शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

पाणी विकून शिवसैनिक घर चालवतात, राष्ट्रवादीच्या मोर्चात जितेंद्र आव्हाडांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 3:38 AM

कळवा-खारीगाव, विटावा भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईविरोधात सोमवारी राष्ट्रवादी काँगे्रसने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कळवा प्रभाग समिती कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.

ठाणे - कळवा-खारीगाव, विटावा भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईविरोधात सोमवारी राष्ट्रवादी काँगे्रसने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कळवा प्रभाग समिती कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. त्यामध्ये कळवा पूर्वेतील भास्करनगर, वाघोबानगर, आतकोनेश्वरनगर, पौंडपाडा या डोंगरपट्ट्यातील सर्वाधिक नागरिक सहभागी झाले होते. गेली २५ वर्षे ज्या पक्षाकडे ठाण्याची सत्ता आहे, त्या शिवसेनेने केवळ टक्केवारी मिळाली नाही, म्हणून धरणासाठी पाठपुरावा केला नसल्याचा आरोप करून जोपर्यंत पाणी मिळणार नाही, तोपर्यंत बिल भरणार नसल्याचा इशारा आव्हाड यांनी दिला. नगरसेवकासह अनेक शिवसैनिक महापालिकेचे पाणी विकून आपली घरे चालवित असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.सध्या सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष आहे. कळवा - खारीगाव - विटावावासीयांना आठवड्यातून दोनच दिवस पाणीपुरवठा होत आहे. पाण्याचे नियोजन होत नसल्याने ठाणेकरांना त्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने या जनआक्र ोश मोर्चाचे आयोजन केले होते. यात अनेक महिलांनी आपल्या हातात आणि डोक्यावर रिकामी मडकी घेतली होती. ती प्रभाग समिती कार्यालयासमोर फोडून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. संपूर्ण ठाणे शहरात पाणीटंचाई निर्माण झालेली असून तिला सत्ताधारी शिवसेनाच जबाबदार आहे. २००२ मध्ये आघाडी सरकारने ठाण्यासाठी शाई धरण मंजूर केले होते. मात्र, येथील सत्ताधाºयांनी टक्केवारी मिळत नसल्याने हे धरण बांधण्यासाठी तरतूद केली नाही. त्यामुळे हे धरण शासनाकडे गेले आहे. पाणी सोडणाºया व्हॉल्व्हमनची दादागिरी सर्वत्र सुरू असून ती आता सहन केली जाणार नाही. अशी दादागिरी करणाºयांची प्रभागातच धिंड काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या मोर्चामध्ये शहराध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, नगरसेवक मुकुंद केणी, प्रमिला केणी, महेश साळवी तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .आयुक्तांवरही टीका : शहरातील पाणीटंचाई दूर करायची असेल, तर इतर मोठे प्रकल्प बाजूला ठेवून आधी धरण बांधावे, असे आवाहन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना केले. कळव्याबरोबरच संपूर्ण ठाणे शहरातच पाण्याची समस्या गंभीर असून मोठ्या प्रकल्पांवर पैसे खर्च करण्यापेक्षा धरण बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच कळवा पूर्व भागातील झोपड्या रंगवताना आयुक्तांबरोबर स्वत: उपस्थित असतानाही त्या रंगवण्यापेक्षा डोंगरपट्ट्यातील नागरिकांना पाणी द्या, अशी टीकाही आव्हाड यांनी आयुक्तांवर केली.सायलेन्स झोनची ऐशीतैशीसह्याद्री शाळेजवळ असलेल्या कावेरीसेतू या ठिकाणी मोर्चाला सुरु वात झाली. त्यानंतर, कळवानाक्यावरून कळवा प्रभाग समिती कार्यालयावर मोर्चाची सांगता करण्यात आली. यावेळी कळवा प्रभाग समितीच्या समोरच आव्हाड यांनी भाषण केले. कळवा प्रभाग समितीच्या बाजूला दोन शाळा असून पालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय थोड्या अंतरावर आहे. त्यामुळे हा परिसर सायलेन्स झोन असतानादेखील या परिसरात पोलिसांच्या उपस्थितीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.पाणी व कच-यातून शिवसेनेला पैसाकळव्यातील एक शिवसेनेचा एक नगरसेवक महापालिकेचे पाणी विकून आपले घर चालवित असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला. तो आपला मित्र असल्याने त्याचे नाव घेत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांची घरे पाणी विकूनच चालत आहेत.पाणी, कचरा यामधून शिवसेना पैसे कमावत आहे. त्यामुळे सामान्य ठाणेकरांचे हाल होत आहेत. आता हे हाल आम्ही सहन करणार नाही. जर, कळवा-खारीगाव-विटाव्यासह संपूर्ण ठाणे शहराची पाणीसमस्या निकाली काढली नाही, तर लाखोंचा मोर्चा ठामपा मुख्यालयावर काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.पाण्यासाठी भगिनींच्या डोळ्यांत तरळणारे अश्रू आता आम्हाला पाहवत नाहीत. त्यामुळे आता आम्ही कायदा हातात घेऊन जनतेसाठी जेलमध्ये जाण्यासही तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडShiv Senaशिवसेना