शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

कोपरी-पाचपाखाडीत शिंदेंचा एकछत्री अंमल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 23:32 IST

ठाणे लोकसभा मतदारसंघात असलेल्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे यांना तब्बल एक लाख ३० हजारांचे मताधिक्य मिळाले आहे,

- अजित मांडकेठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात असलेल्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे यांना तब्बल एक लाख ३० हजारांचे मताधिक्य मिळाले आहे, तर राष्टÑवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना अवघी ४० हजार ९६७ मते मिळाली आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेच्या मतांमध्ये यंदा २० हजार ६६१ मतांची निर्णायक वाढ झाली आहे. गेल्या वेळेस एक लाख नऊ हजार ३३९ मते मिळाली होती.ठाण्याप्रमाणेच कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो. तो विधानसभेतही अभेद्य राहणार असल्याचेच स्पष्ट झाले आहे.कोपरी-पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघात युतीच्या नगरसेवकांची संख्या ३६ असून राष्टÑवादीचा येथे भोपळा आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या कालावधीत राष्टÑवादीच्या विद्यमान नगरसेवकांनी शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस आणि राष्टÑवादीला येथे मोठे आव्हान उभे केले आहे. तर, या मतदारसंघात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकछत्री अंमल असल्याने विचारेंना त्याचा फायदा झाल्याचे या निवडणुकीत दिसून आले. मागील निवडणुकीत विचारे यांना मोदीलाटेमुळे पाच लाख ९५ हजार ३६४ मते मिळाली होती, तर राष्टÑवादीचे संजीव नाईक यांना तीन लाख १४ हजार ६५ मते मिळाली होती. यामध्ये कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात तर नाईक यांना ४० हजार ९३३ मते मिळाली होती. या निवडणुकीत आनंद परांजपे यांना या मतदारसंघात अवघ्या ३० मतांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर, तिकडे शिवसेनेचे विचारे यांच्या मताधिक्यामध्ये तब्बल २० हजार मतांची भर या निवडणुकीत पडल्याचे दिसले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मल्लिकार्जुन पुजारी यांना या मतदारसंघातून सहा हजार ८२२ मते मिळाली आहेत; परंतु त्याचा फार काहीच परिणाम शिवसेनेच्या मतांवर झालेला नाही.मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना झाला होता; परंतु आता युती झाली असल्याने त्याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेलाच होईल, असे दिसत आहे. त्यात, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे हे या मतदारसंघात येत असले, तरी त्यांची ताकद मात्र नाही. या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्टÑवादीचे अस्तित्व मतांमध्ये दिसत असले, तरी नगरसेवकांची संख्या मात्र शून्य आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार शोधण्यापासून काँग्रेसला सुरुवात करावी लागणार आहे.>या विधानसभा मतदारसंघात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकछत्री अंमल आहे. त्यांचा शब्द हा कार्यकर्त्यांसाठी काळ्या दगडावरची रेघ मानली जातो. त्यामुळे मतदारांनी विचारे यांनाच साथ दिली.>या पट्ट्यात सिंधी मतदारसुद्धा निर्णायक भूमिकेत आहे. त्यातच, काही सिंधी नगरसेवकांनी आधीच शिवसेना आणि भाजपची कास धरली आहे.एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच या पट्ट्यात विधानपरिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांचीसुद्धा तितकीच ताकदआहे. तीही या निवडणुकीत कामाला आल्याचे दिसून आले.>विधानसभेवर काय परिणामलोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मतांमध्ये तब्बल २० हजार मतांची वाढ झाल्याने त्याचा फायदा हा शिवसेनेलाच होणार आहे. मात्र, दुसरीकडे राष्टÑवादीच्या मतांमध्ये अवघ्या ३० मतांची वाढ झाली आहे. त्यात, आता विधानसभा निवडणुकासुद्धाशिवसेना आणि भाजप हे युतीत लढणारअसल्याने साहजिकच एकनाथ शिंदे यांच्या मताधिक्यात वाढ होणार असून हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहील, असे चित्र आहे.

टॅग्स :thane-pcठाणेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Eknath Shindeएकनाथ शिंदे