शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

शहाडचा धोकादायक पादचारी पूल अखेर पाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:53 AM

मध्य रेल्वेचा चार तासांचा मेगाब्लॉक : कल्याण ते टिटवाळा प्रवासात रिक्षाचालकांनी केली प्रवाशांची लूट

कल्याण : कल्याण-कसारा मार्गावरील शहाड स्टेशनवरील अतिधोकादायक झालेला पादचारी पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेने रविवारी सकाळी ११.१५ ते दुपारी ३.१५ च्या दरम्यान चार तासांचा मेगाब्लॉक घेतला. तसेच टिटवाळ्याजवळील नव्या पादचारी पुलासाठी गर्डर टाकण्याचे काम करण्यात आले. एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर रेल्वेकडून मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गांवरील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट केले होते. त्यात अनेक पादचारी पूल धोकादायक असल्याचे समोर आले होते. त्यामुळे ते पाडून नवे पादचारी पूल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टिटवाळा स्थानकात नवा पूल उभारण्यात यावा, अशी रेल्वे प्रवासी आणि पादचाऱ्यांची मागणी होती. गर्डर टाकण्याचे काम रविवारी पार पडले आहे. आता पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, या पुलाच्या कामासाठी घेण्यात आलेल्या चार तासांच्या मेगाब्लॉकचा रिक्षाचालकांनी भरपूर फायदा घेतला. केडीएमटीने प्रवाशांसाठी जादा बसची व्यवस्था केली होती. मेगाब्लॉकदरम्यान बसला प्रवाशांनी एकच गर्दी केली होती. तर, टिटवाळा ते कल्याण या प्रवासासाठी रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून प्रतिप्रवासी १०० रुपये भाडे उकळले. भरउन्हात हा ब्लॉक घेण्यात आल्याने कल्याण ते टिटवाळादरम्यान बस, रिक्षाने इच्छितस्थळी जाताना प्रवाशांची बरीच दमछाक झाली.लोकग्राम पादचारी पूल झाला बंद दररोज सुमारे सव्वा लाख रेल्वे प्रवासी ज्या पुलावरून येजा करत होते, तो लोकग्रामचा पादचारी पूल शनिवारी मध्यरात्रीपासून रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. मुंबईतील धोकादायक पूल कोसळल्याच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने केलेल्या तांत्रिक सुरक्षा परीक्षणात हा पूल धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा पूल बंद केला आहे.कल्याण रेल्वेस्थानकातील सात क्रमांकाच्या फलाटावरून पूर्वेला जाण्यासाठी १९९० मध्ये बांधण्यात आलेल्या या पुलाचा वापर रेल्वे प्रवासी करत होते. प्रवासी लोकग्राम येथून रिक्षा पकडून जात असत. त्यातच, कल्याण पत्रीपूल पाडल्याने तेथे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी याच पुलाचा जास्त प्रमाणात वापर होत होता. लोकग्रामचा पादचारी पूल बंद झाल्याने प्रवाशांना कर्जतच्या दिशेकडील स्कायवॉकवरून सिद्धार्थनगर येथे जाऊन मग लोकग्रामच्या दिशेने जाता येणार आहे किंवा पश्चिमेतून रिक्षाने पत्रीपूलमार्गे लोकग्रामला जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढच होणार आहे.या गाड्या होत्या रद्द : कसारा ते कल्याणदरम्यान घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे गोदावरी एक्स्प्रेस आणि राज्यराणी एक्स्प्रेस या रद्द करण्यात आल्या. तर, पुणे एक्स्प्रेस व्हाया दौंड, मनमाडमार्गे चालवण्यात आली. त्याबरोबर कसाºयाकडे जाणाºया नऊ उपनगरी गाड्या आणि टिटवाळ्याकडे जाणारी एक गाडी रद्द करण्यात आली होती.