शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

भातसा धरणाचा उजवा तीर कालवा फुटला , शेतात शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:42 IST

येथील भातसा धरणाचा उजवा तीर कालवा शनिवारी सकाळी सातच्या सुमारास तालुक्यातील आवरे गावाजवळ फुटल्याने शेतात पाणी शिरले. यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले.

शहापूर : येथील भातसा धरणाचा उजवा तीर कालवा शनिवारी सकाळी सातच्या सुमारास तालुक्यातील आवरे गावाजवळ फुटल्याने शेतात पाणी शिरले. यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले.शेतकºयांना दुबार पिके घेता यावी यासाठी दरवर्षी भातसा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडले जाते. साधारण डिसेंबर महिन्यापासून पाणी सोडण्यास सुरूवात केली की ते एप्रिलपर्यंत राहते. परंतु हा उजवा कालवा इतका कमकूवत झालेला आहे की जरा क्षमतेपेक्षा जास्त वेगाने पाणी सोडले की कालव्याला ठिकठिकाणी भगदाड पडतात आणि कालवा फुटण्याचे प्रकार होतात.भातसा प्रकल्पातंर्गत बांधण्यात या भातसा उजवा तीर कालव्याची लांबी ९१ मीटर आहे. वज्रेश्वरी, भिवंडी, तानसा, दिघाशी, दुमाडी, कामवारी, उल्हास, आणि कुंभारी या शाखा कालव्याद्वारे सुमारे १६६८० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा उद्देश आहे. शहापूर तालुक्यात ५४ किलोमीटर इतक्या लांबीत पसरला आहे.सकाळी कालवा फुटल्याची माहिती मिळताच आमदार पांडुरंग बरोरा यांनी आवारे गावाला भेट देऊन पाहणी केली. सोबत चेरपोली ग्रामपंचायतीचे उप सरपंच विट्ठल भेरे होते. त्यांनी शेतकºयांना सरकारकडून नुकसानभरपाई मिळवून देऊ असे आश्वासन दिले.आमदार बरोरा म्हणाले, हा कालवा ४० वर्षपूर्वीचा आहे. पाणी सोडल्यानंतर कुठे ना कुठे कालवा फुटून शेतकºयांचे नुकसान होते. या कालव्याचे सर्वेक्षण करून पुन्हा बांधण्याची गरज आहे. या संबंधी मी गेल्यावर्षी विधानसभेत हा प्रश्न मांडला होता. आता सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. फुटलेल्या कालव्यासंदर्भात या विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याशी बोलून तातडीने या कालव्याची दुरु स्ती करा असे सांगितले.या संदर्भात भातसा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. सोनावणे यांना विचारले असता त्यांनी सांगितले तातडीने भातसा धरणातून सोडण्यात आलेले पाणी बंद करतो. म्हणजे शेतकºयांचे नुकसान होणार नाही.येथील शेतकºयांनी कारली, भेंडी, भात आणि कडधान्य आदींची पिके लावली होती. शनिवारी अचानक कालवा फुटून शेतात पाणी शिरले. सुरूवातीला संबंधित विभागाच्या कार्यालयाला फोन करून कळवण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणीच फोन उचलला नाही. त्यानंतर आमदार बरोरा यांना फोन लावला असता ते तातडीने आले. सरकारकडून नुकसान भरपाई मिळायला हवी.- अनंता म्हाळुंगे, शेतकरी.