शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

बंधाऱ्यांसाठी ४५ लाख रिकाम्या गोण्यांची शोधाशोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 02:02 IST

ठाणे जिल्ह्यात यंदा सर्वाधिक १६५ मिमी पाऊस पडला असून डोंगरउतारांवरून पावसाचे पाणी वाहून जात आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यात यंदा सर्वाधिक १६५ मिमी पाऊस पडला असून डोंगरउतारांवरून पावसाचे पाणी वाहून जात आहे. या वाहत्या पाण्यास वेळीच अडवून पाणीटंचाई दूर करण्यासह रब्बी पिकांसाठी त्याचा वापर करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी सिमेंटच्या रिकाम्या ४५ लाख गोण्या मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेकडून (जि.प.) शोधाशोध सुरू झाली आहे.मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आदी महानगरांना पाणीपुरवठा करणाºया ठाणे जिल्ह्यात सर्वच तालुक्यांतील ग्रामीण जनता तीव्र पाणीटंचाईला तोंड देते. या समस्येवर काही प्रमाणात मात करण्यासाठी सध्या वाहत असलेल्या छोट्यामोठ्या नद्या, नाले, ओढे आदींचे पाणी वेळीच अडवण्यासाठी वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. यासाठी नदी, नाले, ओढ्यांवर बांधण्यात येणाºया वनराई बंधाऱ्यांचे ठिकाण शोधण्यासाठी यंत्रणा जिल्ह्यात सतर्क झाली आहे. याशिवाय, त्यासाठी लागणाºया गोण्या मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, बिल्डर्स असोसिएशन, कंत्राटदार, जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या गृहप्रकल्पांच्या यंत्रणा, नगरपालिका, नगर परिषदा, कंपन्या आदींशी संपर्क साधून सिमेंटच्या रिकाम्या गोण्या देण्याचे लेखी आवाहन केल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी लोकमतला सांगितले.साडेचार हजार वनराई बंधा-यांचे नियोजनया ४५ लाख रिकाम्या गोण्यांमध्ये माती भरून त्या वाहत्या पाण्यात एकावर एक ठेवून लांब बंधारा बांधला जाणार आहे. जिल्हाभरात स्थानिक गावकºयांच्या लोकसहभागातून तब्बल चार हजार ५०० वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. यामध्ये शहापूर, मुरबाड या दोन्ही तालुक्यांत प्रत्येकी एक हजार ५०० बंधारे बांधण्याचे नियोजन केले. भिवंडीला एक हजार आणि कल्याण, अंबरनाथ तालुक्यांत प्रत्येकी २५० वनराई बंधारे बांधण्यासाठी लागणाºया ठिकाणांचा शोध पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांच्या माध्यमातून घेतला जात आहे. निवडणूक संपताच हा उपक्रम युद्धपातळीवर राबवण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे.भूगर्भातील पाणीसाठा टिकवणारया वनराई बंधाºयांमुळे उन्हाळ्यात उद्भवणाºया पाणीटंचाईला काहीअंशी आळा घालणे शक्य होणार आहे. याशिवाय, दैनंदिन वापरासह गुरंढोरं, वन्य पशुपक्षी आदींना या वनराई बंधाºयातील पाणी नवसंजीवनी देणार आहे. शेतकºयांना भेंडीसारख्या नगदी रब्बी पिकांप्रमाणेच पालेभाज्यांचे उत्पन्न सहज घेता येईल. याकरिता या बंधाºयांतील पाण्याचा वापर उपयुक्त ठरणार आहे. विहिरींमधील पाण्याची पातळी वाढण्यासह भूगर्भातील पाणीसाठा टिकवून ठेवता येणार आहे.विद्यार्थ्यांचा सहभाग घेणारया नवसंजीवनी देणा-या उपक्रमासाठी स्थानिक गावकºयांच्या लोकसहभागाप्रमाणेच ठाणे, मुंबईतील महाविद्यालयातील विद्यार्थी, एनएसएस, एनसीसी आदी विद्यार्थी संघटना, उद्योगधंदे, कारखाने, शाळा, महाविद्यालये, सामाजिक, राजकीय संघटना, शिक्षक संघटना आदींचा सहभाग घेऊन वनराई बंधाºयांची निर्मिती करण्याचे नियोजन ठाणे जिल्हा परिषदेने केले आहे.

टॅग्स :thaneठाणे