शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

मते वाढली तरीही सेनेला धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 01:38 IST

 मनसेला सुगीचे दिवस, लोकसभेच्या तुलनेत भाजपचे मताधिक्य घटले

- अजित मांडकेठाणे : ठाण्यातील ओवळा-माजिवडा, कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघांत शिवसेनेची ताकद वाढली असली, तरी ठाण्यात मात्र भाजपबरोबर शिवसेनेलाही फटका बसल्याचे दिसून आले आहे. मात्र, मुंब्रा-कळव्यात शिवसेनेला जोरदार मुसंडी मारता आलेली नाही. या ठिकाणी राष्ट्रवादीने मतांमध्ये जोरदार आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे.

परंतु, कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच वागळे इस्टेट आणि किसननगर भागात मतांमध्ये काहीशी घट झाली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही सुद्धा भविष्यात शिवसेनेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने ठाण्यात मात्र पुन्हा एकदा नव्याने मनसेचा उदय झाला आहे. त्याचा फायदा आता ते कसे उठवितात, हे आता आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत ठरल्याप्रमाणे चारही जागांचे निकाल लागले आहेत. ठाण्यातून भाजपचे संजय केळकर हे अपेक्षेप्रमाणे निवडून आले आहेत. परंतु, त्यांच्या मताधिक्यामध्ये प्रचंड घट झाली आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेला ८३ हजारांच्या आसपास लीड मिळाले होते. मात्र, आताच्या निवडणुकीत भाजपला मात्र केवळ १९ हजारांचे लीड या मतदारसंघातून मिळविता आले आहे. दुसरीकडे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातदेखील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ८९ हजारांचे मताधिक्य मिळविले आहे.

मात्र, लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून शिवसेनेला एक लाखांच्या आसपास मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे कुठेतरी या मतांमध्येही घट झाल्याचे दिसत आहे. ओवळा-माजिवडा मतदारसंघातही शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी ८३ हजारांचे लीड घेऊन भाव खाल्ला असला, तरी लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून शिवसेनेला एक लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळवून देण्यात त्यांचा खारीचा वाटा होता. तर, मुंब्रा-कळवा मतदारसंघात शिवसेनेच्या मतांमध्ये कुठेही घट झाल्याचे दिसून आले नाही. मागील विधानसभा निवडणुकीत जेवढी मते मिळाली होती, त्यापेक्षा काही अंशी मतांमध्ये भर पडल्याचे दिसून आले आहे. उपरोक्त तीनही मतदारसंघांत शिवसेनेच्या मतांमध्ये काहीशी घट झाल्याचे दिसत असताना त्याचा फटका भाजपलाही तितकाच बसल्याचे

चित्र निकालावरून स्पष्ट झाले आहे. ठाणे शहरातून भाजपच्या उमेदवाराला अवघे १९ हजारांचे मताधिक्य मिळविता आले आहे. विशेष म्हणजे हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. त्यामुळे सर्वाधिक मताधिक्याचा दावाही निकालापूर्वी शिवसेनेच्या खासदारांसह भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केला होता. परंतु, तो फोल ठरला असून भाजपची मते २० हजारांनी वाढली असली, तरी लोकसभेच्या तुलनेत मताधिक्यामध्ये सुमारे ६२ हजारांची घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने ठाण्यातील चारही मतदारसंघांत मनसेच्या इंजिनाला डबे मिळाले आहेत. यामध्ये ठाणे शहर मतदारसंघात मनसेचे इंजीन हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने टाकलेल्या इंधनाच्या मदतीने सुसाट धावल्याचे स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात मनसेला तब्बल ७२ हजार मते मिळाली आहेत. तर, कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात मनसेला २१ हजार ५१३, ओवळा-माजिवड्यात २१ हजार १३२ मते मिळाली आहेत. एकूणच, येत्या ठाणे महापालिका निवडणुकीत मनसेला मतरूपी मिळालेली नवसंजीवनी नक्कीच ऊर्जा देणारी ठरणार आहे. ठाण्यात तर त्यांना यानिमित्ताने महापालिकेचे चित्र बदलण्याचे संकेतच मिळाले आहेत. आता या मतांचा उपयोग ते कसा आणि कशा पद्धतीने उचलतात, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाMNSमनसे