शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मते वाढली तरीही सेनेला धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 01:38 IST

 मनसेला सुगीचे दिवस, लोकसभेच्या तुलनेत भाजपचे मताधिक्य घटले

- अजित मांडकेठाणे : ठाण्यातील ओवळा-माजिवडा, कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघांत शिवसेनेची ताकद वाढली असली, तरी ठाण्यात मात्र भाजपबरोबर शिवसेनेलाही फटका बसल्याचे दिसून आले आहे. मात्र, मुंब्रा-कळव्यात शिवसेनेला जोरदार मुसंडी मारता आलेली नाही. या ठिकाणी राष्ट्रवादीने मतांमध्ये जोरदार आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे.

परंतु, कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच वागळे इस्टेट आणि किसननगर भागात मतांमध्ये काहीशी घट झाली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही सुद्धा भविष्यात शिवसेनेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने ठाण्यात मात्र पुन्हा एकदा नव्याने मनसेचा उदय झाला आहे. त्याचा फायदा आता ते कसे उठवितात, हे आता आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत ठरल्याप्रमाणे चारही जागांचे निकाल लागले आहेत. ठाण्यातून भाजपचे संजय केळकर हे अपेक्षेप्रमाणे निवडून आले आहेत. परंतु, त्यांच्या मताधिक्यामध्ये प्रचंड घट झाली आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेला ८३ हजारांच्या आसपास लीड मिळाले होते. मात्र, आताच्या निवडणुकीत भाजपला मात्र केवळ १९ हजारांचे लीड या मतदारसंघातून मिळविता आले आहे. दुसरीकडे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातदेखील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ८९ हजारांचे मताधिक्य मिळविले आहे.

मात्र, लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून शिवसेनेला एक लाखांच्या आसपास मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे कुठेतरी या मतांमध्येही घट झाल्याचे दिसत आहे. ओवळा-माजिवडा मतदारसंघातही शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी ८३ हजारांचे लीड घेऊन भाव खाल्ला असला, तरी लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून शिवसेनेला एक लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळवून देण्यात त्यांचा खारीचा वाटा होता. तर, मुंब्रा-कळवा मतदारसंघात शिवसेनेच्या मतांमध्ये कुठेही घट झाल्याचे दिसून आले नाही. मागील विधानसभा निवडणुकीत जेवढी मते मिळाली होती, त्यापेक्षा काही अंशी मतांमध्ये भर पडल्याचे दिसून आले आहे. उपरोक्त तीनही मतदारसंघांत शिवसेनेच्या मतांमध्ये काहीशी घट झाल्याचे दिसत असताना त्याचा फटका भाजपलाही तितकाच बसल्याचे

चित्र निकालावरून स्पष्ट झाले आहे. ठाणे शहरातून भाजपच्या उमेदवाराला अवघे १९ हजारांचे मताधिक्य मिळविता आले आहे. विशेष म्हणजे हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. त्यामुळे सर्वाधिक मताधिक्याचा दावाही निकालापूर्वी शिवसेनेच्या खासदारांसह भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केला होता. परंतु, तो फोल ठरला असून भाजपची मते २० हजारांनी वाढली असली, तरी लोकसभेच्या तुलनेत मताधिक्यामध्ये सुमारे ६२ हजारांची घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने ठाण्यातील चारही मतदारसंघांत मनसेच्या इंजिनाला डबे मिळाले आहेत. यामध्ये ठाणे शहर मतदारसंघात मनसेचे इंजीन हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने टाकलेल्या इंधनाच्या मदतीने सुसाट धावल्याचे स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात मनसेला तब्बल ७२ हजार मते मिळाली आहेत. तर, कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात मनसेला २१ हजार ५१३, ओवळा-माजिवड्यात २१ हजार १३२ मते मिळाली आहेत. एकूणच, येत्या ठाणे महापालिका निवडणुकीत मनसेला मतरूपी मिळालेली नवसंजीवनी नक्कीच ऊर्जा देणारी ठरणार आहे. ठाण्यात तर त्यांना यानिमित्ताने महापालिकेचे चित्र बदलण्याचे संकेतच मिळाले आहेत. आता या मतांचा उपयोग ते कसा आणि कशा पद्धतीने उचलतात, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाMNSमनसे