शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

भातसा धरणाचा उजवा तीर कालवा फुटला , शेतात शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:42 IST

येथील भातसा धरणाचा उजवा तीर कालवा शनिवारी सकाळी सातच्या सुमारास तालुक्यातील आवरे गावाजवळ फुटल्याने शेतात पाणी शिरले. यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले.

शहापूर : येथील भातसा धरणाचा उजवा तीर कालवा शनिवारी सकाळी सातच्या सुमारास तालुक्यातील आवरे गावाजवळ फुटल्याने शेतात पाणी शिरले. यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले.शेतकºयांना दुबार पिके घेता यावी यासाठी दरवर्षी भातसा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडले जाते. साधारण डिसेंबर महिन्यापासून पाणी सोडण्यास सुरूवात केली की ते एप्रिलपर्यंत राहते. परंतु हा उजवा कालवा इतका कमकूवत झालेला आहे की जरा क्षमतेपेक्षा जास्त वेगाने पाणी सोडले की कालव्याला ठिकठिकाणी भगदाड पडतात आणि कालवा फुटण्याचे प्रकार होतात.भातसा प्रकल्पातंर्गत बांधण्यात या भातसा उजवा तीर कालव्याची लांबी ९१ मीटर आहे. वज्रेश्वरी, भिवंडी, तानसा, दिघाशी, दुमाडी, कामवारी, उल्हास, आणि कुंभारी या शाखा कालव्याद्वारे सुमारे १६६८० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा उद्देश आहे. शहापूर तालुक्यात ५४ किलोमीटर इतक्या लांबीत पसरला आहे.सकाळी कालवा फुटल्याची माहिती मिळताच आमदार पांडुरंग बरोरा यांनी आवारे गावाला भेट देऊन पाहणी केली. सोबत चेरपोली ग्रामपंचायतीचे उप सरपंच विट्ठल भेरे होते. त्यांनी शेतकºयांना सरकारकडून नुकसानभरपाई मिळवून देऊ असे आश्वासन दिले.आमदार बरोरा म्हणाले, हा कालवा ४० वर्षपूर्वीचा आहे. पाणी सोडल्यानंतर कुठे ना कुठे कालवा फुटून शेतकºयांचे नुकसान होते. या कालव्याचे सर्वेक्षण करून पुन्हा बांधण्याची गरज आहे. या संबंधी मी गेल्यावर्षी विधानसभेत हा प्रश्न मांडला होता. आता सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. फुटलेल्या कालव्यासंदर्भात या विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याशी बोलून तातडीने या कालव्याची दुरु स्ती करा असे सांगितले.या संदर्भात भातसा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. सोनावणे यांना विचारले असता त्यांनी सांगितले तातडीने भातसा धरणातून सोडण्यात आलेले पाणी बंद करतो. म्हणजे शेतकºयांचे नुकसान होणार नाही.येथील शेतकºयांनी कारली, भेंडी, भात आणि कडधान्य आदींची पिके लावली होती. शनिवारी अचानक कालवा फुटून शेतात पाणी शिरले. सुरूवातीला संबंधित विभागाच्या कार्यालयाला फोन करून कळवण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणीच फोन उचलला नाही. त्यानंतर आमदार बरोरा यांना फोन लावला असता ते तातडीने आले. सरकारकडून नुकसान भरपाई मिळायला हवी.- अनंता म्हाळुंगे, शेतकरी.