शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
8
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
9
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
10
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
11
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
12
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
13
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
14
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
15
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
16
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
18
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
19
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
20
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना उपजिल्हाप्रमुखाचे बेमुदत धरणे आंदोलन, नगरसेवक, नगरसेविकांसह पदाधिकाऱ्यांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 16:27 IST

भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेत एकाच पदावर वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्या अधिकाऱ्यांची त्वरित इतरत्र बदली करण्याच्या मागणीसाठी ठाणे उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर यांनी शुक्रवारपासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली.

भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेत एकाच पदावर वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्या अधिकाऱ्यांची त्वरित इतरत्र बदली करण्याच्या मागणीसाठी ठाणे उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर यांनी शुक्रवारपासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनात सेनेचे नगरसेवक, नगरसेविकांसह पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.आंदोलनाची सुरुवात पालिका मुख्यालयातील शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. काही मल्लांनी मारुतीच्या मुखवट्यात आंदोलनाला सबळ आशीर्वाद दिल्यानंतर मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी विरकर यांनी आंदोलनाच्या आदल्या दिवशी उपायुक्त (मुख्यालय) विजयकुमार म्हसाळ यांनी आपल्याला चर्चेला आमंत्रित केल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी आपल्या मागणीवर कार्यवाही करून प्राप्त अहवालानुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिले. परंतु जोपर्यंत ठोस कार्यवाही केली जाणार नाही, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे विरकर यांनी सांगितले.तत्पूर्वी आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी देखील विरकर यांच्या पत्राची दखल घेत त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश आस्थापना विभागाला दिल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाच्या या कागदी घोडे नाचविण्याच्या आश्वासनावर आपला विश्वास नसून त्याची कल्पना पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. राजन विचारे व आ. प्रताप सरनाईक यांना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनाला पालकमंत्र्यांसह आमदारांनी जाहीर पाठिंबा दर्शविल्याने आंदोलनाला धार आल्याची प्रतिक्रिया शिवसेनेत उमटू लागली आहे.पालिकेतील टक्केवारी वाढू लागली असून त्यात शहराचा विकास भकास होऊ लागला आहे. यापूर्वी याकडे आपण दुर्लक्ष केले होते. परंतु विकासाचे नियम धाब्यावर बसवून शहराचा विकास निकृष्ट दर्जाचा होऊ लागल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. याला एकाच पदावर गेली १५ ते २० वर्षांपासून ठाण मांडणारे अधिकारीच जबाबदार असल्याचे समोर आल्याने त्यांची बदली इतर विभागात होणे आवश्यक बनले आहे. सरकारी सेवा अटी व शर्ती नियमानुसार एका पदावर ३ वर्षे सेवा देणे अनिवार्य असतानाही त्याला प्रशासनाकडून बगल देण्यात येत असल्याचा आरोप विरकर यांनी केला. त्या अधिका-यांमुळे सक्षम अधिका-यांवर अन्याय होत असून प्रशासनाकडून मात्र त्यांची वाटेल तशी बदली केली जात आहे. त्यासाठी सेवाकाल विचारात घेतला जात नाही. असे अधिकारी निमुटपणे बदली झालेल्या ठिकाणी काम करून सेवा बजावतात.परंतु टक्केवारीत गुंतलेले व सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधलेले अधिकारी झालेली बदली रद्द करण्यासाठी राजकीय वजनाचा वापर करत असल्याचा दावा त्यांनी केला. अशा प्रकारे गेल्या अनेक वर्षांपासुन एकाच पदावर मलाईदार कारभार करणाऱ्यांची त्वरित इतरत्र बदली करून आयुक्तांनी त्यांना धडा शिकवावा, या मागणीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसल्याचे विरकर यांनी सांगितले. आंदोलनात शहरप्रमुख धनेश पाटील, प्रशांत पालंडे, नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर, जयंतीलाल पाटील, अनंत शिर्के, नगरसेविका अनिता पाटील, तारा घरत, पदाधिकारी तनुजा विरकर, पप्पू भिसे, प्रवीण उतेकर आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरShiv Senaशिवसेना