शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

बंधाऱ्यांसाठी ४५ लाख रिकाम्या गोण्यांची शोधाशोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 02:02 IST

ठाणे जिल्ह्यात यंदा सर्वाधिक १६५ मिमी पाऊस पडला असून डोंगरउतारांवरून पावसाचे पाणी वाहून जात आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यात यंदा सर्वाधिक १६५ मिमी पाऊस पडला असून डोंगरउतारांवरून पावसाचे पाणी वाहून जात आहे. या वाहत्या पाण्यास वेळीच अडवून पाणीटंचाई दूर करण्यासह रब्बी पिकांसाठी त्याचा वापर करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी सिमेंटच्या रिकाम्या ४५ लाख गोण्या मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेकडून (जि.प.) शोधाशोध सुरू झाली आहे.मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आदी महानगरांना पाणीपुरवठा करणाºया ठाणे जिल्ह्यात सर्वच तालुक्यांतील ग्रामीण जनता तीव्र पाणीटंचाईला तोंड देते. या समस्येवर काही प्रमाणात मात करण्यासाठी सध्या वाहत असलेल्या छोट्यामोठ्या नद्या, नाले, ओढे आदींचे पाणी वेळीच अडवण्यासाठी वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. यासाठी नदी, नाले, ओढ्यांवर बांधण्यात येणाºया वनराई बंधाऱ्यांचे ठिकाण शोधण्यासाठी यंत्रणा जिल्ह्यात सतर्क झाली आहे. याशिवाय, त्यासाठी लागणाºया गोण्या मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, बिल्डर्स असोसिएशन, कंत्राटदार, जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या गृहप्रकल्पांच्या यंत्रणा, नगरपालिका, नगर परिषदा, कंपन्या आदींशी संपर्क साधून सिमेंटच्या रिकाम्या गोण्या देण्याचे लेखी आवाहन केल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी लोकमतला सांगितले.साडेचार हजार वनराई बंधा-यांचे नियोजनया ४५ लाख रिकाम्या गोण्यांमध्ये माती भरून त्या वाहत्या पाण्यात एकावर एक ठेवून लांब बंधारा बांधला जाणार आहे. जिल्हाभरात स्थानिक गावकºयांच्या लोकसहभागातून तब्बल चार हजार ५०० वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. यामध्ये शहापूर, मुरबाड या दोन्ही तालुक्यांत प्रत्येकी एक हजार ५०० बंधारे बांधण्याचे नियोजन केले. भिवंडीला एक हजार आणि कल्याण, अंबरनाथ तालुक्यांत प्रत्येकी २५० वनराई बंधारे बांधण्यासाठी लागणाºया ठिकाणांचा शोध पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांच्या माध्यमातून घेतला जात आहे. निवडणूक संपताच हा उपक्रम युद्धपातळीवर राबवण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे.भूगर्भातील पाणीसाठा टिकवणारया वनराई बंधाºयांमुळे उन्हाळ्यात उद्भवणाºया पाणीटंचाईला काहीअंशी आळा घालणे शक्य होणार आहे. याशिवाय, दैनंदिन वापरासह गुरंढोरं, वन्य पशुपक्षी आदींना या वनराई बंधाºयातील पाणी नवसंजीवनी देणार आहे. शेतकºयांना भेंडीसारख्या नगदी रब्बी पिकांप्रमाणेच पालेभाज्यांचे उत्पन्न सहज घेता येईल. याकरिता या बंधाºयांतील पाण्याचा वापर उपयुक्त ठरणार आहे. विहिरींमधील पाण्याची पातळी वाढण्यासह भूगर्भातील पाणीसाठा टिकवून ठेवता येणार आहे.विद्यार्थ्यांचा सहभाग घेणारया नवसंजीवनी देणा-या उपक्रमासाठी स्थानिक गावकºयांच्या लोकसहभागाप्रमाणेच ठाणे, मुंबईतील महाविद्यालयातील विद्यार्थी, एनएसएस, एनसीसी आदी विद्यार्थी संघटना, उद्योगधंदे, कारखाने, शाळा, महाविद्यालये, सामाजिक, राजकीय संघटना, शिक्षक संघटना आदींचा सहभाग घेऊन वनराई बंधाºयांची निर्मिती करण्याचे नियोजन ठाणे जिल्हा परिषदेने केले आहे.

टॅग्स :thaneठाणे