शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

निवडणूक फंडासाठी संतोष देशमुखची हत्या; जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपाने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 00:21 IST

ठाणे खाडी किनारी मार्गाचा ठेका रद्द करण्याची मागणी करत आवश्यक परवानगी आधीच कंत्राट कसे दिले? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. 

ठाणे : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या निवडणूक फंडासाठीच झाल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. आव्हाड यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. 

ठाण्यातही पर्यावरण तसेच आवश्यक परवानगी मिळण्याआधीच ठाणे खाडी किनारी मार्गाचे कंत्राट कसे दिले? असा प्रश्न उपस्थित करीत निवडणुक निधीसाठी परवानगी आधी प्रकल्पाचे कंत्राट दिल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला. 

या कामाचे कार्यादेश रद्द करून पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्याची मागणी असून, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला तर, त्यांच्या कामातील पारदर्शकता दिसेल, असे आव्हाड म्हणाले.

या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही आणि जनतेला उत्तम मार्गही मिळेल, याची खबरदारी नवे कंत्राट देताना घेतली जावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

ठाण्यातील वाहतूक कोंडीग्रस्त मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून बाळकुम ते गायमुख असा खाडी किनारी मार्ग उभारला जाणार आहे. या मार्गाचा प्रकल्प आराखडा ठाणे महापालिकेने तयार केला आहे, तर एमएमआरडीए मार्फत या मार्गाच्या उभारणीचे काम केले जाणार आहे. 

या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवून एमएमआरडीएने ठेकेदार निश्चित करून संबंधित ठेकेदाराला कामाचा कार्यादेश दिला आहे. मात्र, परवानगी मिळण्याआधीच कामाचा कार्यादेश दिल्याने प्रकल्पाचे काम वादात सापडले आहे. 

याच संदर्भात आव्हाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुक निधीसाठी परवानगी आधी प्रकल्पाचे कंत्राट दिल्याचा आरोप केला. बीडचे प्रकरणही निवडणूक निधीसाठीच घडले आणि आता खाडी किनारी मार्गाचे कंत्राटही निवडणुक निधीसाठी काढल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. 

सुरुवातीला प्रकल्पाचा खर्च १३०० कोटी होता. त्यात वाढ होऊन तो आता २७०० कोटी इतका झाल्याचेही आव्हाड म्हणाले. खाडी किनारा मार्गाच्या उभारणीसाठी तिवारांच्या जंगलांची बेसुमार कत्तल होऊ शकते, तसेच सागरी किनारा नियमनाचे कठोर कायदे, नौदलाच्या जागेला खेटून मार्ग उभारला जात असल्यामुळे संरक्षण विभागाचीही परवानगी आवश्यक असल्याचेही आव्हाड म्हणाले.

ठाणेकरांना धरण हवे आहे

ठाणे शहरात सर्वत्र पाणी टंचाईची समस्या असल्यामुळे या मुलभूत सुविधेवर लक्ष देणे गरजेचे आहे. शाई धरणाचा प्रस्ताव एमएमआरडीकडेच आहे. त्यावर कोणताही निर्णय होत नाही. पण, परवानगी आधी खाडी किनारी मार्ग उभारणीसाठी घाई केली जात आहे, असा आरोपही आव्हाड यांनी केला.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीJitendra Awhadजितेंद्र आव्हाडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस