होते.१० जानेवारीपासून निर्धार परिवर्तनयात्राआम्ही १० जानेवारीपासून महाराष्ट्रामध्ये ‘निर्धार परिवर्तनाचा’ यात्रा सुरू करत आहोत. कोकणातून या यात्रेला सुरुवात होईल. महाडला चवदार तळ्याच्या ठिकाणी पहिली सभा होईल.या सरकारच्या अपयशाचे पाढे या यात्रेच्या निमित्ताने वाचणार आहोत. हे सरकार शहरी आणि ग्रामीण भागाला, कामगारांना, शेतकºयांना न्याय देऊ शकलेले नाही. समाजातील एकही घटक समाधानी नाही. त्यामुळे देशात ८ व ९ जानेवारीला कामगारसंघटनांनी बंद पुकारला आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.लोकलमधून प्रवासडोंबिवलीत खाजगी कार्यक्रमास येताना वाहतूककोंडी टाळण्यासाठी आणि रेल्वे प्रवाशांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी पवार आणि पाटील यांनी दुपारी ३.३० च्या कसारा लोकलमधून प्रवास केला. दुपारी ४.४० वाजता ते डोंबिवली स्थानकात पोहोचले. प्रवासात प्रवाशांनी अनेक तक्रारी आणि समस्या मांडल्याचे पवार म्हणाले.नरेंद्र पाटलांना सुनावले खडेबोलमुख्यमंत्र्यांच्या पुढे झुकून दबून राहण्याची गरज नाही. माथाडींचा नेता हा स्वयंभू असला पाहिजे. तुम्ही जर वाकायला, झुकायला आणि टेकवायला लागतात, तर माथाडींना आणि मला पण ते आवडणार नाही, असे खडेबोल अजित पवार यांनी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना सुनावले.काही महिन्यांपूर्वी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या आग्रहानुसार भाजपाच्या कोट्यातील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत एका खाजगी कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेल्या माथाडी कामगारांसमोरच पाटील यांना पवारांनी खडेबोल सुनावले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार