शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरुस्तीचं काम 24 एप्रिलपासून सुरू होणार, दोन महिन्यांसाठी रस्ता बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 2:28 PM

मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरुस्तीचं काम 24 एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यासाठी 16 एप्रिलपासूनच दोन महिन्यांसाठी हा रोड बंद ठेवण्यात आला . मुंब्रा बायपास रोड बंद असल्यानं ठाण्यात येणारी जड वाहतूक ऐरोली मार्गे वळवण्यात आली आहे.

ठाणे : मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरुस्तीचं काम 24 एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यासाठी 16 एप्रिलपासूनच दोन महिन्यांसाठी हा रोड बंद ठेवण्यात आलाय. मुंब्रा बायपास रोड बंद असल्यानं ठाण्यात येणारी जड वाहतूक ऐरोली मार्गे वळवण्यात आली आहे. तसेच वाहतूक शीळफाटामार्गे कल्याणहून भिवंडीच्या दिशेनं वळवली आहे. पण हलक्या वाहनांना जुन्या मुंब्रा गावातल्या रस्त्यावरून जाता येणार आहे.मुंब्रा बायपास हा जेएनपीटीमधून येणाऱ्या जड वाहतुकीसाठी तसेच कल्याण, नवी मुंबई, डोंबिवली यांना ठाणे शहराशी जोडणारा रस्ता आहे. येथे पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात होतात. शिवाय या बायपासखालून मध्य रेल्वे जाते. तो पूलही अत्यंत धोकादायक झाला आहे. त्यामुळेच 16 एप्रिलपासून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. पावसाळ्यापूर्वीच या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या दुरुस्तीच्या कामांमुळे मोठी वाहतूक कोंडी होणार आहे. त्याचा त्रास ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि मुंबईतील वाहनधारकांना होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागांच्या अधिका-यांची बैठक घेत यासंबंधी नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत.>असे असेल नियोजनमुंब्रा बायपासचे काम याच महिन्यात 16 एप्रिलला सुरू होईल. तब्बल २ महिने हे काम सुरू राहील. या काळात वाहतूक पूर्ण बंद ठेवण्यात येईल. त्यामुळे ठाण्यात येण्यासाठी जड वाहतूक ही ऐरोली मार्गे पूर्व द्रुतगती मार्गावर वळविण्याचा पर्याय वाहतूक विभागासमोर आहे. तर दुसरा पर्याय शीळफाटामार्गे कल्याणवरून भिवंडीला जाणे हा आहे. चार चाकी वाहने, तीन चाकी आणि दुचाकी चालकांना जुना मुंब्रा गावचा रस्ता ठाण्यात येण्या-जाण्यासाठी उपलब्ध असेल. दिवसा पार्किंगसाठी नवी मुंबईतील सिडको तसेच महानगरपालिकेची ट्रक टर्मिनलची रिक्त जागा तात्पुरत्या वापरासाठी देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

टॅग्स :mumbraमुंब्राthaneठाणेroad safetyरस्ते सुरक्षा