शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
4
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
5
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
6
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
7
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
8
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
9
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
10
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
11
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
12
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
13
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
14
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
15
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
16
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
17
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
18
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
19
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
20
Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?

भातसा धरणाचा उजवा तीर कालवा फुटला , शेतात शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:42 IST

येथील भातसा धरणाचा उजवा तीर कालवा शनिवारी सकाळी सातच्या सुमारास तालुक्यातील आवरे गावाजवळ फुटल्याने शेतात पाणी शिरले. यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले.

शहापूर : येथील भातसा धरणाचा उजवा तीर कालवा शनिवारी सकाळी सातच्या सुमारास तालुक्यातील आवरे गावाजवळ फुटल्याने शेतात पाणी शिरले. यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले.शेतकºयांना दुबार पिके घेता यावी यासाठी दरवर्षी भातसा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडले जाते. साधारण डिसेंबर महिन्यापासून पाणी सोडण्यास सुरूवात केली की ते एप्रिलपर्यंत राहते. परंतु हा उजवा कालवा इतका कमकूवत झालेला आहे की जरा क्षमतेपेक्षा जास्त वेगाने पाणी सोडले की कालव्याला ठिकठिकाणी भगदाड पडतात आणि कालवा फुटण्याचे प्रकार होतात.भातसा प्रकल्पातंर्गत बांधण्यात या भातसा उजवा तीर कालव्याची लांबी ९१ मीटर आहे. वज्रेश्वरी, भिवंडी, तानसा, दिघाशी, दुमाडी, कामवारी, उल्हास, आणि कुंभारी या शाखा कालव्याद्वारे सुमारे १६६८० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा उद्देश आहे. शहापूर तालुक्यात ५४ किलोमीटर इतक्या लांबीत पसरला आहे.सकाळी कालवा फुटल्याची माहिती मिळताच आमदार पांडुरंग बरोरा यांनी आवारे गावाला भेट देऊन पाहणी केली. सोबत चेरपोली ग्रामपंचायतीचे उप सरपंच विट्ठल भेरे होते. त्यांनी शेतकºयांना सरकारकडून नुकसानभरपाई मिळवून देऊ असे आश्वासन दिले.आमदार बरोरा म्हणाले, हा कालवा ४० वर्षपूर्वीचा आहे. पाणी सोडल्यानंतर कुठे ना कुठे कालवा फुटून शेतकºयांचे नुकसान होते. या कालव्याचे सर्वेक्षण करून पुन्हा बांधण्याची गरज आहे. या संबंधी मी गेल्यावर्षी विधानसभेत हा प्रश्न मांडला होता. आता सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. फुटलेल्या कालव्यासंदर्भात या विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याशी बोलून तातडीने या कालव्याची दुरु स्ती करा असे सांगितले.या संदर्भात भातसा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. सोनावणे यांना विचारले असता त्यांनी सांगितले तातडीने भातसा धरणातून सोडण्यात आलेले पाणी बंद करतो. म्हणजे शेतकºयांचे नुकसान होणार नाही.येथील शेतकºयांनी कारली, भेंडी, भात आणि कडधान्य आदींची पिके लावली होती. शनिवारी अचानक कालवा फुटून शेतात पाणी शिरले. सुरूवातीला संबंधित विभागाच्या कार्यालयाला फोन करून कळवण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणीच फोन उचलला नाही. त्यानंतर आमदार बरोरा यांना फोन लावला असता ते तातडीने आले. सरकारकडून नुकसान भरपाई मिळायला हवी.- अनंता म्हाळुंगे, शेतकरी.