शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

स्वा. सावरकर प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणार, कल्याणमध्ये ‘हे मृत्युंजय’चा विशेष प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 1:00 AM

लवकरच हे नाटक १५० प्रयोगांकडे वाटचाल करणार आहे.

- मुरलीधर भवारकल्याण : स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सावरकर स्मारकातर्फे राज्यात विविध ठिकाणी ‘हे मृत्युंजय’ नाटकाचे प्रयोग केले जात आहेत. या नाटकाचा १३५ आणि १३६ वा प्रयोग सोमवारी कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात झाला. त्याच्या दोन्ही प्रयोगांना तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. लवकरच हे नाटक १५० प्रयोगांकडे वाटचाल करणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हे नाटक पोहोचविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे सावरकर स्मारकाचे सदस्य सुनील वालावलकर यांनी सांगितले.वालावलकर पुढे म्हणाले, ‘आतापर्यंत ‘हे मृत्युंजय’ नाटक ९० हजार विद्यार्थ्यांना नि:शुल्क दाखविले आहे. तसेच ३५० महाविद्यालयांत त्याचे प्रयोग झाले आहेत. या नाटकाचे आठ प्रयोग हिंदीतूनही झाले आहेत. दिल्लीतील जेएनयू विद्यापीठातही १४ मार्चला हे नाटक दाखविले गेले. तेथे छत्रपती शिवाजी महाराज व सावरकरांचा पुतळाही बसविण्यात आला.’ते पुढे म्हणाले, ‘केवळ नाटकच नाही, तर सावरकर स्मारकाच्या वतीने राज्यातील एक हजार वाचनालयांना सावरकर लिखित साहित्य मोफत देण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे युवा पिढीकडे मोठ्या आशेने पाहत होते. देश घडविण्यासाठी युवा पिढीच काहीतरी करू शकते, असा त्यांचा विश्वास होता. ‘हे मृत्युंजय’ नाटकात सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा ब्रिटिशांनी सुनावली होती. अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये ११ वर्षे सावरकरांनी शिक्षा भोगली होती. ही शिक्षा भोगत असताना त्यांना काय यातना सहन कराव्या लागल्या, हेच या नाटकातून मांडले आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी काय यातना सहन कराव्या लागल्या, स्वातंत्र्यवीरांना काय मोल मोजावे लागले, स्वातंत्र्याची किंमत कळावी, यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हे नाटक मोफत दाखविले जात आहे. सावरकरांचे विचार प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविणे हा त्यामागचा हेतू आहे. शालेय पुस्तकातून जे शिकविले जात नाही, ते या नाटकातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले आहे. हे नाटक प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांनी पुढाकार घेतला आहे.’ दरम्यान, नाटकाच्या प्रयोगासाठी अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे यांनी उपस्थिती लावली. सावरकरांचा विचार अंगीकारण्याची प्रेरणा या नाटकातून विद्यार्थांनी घेतली पाहिजे, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले....तर नाटकाचे फलितआजचा विद्यार्थी छोट्यामोठ्या कारणांमुळे अभ्यासाचा ताण घेतो. त्याचा राग आई-वडील व शिक्षकांवर काढतो. तसेच काही वेळेस वाममार्गालाही लागतो. ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपले जीवन देशासाठी वाहिले, त्यांचेही वय फारसे नव्हते. विद्यार्थीदशेपासून त्यांनी स्वातंत्र्याचा मंत्र अंगीकारला. तो प्रत्यक्षात आणला. ती प्रेरणा सावरकरांपासून घेऊन विद्यार्थ्यांनी देश घाडविण्याचे काम केल्यास ‘हे मृत्यंजय’ नाटकाचे फलित झाले, असे म्हणता येईल, असे वालावलकर यांनी नमूद केले.

टॅग्स :thaneठाणे