शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
4
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
5
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
6
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
7
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
8
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
9
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
10
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
11
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
12
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
13
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
14
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
15
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
16
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
17
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
18
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
19
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
20
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...

रिक्षा व्यवसाय अद्यापही थंडच, मालक-चालक चिंतित; रेल्वे सेवेवरच व्यवसाय अवलंबून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 00:53 IST

कल्याण-डोंबिवलीकर नोकरी, व्यवसायानिमित्त ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरात ये-जा करतात. त्यामुळे ते बहुतांशी वाहतुकीसाठी रेल्वेवरच अवलंबून आहेत.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत लॉकडाऊन शिथिल होऊन पंधरवड्यापेक्षा अधिक दिवस झाले तरी व्यवसाय हवा तसा तेजीत येत नसल्याने रिक्षामालक-चालक चिंतित आहेत. मार्चअखेरीपासून लॉकडाऊन असल्याने रिक्षा व्यावसायिक आधीच घरात होते. तर, आता लॉकडाऊन झाल्यानंतरही प्रवाशांच्या प्रतीक्षेत रस्त्यावर वेळ जात आहे. दिवसाकाठी जेमतेम ४०० ते ५०० रुपये धंदा होत आहे. लोकल सेवा सुरू होत नाही तोपर्यंत व्यवसायाला झळाळी येणार नाही, असे मत रिक्षा चालकांनी व्यक्त केले.

कल्याण-डोंबिवलीकर नोकरी, व्यवसायानिमित्त ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरात ये-जा करतात. त्यामुळे ते बहुतांशी वाहतुकीसाठी रेल्वेवरच अवलंबून आहेत. डोंबिवलीमधून सुमारे साडेचार लाख, तर कल्याणमधून अडीच लाख प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. त्यापैकी बहुतांशी नागरिक हे घर ते रेल्वे स्थानक रिक्षानेच प्रवास करतात. रेल्वेवरच व्यवसाय अवलंबून असल्याचे मत रिक्षाचालकांनी व्यक्त केले.लॉकडाऊन शिथिल झाल्याने दुकाने, बाजारपेठा उघडल्या आहेत. रक्षाबंधन, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी तेथे गर्दी झाली. मात्र, रिक्षांना प्रवासीच नाहीत. दुसरीकडे खाजगी कंपन्याही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे काही कर्मचारी कंपन्यांच्या खाजगी बस तसेच एसटीने प्रवास करतात. अत्यावश्यक सेवेतील बहुतांश प्रवासी दुचाकीनेच रेल्वे स्थानक गाठतात. त्यामुळे रिक्षा व्यवसायाला तेजी नाही.आताही १५ दिवसांपासून सकाळचे ६ ते ९ वाजेपर्यंतचे तीन तास सोडले, तर अन्य वेळी फारसा व्यवसायच होत नाही, असे रिक्षाचालकांनी सांगितले. डोंबिवली पूर्वेला इंदिरा गांधी चौक, पाटकर रस्ता, केळकर तसेच रामनगर स्टॅण्ड परिसरात रिक्षा दिसतात. मात्र, तेजी नसल्याने अनेक रिक्षा चालक दुपारनंतर वाहन बाहेर काढत नाहीत.रेल्वे सेवेवरच रिक्षा व्यवसाय अवलंबून आहे, असे म्हणणे वावगे नाही. अजूनही व्यवसायाला तेजी नाही. जेमतेम ४०० रुपये सरासरी व्यवसाय होत आहे. तातडीने रेल्वे सुरू होणे गरजेचे आहे. - दत्ता माळेकर, कल्याण जिल्हाध्यक्ष, वाहतूक सेल भाजपरिक्षाव्यावसायिक आता घरातून बाहेर पडले आहेत. पण, त्यांना प्रवासी मिळत नाहीत. कसाबसा दिवस निघत असला तरी चिंता कायम आहे. आणखी रिक्षा रस्त्यावर आल्यास जो धंदा होतो तोही होणार नाही. - काळू कोमासकर, अध्यक्ष, लालबावटा रिक्षा युनियन

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वे