शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अविनाश जाधव यांच्यावरील कारवाईमागचं गौडबंगाल; पालकमंत्री एकनाथ शिंदेंवर मनसेचे गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 15:50 IST

ठाणे महापालिकेने प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला आहे. याबाबत मनसेकडून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी याची दखल घेऊन गुन्हा दाखल करावेत अशी मागणी मनसे नेते अभिजीत पानसे यांनी केली.

ठळक मुद्दे...तर त्यांचे बुरखे फाडल्याशिवाय मनसे गप्प बसणार नाहीस्वत:ची तिजोरी भरण्यासाठी नेते लोकांच्या आरोग्याशी खेळ करत आहेत ३ महिन्याचाही अनुभव नसलेल्या ओम साई आरोग्य केअर प्रा. लिमिटेड कंपनीला पालिकेचे टेंडर

ठाणे – मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस दिल्यानंतर आता हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे, ठाण्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावामुळेच अविनाश जाधव यांच्यावर अशाप्रकारे कारवाई करण्यात आली असा आरोप मनसेने केला होता, त्यानंतर शिवसेनेचे महापौर नरेश म्हस्के यांनी प्रसिद्धीसाठी एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणार असाल तर शिवसेना जशास तसे उत्तर देईल असा इशारा दिला होता, त्यामुळे ठाण्यात शिवसेना-मनसे आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं आहे.

त्यानंतर आता मनसे नेते अभिजीत पानसे यांनी ठाणे महापालिका आणि पालकमंत्री एकनाथ शिंदेवर गंभीर आरोप लावले आहेत, त्यांनी पत्रकार परिषद घेत म्हणाले की, २५० नर्सेसला सहा महिन्याचा करार असताना ठाणे महापालिकेने तडकाफडकी काढलं, त्याठिकाणी नवीन कंत्राटदार नेमून त्या नर्सेसना कंत्राटदारांकडे काम करण्यास सांगितलं, त्या नर्सेसने मनसेकडे मदतीची मागणी केली, त्याबाबत मनसेचे अविनाश जाधव यांनी कोणतंही मारहाण न करताना विधायक मार्गाने आंदोलन केले, त्यावेळी अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस आली, पोलिसांवर प्रचंड दबाव टाकून ३५३ चा गुन्हा दाखल केला, अविनाशला बाहेर सुटू नये यासाठी यंत्रणा कामाला लावली, या आंदोलनासाठी इतका मोठा गुन्हा दाखल करण्यामागचं नेमकं कारण काय? याचा शोध आम्ही घेतली तेव्हा धक्कादायक माहिती हाती लागल्याचं त्यांनी सांगितले.

तसेच ओम साई आरोग्य केअर प्रा. लिमिटेड या चेंबूरमध्ये असलेल्या कंपनीला टेंडर दिलं आहे, या कंपनीचं रजिस्टर ऑफिस चेंबूरमध्ये एक गाळा आहे, त्याठिकाणी गेलो असता तेथे हा गाळा विकणे आहे असा बोर्ड लावला आहे. त्याचे मालक डॉ. शेख मुंब्रा,ठाणे येथे राहतात, ठाणे महापालिकेने १८ जुलैला टेंडर काढलं आणि ७ दिवसांत २५ जुलैला ओम साई कंपनीला टेंडर दिले, हे टेंडर देण्यासाठी किमान ३ वर्ष आरोग्य क्षेत्रातील अनुभव असावा अशी अट आहे, पण या ओम साई कंपनीचं रजिस्ट्रेशन १९ जून २०२० रोजी झालं आहे, या कंपनीला ३ महिनेही झाले त्यांना कंत्राट दिलं गेलं. या संपूर्ण भ्रष्टाचारामागे कोण आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, मुंबई महापालिकेने १० हजार पीपीई किट्स रद्द केले ते ठाणे महापालिकेने घेतले, त्याचे बिल २ दिवसांत काढलं, कोरोनाच्या नावाखाली लुटण्याचे धंदे सुरु आहेत, हॉस्पिटल काढण्याचं टेंडर महापालिकेने काढलं आहे. तेदेखील ओम साईला कंपनीला देण्याचा घाट घातला आहे. ठाणे महापालिकेने प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला आहे. याबाबत मनसेकडून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी याची दखल घेऊन गुन्हा दाखल करावेत अशी मागणी मनसे नेते अभिजीत पानसे यांनी केली.

तर महापौरांना पालकमंत्र्यांच्या बाजूने बोलावं लागेल, ते गणितज्ज्ञ आहे पालिकेतील भ्रष्टाचार त्यांना टक्केवारीनुसार माहिती आहे. कोविडच्या नावाखाली भ्रष्टाचार करत आहेत, नर्सेसला काढलं नाही, अडीच महिने पगार दिला नाही, कोविड टेस्ट करायला हवी तीदेखील केली नाही, हा आरोग्याच्या विषयात पैसे खाणारे लोक असतील तर त्यांचे बुरखे फाडल्याशिवाय मनसे गप्प बसणार नाही असा इशारा मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिला आहे. अविनाश जाधव यांच्यावर केसेस झाले म्हणून घाबरणार नाही, कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी १०० बसेस सोडणार नाही, स्वत:ची तिजोरी भरण्यासाठी नेते लोकांच्या आरोग्याशी खेळ करत आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAvinash Jadhavअविनाश जाधवMNSमनसेShiv SenaशिवसेनाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस