शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

ठाणे महानगरपालिका सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणाचे दिवा भाजपाने घातले श्राद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 17:26 IST

दिवा शहरातील समस्यांबाबत सत्ताधारी शिवसेना उदासीन असल्याचा आरोप करत रस्त्यांच्या कामात होणाऱ्या दिरंगाईमुळे नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता दिवा भाजपने श्राद्ध घालून निषेध केला.

ठाणे: दिवा शहरातील समस्यांबाबत सत्ताधारी शिवसेना उदासीन असल्याचा आरोप करत रस्त्यांच्या कामात होणाऱ्या दिरंगाईमुळे नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता दिवा भाजपने श्राद्ध घालून निषेध केला.यावेळी भाजपचे दिवा सरचिटणीस रोहिदास मुंडे,अंकुश मढवी,नरेश कदम यांनी मुंडन करून मुंब्रा देवी कॉलनी रोडच्या कामात अनियमितता असल्याचा आरोप केला.

मुंब्रा देवी कॉलनी रोडसाठी सुमारे 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.या रस्त्याचे काम नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्यात आले आहे.तीन महिने उलटले तरी 10 टक्के काम ही झालेले नाही.मागील पाच वर्षे हा रस्ता अक्षरशः गटार झालेले आहे.असे असताना सदर रस्ता तातडीने होणे गरजेचे आहे.निधी मंजूर आहे,वर्क ऑर्डर मिळाली आहे तरी कामात वेळ काढला जात असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.जे गटारांची कामे सुरू आहेत त्यात फाउंडेशन टाकले जात नाही.परिणामी पावसाळ्या त गटारे भरण्याचा धोका आहे.अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू असताना सत्ताधारी मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने दिवा भाजपच्या वतीने कल्याण जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड,ऍड.आदेश भगत,रोहिदास मुंडे, निलेश पाटील,रोशन भगत,अंकुश मढवी, नरेश कदम,सचिन  भोईर,गणेश भगत आदी नी मुंब्रा देवी कॉलनी येथे रस्त्याचे काम ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सुरू आहे तेथे ठामपा सत्ताधारी व प्रशासनाच्या नावाने श्राद्ध घालत मुंडन केले.

दिवा शहरात सत्ताधाऱ्यांची मनमानी असून नागरिकांचे हित लक्षात न घेता केवळ टेंडर साठी कामे केली जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.गणेश नगर भागातील खड्डे अद्याप भरण्यात आले नसून या रस्त्याच्या कामाला सुरुवात कधी करणार असा सवाल भाजपने केला आहे.2019 च्या निवडणुकीसाठी सत्ताधारी शिवसेना दिव्यातील गरीब नागरिकांना वेठीस धरत असून जाणीव पूर्वक संथ गतीने कामे केली जात असल्याचा आरोप रोहिदास मुंडे यांनी केला आहे.मे महिन्याच्या आत सर्व रस्त्याची कामे पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे कल्याण ग्रामीणचे नेते शिवाजी आव्हाड यांनी दिला आहे.दिव्यतील सर्व मुख्य रस्त्याची कामे पावसाळ्या पूर्वी करा अशी मागणी ऍड आदेश भगत यांनी केली आहे. शौचालय घोटाळा, नाना नानी पार्क घोटाळा,पाणी घोटाळा यासारख्या अनेक विषयांवर सत्यधारी शिवसेनेला लक्ष करत भाजपने हे आंदोलन केले आहे.एकंदरीत दिवा भाजप आता विकास कामांच्या मुद्द्यावर आक्रमक झाली असून.शिवसेनेच्या कामांवर पहारेकरी म्हणून भूमिका बजावणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाcongressकाँग्रेसBJPभाजपा