शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

इमारती धोकादायक ठरवण्याची घाई; नोटिसाही न दिल्याने आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 00:30 IST

पूर्वेतील डॉ. राजेंद्र प्रसाद रोडवर वाटवे बिल्डिंग नावाने दुमजली आणि तीन मजली इमारती आहेत. त्या जुन्या झाल्याने गेले वर्षभर त्यांच्या पुनर्विकासाच्या वाटाघाटी सुरू आहेत

डोंबिवली : अतिधोकादायक, धोकादायक इमारतींचे पाणी आणि वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून सुरू असतानाच त्याचा फायदा घेत काही इमारतींना नोटिसा न देताच त्यांच्यावरही कारवाईचा प्रताप अधिकाऱ्यांकडून सुरू असल्याचे चित्र डोंबिवलीत पाहायला मिळत आहे. याप्रकरणी रहिवाशांत तीव्र नाराजी पसरली असून कोणतीही प्रशासकीय प्रक्रिया पार न पाडताच घाईघाईने केलेली कारवाई पाहता प्रभाग अधिकाºयाची कृती संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.पूर्वेतील डॉ. राजेंद्र प्रसाद रोडवर वाटवे बिल्डिंग नावाने दुमजली आणि तीन मजली इमारती आहेत. त्या जुन्या झाल्याने गेले वर्षभर त्यांच्या पुनर्विकासाच्या वाटाघाटी सुरू आहेत. बहुतांश रहिवाशांनी त्याला सहमती दर्शवली असून कायदेशीर प्रक्रिया शिल्लक आहेत. सध्या तेथील अनय कुटुंबाने स्थलांतर केले असले, तरी सात ते आठ कुटुंबे वास्तव्यास आहेत. पाच वर्षांपूर्वी स्ट्रक्चरल आॅडिट करून या इमारती धोकादायक जाहीर करण्याची प्रक्रिया पालिकेने केली होती. मात्र, त्याचा अहवालच पालिकेकडे नसल्याने रहिवाशांनी नोटीस बजावून पालिकेकडून स्पष्टीकरण मागवले होते. कोणत्या निकषाच्या आधारे इमारती धोकादायक ठरवल्या, याचे उत्तर मागवले होते. आजतागायत महापालिकेडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. विशेष बाब म्हणजे यंदा जाहीर करण्यात आलेल्या धोकादायक व अतिधोकादायक इमारतींच्या यादीत संबंधित इमारतींची नावे नाहीत. परंतु, ग प्रभागाचे प्रभाग अधिकारी प्रशांत जगताप यांनी पाच वर्षांपूर्वीच्या आॅडिटच्या आधारे या इमारती धोकादायक ठरवून नोटीस न देता सोमवारी पोलीस बंदोबस्तात या इमारतींचे पाणी तोडले.अचानक झालेल्या कारवाईमुळे रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी असून पूर्वसूचना न देता घाईघाईने केलेल्या या कारवाईमागे त्यांचा हेतू काय, असा सवाल केला आहे. पाच वर्षांपूर्वी इमारती धोकादायक ठरवल्या होत्या, मग तेव्हा कारवाई का केली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. जगताप यांची कृती संशयास्पद असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.‘आयुक्तांच्याआदेशानुसार कारवाई’संबंधित इमारती स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये धोकादायक असल्याचे स्पष्ट झाल्याने रहिवाशांना त्याबाबत माहिती देऊन इमारत रिकामी करण्यास सांगितले होते. अतिधोकादायक इमारतींचे पाणी आणि वीज कनेक्शन तोडण्याचे आयुक्तांचे आदेश असून त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. केवळ याच इमारतींवर कारवाई झाली नसून आतापर्यंत २० ते २२ इमारतींचे कनेक्शन तोडण्यात आल्याची प्रतिक्रिया ग प्रभाग अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी दिली.कारवाई बेकायदा!महापालिकेने आम्हाला कोणतीही नोटीस दिलेली नाही. नोटीस न देता तसेच आगाऊ कोणतीही कल्पना न देता अचानक कारवाई केली जाते, हे बेकायदेशीर असल्याचे रहिवासी चंद्रशेखर हुपरीकर यांनी सांगितले.तेव्हाच कारवाईका केली नाही?या कारवाईप्रकरणी स्थानिक नगरसेवक मंदार हळबे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. इमारत धोकादायक झालेली होती, तर मग पाच वर्षे प्रशासन झोपले होते का? तेव्हा तत्कालीन अधिकाऱ्यांनी कारवाई का केली नाही, याची चौकशी आयुक्तांनी करावी. आताच घाई का? कोणतीही नोटीस न बजावता बेकायदा कारवाई करून रहिवाशांना बेघर करण्यामागचा प्रभाग अधिकाºयाचा हेतू काय? आयुक्तांनी रहिवाशांच्या पुनर्वसनाची हमी द्यावी. मी इमारत रिकामी करून देतो, असा पवित्रा हळबे यांनी घेतला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका