शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
7
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
8
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
9
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
10
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
11
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
12
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
13
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
14
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
15
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
16
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
17
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
18
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
19
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
20
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप

इमारती धोकादायक ठरवण्याची घाई; नोटिसाही न दिल्याने आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 00:30 IST

पूर्वेतील डॉ. राजेंद्र प्रसाद रोडवर वाटवे बिल्डिंग नावाने दुमजली आणि तीन मजली इमारती आहेत. त्या जुन्या झाल्याने गेले वर्षभर त्यांच्या पुनर्विकासाच्या वाटाघाटी सुरू आहेत

डोंबिवली : अतिधोकादायक, धोकादायक इमारतींचे पाणी आणि वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून सुरू असतानाच त्याचा फायदा घेत काही इमारतींना नोटिसा न देताच त्यांच्यावरही कारवाईचा प्रताप अधिकाऱ्यांकडून सुरू असल्याचे चित्र डोंबिवलीत पाहायला मिळत आहे. याप्रकरणी रहिवाशांत तीव्र नाराजी पसरली असून कोणतीही प्रशासकीय प्रक्रिया पार न पाडताच घाईघाईने केलेली कारवाई पाहता प्रभाग अधिकाºयाची कृती संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.पूर्वेतील डॉ. राजेंद्र प्रसाद रोडवर वाटवे बिल्डिंग नावाने दुमजली आणि तीन मजली इमारती आहेत. त्या जुन्या झाल्याने गेले वर्षभर त्यांच्या पुनर्विकासाच्या वाटाघाटी सुरू आहेत. बहुतांश रहिवाशांनी त्याला सहमती दर्शवली असून कायदेशीर प्रक्रिया शिल्लक आहेत. सध्या तेथील अनय कुटुंबाने स्थलांतर केले असले, तरी सात ते आठ कुटुंबे वास्तव्यास आहेत. पाच वर्षांपूर्वी स्ट्रक्चरल आॅडिट करून या इमारती धोकादायक जाहीर करण्याची प्रक्रिया पालिकेने केली होती. मात्र, त्याचा अहवालच पालिकेकडे नसल्याने रहिवाशांनी नोटीस बजावून पालिकेकडून स्पष्टीकरण मागवले होते. कोणत्या निकषाच्या आधारे इमारती धोकादायक ठरवल्या, याचे उत्तर मागवले होते. आजतागायत महापालिकेडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. विशेष बाब म्हणजे यंदा जाहीर करण्यात आलेल्या धोकादायक व अतिधोकादायक इमारतींच्या यादीत संबंधित इमारतींची नावे नाहीत. परंतु, ग प्रभागाचे प्रभाग अधिकारी प्रशांत जगताप यांनी पाच वर्षांपूर्वीच्या आॅडिटच्या आधारे या इमारती धोकादायक ठरवून नोटीस न देता सोमवारी पोलीस बंदोबस्तात या इमारतींचे पाणी तोडले.अचानक झालेल्या कारवाईमुळे रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी असून पूर्वसूचना न देता घाईघाईने केलेल्या या कारवाईमागे त्यांचा हेतू काय, असा सवाल केला आहे. पाच वर्षांपूर्वी इमारती धोकादायक ठरवल्या होत्या, मग तेव्हा कारवाई का केली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. जगताप यांची कृती संशयास्पद असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.‘आयुक्तांच्याआदेशानुसार कारवाई’संबंधित इमारती स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये धोकादायक असल्याचे स्पष्ट झाल्याने रहिवाशांना त्याबाबत माहिती देऊन इमारत रिकामी करण्यास सांगितले होते. अतिधोकादायक इमारतींचे पाणी आणि वीज कनेक्शन तोडण्याचे आयुक्तांचे आदेश असून त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. केवळ याच इमारतींवर कारवाई झाली नसून आतापर्यंत २० ते २२ इमारतींचे कनेक्शन तोडण्यात आल्याची प्रतिक्रिया ग प्रभाग अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी दिली.कारवाई बेकायदा!महापालिकेने आम्हाला कोणतीही नोटीस दिलेली नाही. नोटीस न देता तसेच आगाऊ कोणतीही कल्पना न देता अचानक कारवाई केली जाते, हे बेकायदेशीर असल्याचे रहिवासी चंद्रशेखर हुपरीकर यांनी सांगितले.तेव्हाच कारवाईका केली नाही?या कारवाईप्रकरणी स्थानिक नगरसेवक मंदार हळबे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. इमारत धोकादायक झालेली होती, तर मग पाच वर्षे प्रशासन झोपले होते का? तेव्हा तत्कालीन अधिकाऱ्यांनी कारवाई का केली नाही, याची चौकशी आयुक्तांनी करावी. आताच घाई का? कोणतीही नोटीस न बजावता बेकायदा कारवाई करून रहिवाशांना बेघर करण्यामागचा प्रभाग अधिकाºयाचा हेतू काय? आयुक्तांनी रहिवाशांच्या पुनर्वसनाची हमी द्यावी. मी इमारत रिकामी करून देतो, असा पवित्रा हळबे यांनी घेतला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका