शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

रिक्षा व्यवसाय अद्यापही थंडच, मालक-चालक चिंतित; रेल्वे सेवेवरच व्यवसाय अवलंबून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 00:53 IST

कल्याण-डोंबिवलीकर नोकरी, व्यवसायानिमित्त ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरात ये-जा करतात. त्यामुळे ते बहुतांशी वाहतुकीसाठी रेल्वेवरच अवलंबून आहेत.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत लॉकडाऊन शिथिल होऊन पंधरवड्यापेक्षा अधिक दिवस झाले तरी व्यवसाय हवा तसा तेजीत येत नसल्याने रिक्षामालक-चालक चिंतित आहेत. मार्चअखेरीपासून लॉकडाऊन असल्याने रिक्षा व्यावसायिक आधीच घरात होते. तर, आता लॉकडाऊन झाल्यानंतरही प्रवाशांच्या प्रतीक्षेत रस्त्यावर वेळ जात आहे. दिवसाकाठी जेमतेम ४०० ते ५०० रुपये धंदा होत आहे. लोकल सेवा सुरू होत नाही तोपर्यंत व्यवसायाला झळाळी येणार नाही, असे मत रिक्षा चालकांनी व्यक्त केले.

कल्याण-डोंबिवलीकर नोकरी, व्यवसायानिमित्त ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरात ये-जा करतात. त्यामुळे ते बहुतांशी वाहतुकीसाठी रेल्वेवरच अवलंबून आहेत. डोंबिवलीमधून सुमारे साडेचार लाख, तर कल्याणमधून अडीच लाख प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. त्यापैकी बहुतांशी नागरिक हे घर ते रेल्वे स्थानक रिक्षानेच प्रवास करतात. रेल्वेवरच व्यवसाय अवलंबून असल्याचे मत रिक्षाचालकांनी व्यक्त केले.लॉकडाऊन शिथिल झाल्याने दुकाने, बाजारपेठा उघडल्या आहेत. रक्षाबंधन, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी तेथे गर्दी झाली. मात्र, रिक्षांना प्रवासीच नाहीत. दुसरीकडे खाजगी कंपन्याही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे काही कर्मचारी कंपन्यांच्या खाजगी बस तसेच एसटीने प्रवास करतात. अत्यावश्यक सेवेतील बहुतांश प्रवासी दुचाकीनेच रेल्वे स्थानक गाठतात. त्यामुळे रिक्षा व्यवसायाला तेजी नाही.आताही १५ दिवसांपासून सकाळचे ६ ते ९ वाजेपर्यंतचे तीन तास सोडले, तर अन्य वेळी फारसा व्यवसायच होत नाही, असे रिक्षाचालकांनी सांगितले. डोंबिवली पूर्वेला इंदिरा गांधी चौक, पाटकर रस्ता, केळकर तसेच रामनगर स्टॅण्ड परिसरात रिक्षा दिसतात. मात्र, तेजी नसल्याने अनेक रिक्षा चालक दुपारनंतर वाहन बाहेर काढत नाहीत.रेल्वे सेवेवरच रिक्षा व्यवसाय अवलंबून आहे, असे म्हणणे वावगे नाही. अजूनही व्यवसायाला तेजी नाही. जेमतेम ४०० रुपये सरासरी व्यवसाय होत आहे. तातडीने रेल्वे सुरू होणे गरजेचे आहे. - दत्ता माळेकर, कल्याण जिल्हाध्यक्ष, वाहतूक सेल भाजपरिक्षाव्यावसायिक आता घरातून बाहेर पडले आहेत. पण, त्यांना प्रवासी मिळत नाहीत. कसाबसा दिवस निघत असला तरी चिंता कायम आहे. आणखी रिक्षा रस्त्यावर आल्यास जो धंदा होतो तोही होणार नाही. - काळू कोमासकर, अध्यक्ष, लालबावटा रिक्षा युनियन

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वे