शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
4
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
5
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
7
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
8
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
9
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
10
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
11
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
12
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
13
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
14
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
15
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
16
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
17
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
18
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
19
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
20
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?

बंधाऱ्यांसाठी ४५ लाख रिकाम्या गोण्यांची शोधाशोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 02:02 IST

ठाणे जिल्ह्यात यंदा सर्वाधिक १६५ मिमी पाऊस पडला असून डोंगरउतारांवरून पावसाचे पाणी वाहून जात आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यात यंदा सर्वाधिक १६५ मिमी पाऊस पडला असून डोंगरउतारांवरून पावसाचे पाणी वाहून जात आहे. या वाहत्या पाण्यास वेळीच अडवून पाणीटंचाई दूर करण्यासह रब्बी पिकांसाठी त्याचा वापर करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी सिमेंटच्या रिकाम्या ४५ लाख गोण्या मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेकडून (जि.प.) शोधाशोध सुरू झाली आहे.मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आदी महानगरांना पाणीपुरवठा करणाºया ठाणे जिल्ह्यात सर्वच तालुक्यांतील ग्रामीण जनता तीव्र पाणीटंचाईला तोंड देते. या समस्येवर काही प्रमाणात मात करण्यासाठी सध्या वाहत असलेल्या छोट्यामोठ्या नद्या, नाले, ओढे आदींचे पाणी वेळीच अडवण्यासाठी वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. यासाठी नदी, नाले, ओढ्यांवर बांधण्यात येणाºया वनराई बंधाऱ्यांचे ठिकाण शोधण्यासाठी यंत्रणा जिल्ह्यात सतर्क झाली आहे. याशिवाय, त्यासाठी लागणाºया गोण्या मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, बिल्डर्स असोसिएशन, कंत्राटदार, जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या गृहप्रकल्पांच्या यंत्रणा, नगरपालिका, नगर परिषदा, कंपन्या आदींशी संपर्क साधून सिमेंटच्या रिकाम्या गोण्या देण्याचे लेखी आवाहन केल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी लोकमतला सांगितले.साडेचार हजार वनराई बंधा-यांचे नियोजनया ४५ लाख रिकाम्या गोण्यांमध्ये माती भरून त्या वाहत्या पाण्यात एकावर एक ठेवून लांब बंधारा बांधला जाणार आहे. जिल्हाभरात स्थानिक गावकºयांच्या लोकसहभागातून तब्बल चार हजार ५०० वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. यामध्ये शहापूर, मुरबाड या दोन्ही तालुक्यांत प्रत्येकी एक हजार ५०० बंधारे बांधण्याचे नियोजन केले. भिवंडीला एक हजार आणि कल्याण, अंबरनाथ तालुक्यांत प्रत्येकी २५० वनराई बंधारे बांधण्यासाठी लागणाºया ठिकाणांचा शोध पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांच्या माध्यमातून घेतला जात आहे. निवडणूक संपताच हा उपक्रम युद्धपातळीवर राबवण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे.भूगर्भातील पाणीसाठा टिकवणारया वनराई बंधाºयांमुळे उन्हाळ्यात उद्भवणाºया पाणीटंचाईला काहीअंशी आळा घालणे शक्य होणार आहे. याशिवाय, दैनंदिन वापरासह गुरंढोरं, वन्य पशुपक्षी आदींना या वनराई बंधाºयातील पाणी नवसंजीवनी देणार आहे. शेतकºयांना भेंडीसारख्या नगदी रब्बी पिकांप्रमाणेच पालेभाज्यांचे उत्पन्न सहज घेता येईल. याकरिता या बंधाºयांतील पाण्याचा वापर उपयुक्त ठरणार आहे. विहिरींमधील पाण्याची पातळी वाढण्यासह भूगर्भातील पाणीसाठा टिकवून ठेवता येणार आहे.विद्यार्थ्यांचा सहभाग घेणारया नवसंजीवनी देणा-या उपक्रमासाठी स्थानिक गावकºयांच्या लोकसहभागाप्रमाणेच ठाणे, मुंबईतील महाविद्यालयातील विद्यार्थी, एनएसएस, एनसीसी आदी विद्यार्थी संघटना, उद्योगधंदे, कारखाने, शाळा, महाविद्यालये, सामाजिक, राजकीय संघटना, शिक्षक संघटना आदींचा सहभाग घेऊन वनराई बंधाºयांची निर्मिती करण्याचे नियोजन ठाणे जिल्हा परिषदेने केले आहे.

टॅग्स :thaneठाणे